शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तपासणार रस्त्यांची गुणवत्ता

By admin | Updated: November 4, 2016 00:51 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील सर्व रस्त्यांच्या गुणवत्तेची सॉफ्टवेअर, जीपीएस व इतर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तपासणी केली जाणार आहे.

पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील सर्व रस्त्यांच्या गुणवत्तेची सॉफ्टवेअर, जीपीएस व इतर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार सर्वाधिक दुरवस्था झालेले रस्ते कोणते, चांगल्या स्थितीतील रस्ते कोणते याचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार रस्त्यांची दुरुस्ती, नवीन रस्ते बनविणे याचा प्राधान्यक्रम निश्चित करून अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद प्रशासनाकडून केली जाणार आहे.स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा महत्त्वाचा पहिला प्रकल्प संपूर्ण शहरासाठी राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडून रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याच्या कामाचे टेंडर काढण्यात आले आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया पार पाडून लवकरच याबाबतचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली. शहरातील रस्त्यांचा रोडमॅप तयार होऊन अनावश्यक खर्चाला आळा घालण्यास यामुळे मदत होणार आहे. नगरसेवकांच्या आग्रहाखातर अनेकदा प्रभागात गरज नसतानाही नव्याने रस्त्याचे काम केले जाते. त्याच वेळी इतर काही ठिकाणी तातडीने रस्त्याची दुरुस्ती व डागडुजी होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे काही प्रभागांतील रस्ते अत्यंत चांगले तर काही ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असा विकासाचा असमतोल शहरात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या गुणवत्तेचा आराखडा तयार झाल्यानंतर हा असमतोल दूर करता येणार आहे. दुरवस्था झालेल्या रस्त्यांची प्राधान्याने दुरुस्ती केली जाणार आहे. सॉफ्टवेअर, जीपीएस यंत्रणेबरोबर वाहतूक पोलीस, स्थानिक नागरिक यांच्याशी बोलून रस्त्यांची गुणवत्ता निश्चित केली जाणार आहे. यामध्ये धोकादायक स्थितीतील रस्ते कोणते, वर्दळीचे महत्त्वाचे रस्ते कोणते, त्या रस्त्याचे वय किती आहे, त्याची डागडुजी यापूर्वी कधी केली होती तसेच पुढील काळात या रोडची दुरुस्ती केव्हा करावी लागणार आहे, जड वाहतूक कोणत्या रस्त्यांवरून होते याबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीसाठी नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणात वेळेची तसेच खर्चाची बचत होणार आहे. गल्लीबोळांमध्ये गरज नसताना टाकले जाणारे सिमेंटचे रस्ते याचाही फेरविचार या गुणवत्ता सुधार आराखड्यामुळे होऊ शकणार आहे. त्यामुळे अनावश्यक ठिकाणी रस्त्यांवर होणारा खर्च टाळण्यात प्रशासनाला मोठी मदत होणार आहे.