शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोला नव्या तरतुदींचा फायदा

By admin | Updated: March 1, 2016 01:11 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार हमी योजनेसाठी शासनाने ३८ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील सध्याची स्थिती पाहता शासन सध्या तरतूद करीत

शिरूर : केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार हमी योजनेसाठी शासनाने ३८ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील सध्याची स्थिती पाहता शासन सध्या तरतूद करीत असलेली रक्कमही पूर्णत: खर्ची पडत नसल्याचे वास्तव आहे. अशात या योजनेतील मजुरांचा रोजगार वाढवल्यास या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे होऊ शकतील व नव्या तरतुदींचाही फायदा मिळू शकेल.मनरेगासाठी आतापर्यंत प्रत्येक शासनाने प्राधान्याने लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मनरेगांतर्गत सर्वांत मोठी समस्या आहे ती, मजुरांच्या रोजगाराची. आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी स्तरावर चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. अगदी कृषी विभागातही शेतीची कामे करणाऱ्या मजुरांना प्रतिदिन ३०० ते ४०० रुपये मिळत आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये अकुशल कामगारांनाही प्रतिदिन ३०० ते ४०० रुपये (ओव्हरटाईमचे पैसे वेगळे) मिळत आहेत. बांधकाम क्षेत्रात गवंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्या मजुरांनाही ३०० ते ३५० रुपये प्रतिदिन मजुरी मिळते. अशा परिस्थितीत मनरेगांतर्गत १८१ रुपये प्रतिदिन मजुरीकडे मजूर पाठ फिरवताना दिसतात. तालुक्यात मनरेगा विभागाकडे आजमितीला २० हजार ३०० मजुरांची नोंदणी आहे. मात्र, तालुक्यात आज फक्त ३४ वैयक्तिक विहिरींची कामे सुरू असून, केवळ ४३५ मजूर कामावर आहेत. २०१६ वर्षासाठी शासनाने मनरेगाच्या कामासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मनरेगांतर्गत पानमंद रस्ते, शेतरस्ते, वैयक्तिक सिंचन विहीर, फळबाग लागवड, कंपोस्ट खत, शोष खड्डे, वैयक्तिक शौचालय उभारणी, गाईगोठा, शेड बांधणे, शेळी निवारा शेड बांधणे, तलावातील गाळ काढणे, माती बंधारे, सिमेंट बंधारे बांधणे आदी स्वरूपाची कामे केली जातात. तालुक्यातील ग्रामपंचायतींमधून या संदर्भातल्या कामांची मागणी मनरेगा विभागाकडे केल्यानंतर हा विभाग ती कामे मंजूर करतो. अशा कामांसाठी यंदाच्या वर्षाचा ६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मागील (२०१५)वर्षी तीन कोटी रुपयांचा आराखडा होता. पैकी केवळ १ कोटी ३ लाख रुपयांचीच कामे होऊ शकली. यंदाच्या वर्षी आराखडा दुप्पट रकमेचा आहे. मात्र, ही रक्कमही पूर्णत: खर्च होणार की नाही, याबाबत शंका आहे.