शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

मुंबईत समन्यायी पाणीवाटपासाठी २ महिन्यांत रोडमॅप - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 13, 2016 01:56 IST

मुंबईमध्ये पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी येत्या दोन महिन्यांत एक रोडमॅप तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महापालिकेला दिले. या समन्यायी

मुंबई : मुंबईमध्ये पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी येत्या दोन महिन्यांत एक रोडमॅप तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महापालिकेला दिले. या समन्यायी वाटपासाठी मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि जलतज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे त्यांनी विधानसभेत जाहीर केले. मुंबईत दररोज प्रतिदिन ९०० एमएलडी पाण्याची गळती होत असल्याची कबुलीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. मुंबईत पाणी मुबलक आहे, पण वितरण व्यवस्था सक्षम नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. मुंबईतील विशेषत: पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणीटंचाईबाबत भाजपाचे सदस्य योगेश सागर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. शहरांतील विविध भागांना असमान पाणीवाटप अन्यायकारक असल्याचे सांगून, त्यांनी जुन्या जलवाहिन्यांमुळे किती प्रचंड पाणी वाया जाते, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर दररोज ९०० एमएलडी पाण्याची गळती होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. मुंबईत ८० ते १०० वर्षे जुन्या जलवाहिन्या आहेत. त्या गंजलेल्या आणि गळक्याही आहेत. त्यामुळे मुंबईत जो पाणीप्रश्न भेडसावत आहे, तो प्रामुख्याने पाणीवितरणातील उणिवांमुळे आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा एक प्रकल्प तयार केला असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आशिष शेलार, मनिषा चौधरी, राम कदम, अतुल भातखळकर, सुनील प्रभू आदी सदस्यांनी या लक्षवेधीवर बोलताना, मुंबई उपनगरातील पाणीटंचाईच्या समस्या लक्षात आणून दिली. राम कदम यांनी घाटकोपर परिसरात रहिवाशांना दोन-दोन फूट खड्डा खणून त्यातून पाणी भरावे लागत असल्याचे सांगितले, तर मनिषा चौधरी यांनी गोरेगाव ते दहीसरमधील झोपडपट्टीवासियांना अत्यंत कमी पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत, बऱ्याच भागांत पाणी गायब असल्याचे सांगितले. तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचना महापालिकेने त्या रोडमॅपमध्ये लक्षात घेऊन उपाययोजना करावी, असे निर्देशही देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)