शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजलेल्या चिमुरड्यांची गरिबीपायी होरपळ!

By admin | Updated: April 17, 2015 09:07 IST

मृत्यूशी झुंज : सरकारी यंत्रणेकडून टोलवाटोलवी; ओझर्डे स्फोटात जखमी झाल्या होत्या दोघी -लोकमत विशेष...

राहुल तांबोळी ल्ल भुर्इंज ओझर्डे, ता. वाई येथील स्फोटात भाजलेल्या दोन चिमुरड्या आता शासकीय वैद्यकीय यंत्रणेत होरपळून निघत आहेत. गेली आठ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या चिमुरड्यांना आता भुर्इंज येथे झोपडीत आणले आहे. केवळ अज्ञान आणि गरिबी यामुळे पाच वर्षांची गीता आणि नऊ वर्षांची पूजा उपचाराअभावी इवल्याशा झोपडीत तडफडत आहेत. ओझर्डे येथील यात्रेत शोभेच्या दारूच्या साठ्याचा स्फोट झाला होता. या स्फोटात पूजा रामदास पवार आणि गीता रामदास पवार जखमी झाल्या होत्या. त्यांची आज आठ दिवसानंतरही सुरू असणारी होरपळ अंगावर शहारे आणणारी अशीच आहे. घटनेनंतर त्या दोघींना सातारा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसऱ्याच दिवशी तेथील डॉक्टरांनी या दोघींना पुण्याला न्या, असे सांगितले. पूजा व गीता या अत्यंत गरीब अशा गोपाळ समाजातील आहेत. या दोघींचा सांभाळ आजी करते. जत्रेत किरकोळ वस्तू विकून जगणे, हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे पुण्याला उपचारासाठी नेणे त्यांना शक्य नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यांवर तरडगाव, ता. फलटण येथील नातेवाइकांनी त्या दोघींना आपल्या गावी नेले. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे काही दिवस ठेवण्यात आले. तेथून पुन्हा सातारला न्या, असे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा साताऱ्यात आणल्यावर पुण्याला न्या, असे सांगण्यात आले. अशिक्षित आणि गरीब अशा गोपाळ समाजातील पूजा व गीताच्या नातेवाइकांनी अखेर दोघींना भुर्इंज येथील झोपडीत आणले आहे. दोघींनाही उपचाराविना घरी ठेवले आहे. म्हणजे त्यांच्या मृत्यूची वाट पाहण्यासारखेच आहे. कारण गीता ८० टक्के तर पूजा ६८ टक्के भाजून जखमी झाली आहे. ही टक्केवारी अतिशय गंभीर आहे. पाणीपणी करीत झोपडीत तडफडत असणाऱ्या या चिमुरड्या पाहून प्रत्येकाचं काळीत पिळवटून निघत आहे. चौकशीचे औदार्यही नाही... पूजा व गीताचा सांभाळ आजी करते. ओझर्डेतील स्फोटात आजीचे खेळण्याचे दुकान जळून खाक झाले आहे. घटनेवेळी या दोघी दुकानाच्या पालातच झोपल्या होत्या. प्रचंड दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव आणि दारूकाम करणाऱ्याचा हलगर्जीपणा पूजा व गीताच्या जीवावर बेतला आहे. घटनेनंतर जखमी गीता व पूजा कशा आहेत. याची चौकशी करण्याचे औदार्यही कुणी दाखविलेले नाही. गरिबांचे जीव संबंधितांसह सर्वच यंत्रणेला एवढे स्वस्त झाले आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.