शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

रस्त्यांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 02:55 IST

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांच्या तुलनेत अत्यल्प निधी वितरीत झाल्याने राज्यातील रस्त्यांची कामे रखडली असल्याची कबुली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी

मुंबई : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांच्या तुलनेत अत्यल्प निधी वितरीत झाल्याने राज्यातील रस्त्यांची कामे रखडली असल्याची कबुली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. विशेष म्हणजे, या योजनेसाठी सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षात केंद्राकडून राज्याला एक रुपयाचाही निधी मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपा सदस्य अपूर्व हिरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री भुसे म्हणाले की, पंतप्रधान ग्रामसडक योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. या योजनेतून केंद्राने चालू वर्षासाठी राज्याला ६०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर निधीपैकी आतापर्यंत केवळ ११६ कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारचा हिस्सा ४०४ कोटी रुपयांचा असून राज्यानेही अवघे ७७ कोटी रुपये वितरीत केले आहेत. तर, गेल्यावर्षी या योजनेसाठी केंद्राने राज्याला ५५३ कोटी रुपये दिले होते. दुसरीकडे राज्य सरकारने स्वत:च्या हिश्शांचे १७६ कोटी रुपये गेल्यावर्षी वितरीत केले आहेत. या योजनेसाठी सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षात केंद्र सरकारकडून निधीच मिळाला नाही. परिणामी निधीअभावी या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत. जी गत केंद्राच्या निधीची तीच अवस्था राज्याच्या निधी वाटपाची सुद्धा आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडून दिली आहेत, असे भुसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनी माणगाव लोणशी ते उणेगाव रस्त्याच्या कामाची गेली तीन वर्षे चौकशीच झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. रस्ता बांधल्यानंतर पुढील पाच वर्षे रस्त्याची देखभाल करणे ठेकेदारावर बंधनकारक असताना सुद्धा या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे, असे ते म्हणाले. त्यावर एका महिन्यात कामाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन भुसे यांनी यावेळी दिले.