शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तपासणार रस्त्यांची गुणवत्ता

By admin | Updated: November 4, 2016 00:51 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील सर्व रस्त्यांच्या गुणवत्तेची सॉफ्टवेअर, जीपीएस व इतर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तपासणी केली जाणार आहे.

पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील सर्व रस्त्यांच्या गुणवत्तेची सॉफ्टवेअर, जीपीएस व इतर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार सर्वाधिक दुरवस्था झालेले रस्ते कोणते, चांगल्या स्थितीतील रस्ते कोणते याचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार रस्त्यांची दुरुस्ती, नवीन रस्ते बनविणे याचा प्राधान्यक्रम निश्चित करून अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद प्रशासनाकडून केली जाणार आहे.स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा महत्त्वाचा पहिला प्रकल्प संपूर्ण शहरासाठी राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडून रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याच्या कामाचे टेंडर काढण्यात आले आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया पार पाडून लवकरच याबाबतचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली. शहरातील रस्त्यांचा रोडमॅप तयार होऊन अनावश्यक खर्चाला आळा घालण्यास यामुळे मदत होणार आहे. नगरसेवकांच्या आग्रहाखातर अनेकदा प्रभागात गरज नसतानाही नव्याने रस्त्याचे काम केले जाते. त्याच वेळी इतर काही ठिकाणी तातडीने रस्त्याची दुरुस्ती व डागडुजी होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे काही प्रभागांतील रस्ते अत्यंत चांगले तर काही ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असा विकासाचा असमतोल शहरात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या गुणवत्तेचा आराखडा तयार झाल्यानंतर हा असमतोल दूर करता येणार आहे. दुरवस्था झालेल्या रस्त्यांची प्राधान्याने दुरुस्ती केली जाणार आहे. सॉफ्टवेअर, जीपीएस यंत्रणेबरोबर वाहतूक पोलीस, स्थानिक नागरिक यांच्याशी बोलून रस्त्यांची गुणवत्ता निश्चित केली जाणार आहे. यामध्ये धोकादायक स्थितीतील रस्ते कोणते, वर्दळीचे महत्त्वाचे रस्ते कोणते, त्या रस्त्याचे वय किती आहे, त्याची डागडुजी यापूर्वी कधी केली होती तसेच पुढील काळात या रोडची दुरुस्ती केव्हा करावी लागणार आहे, जड वाहतूक कोणत्या रस्त्यांवरून होते याबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीसाठी नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणात वेळेची तसेच खर्चाची बचत होणार आहे. गल्लीबोळांमध्ये गरज नसताना टाकले जाणारे सिमेंटचे रस्ते याचाही फेरविचार या गुणवत्ता सुधार आराखड्यामुळे होऊ शकणार आहे. त्यामुळे अनावश्यक ठिकाणी रस्त्यांवर होणारा खर्च टाळण्यात प्रशासनाला मोठी मदत होणार आहे.