शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

रस्त्यांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 02:55 IST

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांच्या तुलनेत अत्यल्प निधी वितरीत झाल्याने राज्यातील रस्त्यांची कामे रखडली असल्याची कबुली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी

मुंबई : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांच्या तुलनेत अत्यल्प निधी वितरीत झाल्याने राज्यातील रस्त्यांची कामे रखडली असल्याची कबुली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. विशेष म्हणजे, या योजनेसाठी सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षात केंद्राकडून राज्याला एक रुपयाचाही निधी मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपा सदस्य अपूर्व हिरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री भुसे म्हणाले की, पंतप्रधान ग्रामसडक योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. या योजनेतून केंद्राने चालू वर्षासाठी राज्याला ६०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर निधीपैकी आतापर्यंत केवळ ११६ कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारचा हिस्सा ४०४ कोटी रुपयांचा असून राज्यानेही अवघे ७७ कोटी रुपये वितरीत केले आहेत. तर, गेल्यावर्षी या योजनेसाठी केंद्राने राज्याला ५५३ कोटी रुपये दिले होते. दुसरीकडे राज्य सरकारने स्वत:च्या हिश्शांचे १७६ कोटी रुपये गेल्यावर्षी वितरीत केले आहेत. या योजनेसाठी सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षात केंद्र सरकारकडून निधीच मिळाला नाही. परिणामी निधीअभावी या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत. जी गत केंद्राच्या निधीची तीच अवस्था राज्याच्या निधी वाटपाची सुद्धा आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडून दिली आहेत, असे भुसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनी माणगाव लोणशी ते उणेगाव रस्त्याच्या कामाची गेली तीन वर्षे चौकशीच झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. रस्ता बांधल्यानंतर पुढील पाच वर्षे रस्त्याची देखभाल करणे ठेकेदारावर बंधनकारक असताना सुद्धा या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे, असे ते म्हणाले. त्यावर एका महिन्यात कामाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन भुसे यांनी यावेळी दिले.