शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

राज ठाकरे आणि करणमध्ये मुख्यमंत्र्यांची ब्रोकरची भूमिका- संजय निरुपम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 18:59 IST

राज ठाकरे आणि करण जोहरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रोकरची भूमिका बजावली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - राज ठाकरे आणि करण जोहरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रोकरची भूमिका बजावली आहे, अशी टीका काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. "नेहमीच कायदा तोडणारा आणि धमक्या देणा-या राज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी अटक करायचे सोडून वर्षा बंगल्यावर बैठकीला बोलावले. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्री यांनी राज ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, परंतु शनिवारी मुख्यमंत्री, राज ठाकरे आणि फिल्म निर्मात्यांची जी बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सेटलमेंट केली आहे. देशभक्तीची किंमत ठरविणारे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री कोण ?" असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.ते म्हणाले, "देशातील अशी ही पहिलीच घटना असेल की, राजकारणामध्ये भारतीय सेनेला ओढले आहे. आर्मी फंड देण्याच्या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेणे ही लाजिरवाणी बाब आहे. आर्मी फंडाला ५ कोटी रुपये देण्याचा हक्क यांना दिला कोणी ? या बैठकीनंतर लगेचच आपल्या भारतीय सेनेने जाहीर केले की, आम्हाला या पैशांची गरज नाही. भारतीय सेनेने फंड नाकारत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांना चपराक लगावली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी जनतेची सेनेची माफी मागावी. मुख्यमंत्र्यांनी ब्रोकरची भूमिका निभावली आहे." संजय निरुपम यांनी अशी मागणी केली की, शनिवारी मुख्यमंत्री, राज ठाकरे आणि फिल्म निर्मात्यांची जी बैठक झाली त्याचे सर्व मुद्दे जनतेसमोर ठेवावेत. या बैठकीत काय चर्चा झाली हे सगळ्यांना कळाले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत काय निर्णय झाला याचा सविस्तर खुलासा करावा. येत्या दोन-तीन दिवसांत जर हे जाहीर केले नाही, तर आम्ही या प्रकरणी न्यायालयात जाणार आहोत.संजय निरुपम म्हणाले की, काँग्रेसचे जेव्हा सरकार होते तेव्हा "माय नेम इज खान" या चित्रपटाला शिवसेनेने विरोध केला होता. तेव्हा आमच्या सरकारने सर्व सिनेमागृहांना संरक्षण देऊन सिनेमा रिलीज केला होता. आम्ही शिवसेनेचा विरोध मोडून काढला होता. पण भाजपा सरकारमध्ये ही हिंमत नाही. मुख्यमंत्री मनसेसोबत तह करत बसले. ब्रोकरची भूमिका निभावली. याचा मी निषेध करतो. हे अत्यंत निंदनीय आहे. या पत्रकार परिषदेला निवृत्त कमांडर राज सैनी उपस्थित होते. "आर्मीला किंवा नेव्हीला अशा पैशांची गरज नाही आहे. राजकारणामध्ये आर्मी आणि नेव्हीला सहभागी करू नये. आम्हाला सरकारकडून जे मिळते त्यात आम्ही खूश आहोत. आम्हाला अशा देणग्यांची गरज नाही आहे. राजकारणामध्ये आम्हाला ओढू नका", असंही ते म्हणाले आहेत.