शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

राज ठाकरे आणि करणमध्ये मुख्यमंत्र्यांची ब्रोकरची भूमिका- संजय निरुपम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 18:59 IST

राज ठाकरे आणि करण जोहरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रोकरची भूमिका बजावली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - राज ठाकरे आणि करण जोहरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रोकरची भूमिका बजावली आहे, अशी टीका काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. "नेहमीच कायदा तोडणारा आणि धमक्या देणा-या राज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी अटक करायचे सोडून वर्षा बंगल्यावर बैठकीला बोलावले. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्री यांनी राज ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, परंतु शनिवारी मुख्यमंत्री, राज ठाकरे आणि फिल्म निर्मात्यांची जी बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सेटलमेंट केली आहे. देशभक्तीची किंमत ठरविणारे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री कोण ?" असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.ते म्हणाले, "देशातील अशी ही पहिलीच घटना असेल की, राजकारणामध्ये भारतीय सेनेला ओढले आहे. आर्मी फंड देण्याच्या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेणे ही लाजिरवाणी बाब आहे. आर्मी फंडाला ५ कोटी रुपये देण्याचा हक्क यांना दिला कोणी ? या बैठकीनंतर लगेचच आपल्या भारतीय सेनेने जाहीर केले की, आम्हाला या पैशांची गरज नाही. भारतीय सेनेने फंड नाकारत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांना चपराक लगावली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी जनतेची सेनेची माफी मागावी. मुख्यमंत्र्यांनी ब्रोकरची भूमिका निभावली आहे." संजय निरुपम यांनी अशी मागणी केली की, शनिवारी मुख्यमंत्री, राज ठाकरे आणि फिल्म निर्मात्यांची जी बैठक झाली त्याचे सर्व मुद्दे जनतेसमोर ठेवावेत. या बैठकीत काय चर्चा झाली हे सगळ्यांना कळाले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत काय निर्णय झाला याचा सविस्तर खुलासा करावा. येत्या दोन-तीन दिवसांत जर हे जाहीर केले नाही, तर आम्ही या प्रकरणी न्यायालयात जाणार आहोत.संजय निरुपम म्हणाले की, काँग्रेसचे जेव्हा सरकार होते तेव्हा "माय नेम इज खान" या चित्रपटाला शिवसेनेने विरोध केला होता. तेव्हा आमच्या सरकारने सर्व सिनेमागृहांना संरक्षण देऊन सिनेमा रिलीज केला होता. आम्ही शिवसेनेचा विरोध मोडून काढला होता. पण भाजपा सरकारमध्ये ही हिंमत नाही. मुख्यमंत्री मनसेसोबत तह करत बसले. ब्रोकरची भूमिका निभावली. याचा मी निषेध करतो. हे अत्यंत निंदनीय आहे. या पत्रकार परिषदेला निवृत्त कमांडर राज सैनी उपस्थित होते. "आर्मीला किंवा नेव्हीला अशा पैशांची गरज नाही आहे. राजकारणामध्ये आर्मी आणि नेव्हीला सहभागी करू नये. आम्हाला सरकारकडून जे मिळते त्यात आम्ही खूश आहोत. आम्हाला अशा देणग्यांची गरज नाही आहे. राजकारणामध्ये आम्हाला ओढू नका", असंही ते म्हणाले आहेत.