शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजलेल्या चिमुरड्यांची गरिबीपायी होरपळ!

By admin | Updated: April 17, 2015 09:07 IST

मृत्यूशी झुंज : सरकारी यंत्रणेकडून टोलवाटोलवी; ओझर्डे स्फोटात जखमी झाल्या होत्या दोघी -लोकमत विशेष...

राहुल तांबोळी ल्ल भुर्इंज ओझर्डे, ता. वाई येथील स्फोटात भाजलेल्या दोन चिमुरड्या आता शासकीय वैद्यकीय यंत्रणेत होरपळून निघत आहेत. गेली आठ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या चिमुरड्यांना आता भुर्इंज येथे झोपडीत आणले आहे. केवळ अज्ञान आणि गरिबी यामुळे पाच वर्षांची गीता आणि नऊ वर्षांची पूजा उपचाराअभावी इवल्याशा झोपडीत तडफडत आहेत. ओझर्डे येथील यात्रेत शोभेच्या दारूच्या साठ्याचा स्फोट झाला होता. या स्फोटात पूजा रामदास पवार आणि गीता रामदास पवार जखमी झाल्या होत्या. त्यांची आज आठ दिवसानंतरही सुरू असणारी होरपळ अंगावर शहारे आणणारी अशीच आहे. घटनेनंतर त्या दोघींना सातारा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसऱ्याच दिवशी तेथील डॉक्टरांनी या दोघींना पुण्याला न्या, असे सांगितले. पूजा व गीता या अत्यंत गरीब अशा गोपाळ समाजातील आहेत. या दोघींचा सांभाळ आजी करते. जत्रेत किरकोळ वस्तू विकून जगणे, हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे पुण्याला उपचारासाठी नेणे त्यांना शक्य नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यांवर तरडगाव, ता. फलटण येथील नातेवाइकांनी त्या दोघींना आपल्या गावी नेले. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे काही दिवस ठेवण्यात आले. तेथून पुन्हा सातारला न्या, असे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा साताऱ्यात आणल्यावर पुण्याला न्या, असे सांगण्यात आले. अशिक्षित आणि गरीब अशा गोपाळ समाजातील पूजा व गीताच्या नातेवाइकांनी अखेर दोघींना भुर्इंज येथील झोपडीत आणले आहे. दोघींनाही उपचाराविना घरी ठेवले आहे. म्हणजे त्यांच्या मृत्यूची वाट पाहण्यासारखेच आहे. कारण गीता ८० टक्के तर पूजा ६८ टक्के भाजून जखमी झाली आहे. ही टक्केवारी अतिशय गंभीर आहे. पाणीपणी करीत झोपडीत तडफडत असणाऱ्या या चिमुरड्या पाहून प्रत्येकाचं काळीत पिळवटून निघत आहे. चौकशीचे औदार्यही नाही... पूजा व गीताचा सांभाळ आजी करते. ओझर्डेतील स्फोटात आजीचे खेळण्याचे दुकान जळून खाक झाले आहे. घटनेवेळी या दोघी दुकानाच्या पालातच झोपल्या होत्या. प्रचंड दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव आणि दारूकाम करणाऱ्याचा हलगर्जीपणा पूजा व गीताच्या जीवावर बेतला आहे. घटनेनंतर जखमी गीता व पूजा कशा आहेत. याची चौकशी करण्याचे औदार्यही कुणी दाखविलेले नाही. गरिबांचे जीव संबंधितांसह सर्वच यंत्रणेला एवढे स्वस्त झाले आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.