शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

रस्ते सुरक्षा समितीची १० वर्षांत बैठकच नाही

By admin | Updated: January 13, 2015 04:52 IST

राज्यात रस्ते अपघातांतील मृत्यूंची समस्या गंभीर असताना मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या ‘रस्ते सुरक्षा उच्चस्तरीय समिती’ची एकही बैठक गेल्या १० वर्षांत झालेली नाही

अलिबाग : राज्यात रस्ते अपघातांतील मृत्यूंची समस्या गंभीर असताना मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या ‘रस्ते सुरक्षा उच्चस्तरीय समिती’ची एकही बैठक गेल्या १० वर्षांत झालेली नाही, अशी टीका परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर केली. २६ व्या रस्ते सुरक्षा अभियानाचा आरंभ सोमवारी अलिबागमध्ये रावते यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात परिवहन क्षेत्रात केवळ ५० टक्के मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यामुळे लवकरच नवीन भरती करून परिवहनला नवसंजीवनी देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. रावते म्हणाले, रस्ते अपघातात दरवर्षी देशात सहा लाख आणि राज्यात ६ हजारांहून अधिक प्रवासी मृत्युमुखी पडतात. याची गंभीर दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. राज्य सरकारनेही ११ ते २५ जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान हाती घेतल्याचे रावते यांनी सांगितले. ६० हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. गोवा राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सहा वर्षांत पूर्ण होईल, असे रावते यांनी स्पष्ट केले. राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार परिवहन खात्यात होत असून यावर कारवाई करण्याची मागणी आमदार पंडित पाटील यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलिबागचे आमदार पंडित पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उरणचे आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, जि.प. बांधकाम सभापती चित्रा पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)