शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियान केवळ दिखाव्यापुरतेच

By admin | Updated: January 17, 2017 01:35 IST

बारामती शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे.

बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये फलक लावून जनजागृतीही करण्यात येत आहे. मात्र, शहरातील वाहतूक समस्या वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ असल्याने हे अभियान केवळ दिखावाच ठरत आहे. दिवसेंदिवस बारामती शहरातील वाहतूक समस्या गंभीर होत आहे. वाढत्या बाजारपेठेमुळे बारामती शहरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत शहरातील रस्ते अपुरे व अरुंद ठरतात. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या बारामतीकरांच्या पाचवीलाच पुजली आहे. त्यात नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून अद्ययावत ‘सिग्नल यंत्रणा’ उभारली; परंतु सिग्नल यंत्रणा उभारल्यापासून त्याचा वापरच झाला नाही. शहरातील रस्ते अरुंद आहेत, तसेच कोणताही रस्ता ‘वन वे’ नाही. त्यामुळे सिग्नल यंत्रणा सुरू केली की, चौकातील रस्त्यांवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे शहरातील सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत आहे, असे एका वाहतूक नियंत्रक पोलिसाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने शहर पोलिसांनी सुरक्षित प्रवासाचे आवाहन नागरिकांना केले आहे. शहरातील चौकाचौकांमध्ये फलक लावून याबाबत जनजागृती केली आहे. ‘लाल दिवा दिसला तर थांबलात तरच मुक्कामी सुरक्षित पोहोचाल’, हेल्मेट वापरा, वाहन चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर टाळा, अशा अनेक सूचना या फलकांवर दिलेल्या आहेत. मात्र अभियानाच्या सुरुवातीला शहर पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती फेरी काढली. चौकात फलक लावले. यानंतर मात्र हे अभियान केवळ फलकांवरच राहिले आहे. बारामती शहरातील भिगवण चौक, तीन हत्ती चौक, इंदापूर चौक, गुणवडी चौक, कारभारी चौक, पेन्सिल चौक आदी भागांत वाहतूककोंडी, पार्किंगच्या समस्या कायम आहेत. तर भर बाजारपेठेतील सुभाषचंद्र बोस चौक, कचेरी रस्ता, छत्रपती शिवाजीमहाराज रस्ता (सिनेमा रोड) महावीर पथ आदी भागांत पार्किंगची समस्या गंभीर आहे. केवळ सुभाषचंद्र बोस चौकात चारचाकी वाहनांना बंदी केली आहे. तेथे बॅरिकेड्स लावले आहेत. मात्र या चौकापासून नजीक असणाऱ्या इतर अंतर्गत रस्त्यांवर चारचाकी वाहने सर्रासपणे महावीर पथ आणि कचेरी रस्त्यावर येत असतात. त्यामुळे वाहतूककोंडी तर होतेच. मात्र अरुंद रस्त्यांमुळे छोट्या मोठ्या अपघाताचे प्रसंग नेहमीच घडतात. तसेच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर चारचाकी वाहनांचे पार्किंग होते. तर काही महाभाग रस्त्याच्या मधेच चारचाकी उभी करतात. त्यामुळेही मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होते. दररोज होणारी वाहतूककोंडी, अल्पवयीन दुचाकीचालक, गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रक पोलिसांची अनुपस्थिती, शाळा महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओंची टगेगिरी यामुळे कायमच शहारांतर्गत वाहतूक समस्या ऐरणीवर येते. त्यामुळे रस्ता सुरक्षा अभियान केवळ दिखाव्यापुरतेच राहते आहे.(वार्ताहर)>दररोजच अपघातांचा करताहेत सामनासध्या ऊस कारखान्यांचा गळित हंगाम सुरू आहे. बारामती शहराच्या बाह्यवळण रस्त्यावरून तसेच तालुक्यातून ‘रिफ्लेक्टर’ पट्ट्यांशिवाय अवजड वाहनांतून ऊसवाहतूक होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहनांमध्ये भरल्याने ही वाहने पंक्चर होतात. आहे त्या स्थितीतच वाहने रस्त्यावर उभी केली जातात. ‘रिफ्लेक्टर’ पट्ट्या नसल्याने रात्रीच्या वेळी इतर वाहनचालकांना अपघातास सामोरे जावे लागते. किरकोळ अपघातांसह एखादा मोठा अपघातदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध झाले. साखर कारखान्यांचा गळित हंगामदेखील आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आरटीओ, ग्रामीण पोलीस यंत्रणा, कारखाना प्रशासन यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे अशा अभियानामधून नागरिकांना आवाहन करण्यापेक्षा प्रशासनानेही आपला उदासीन दृष्टिकोन बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.