शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

रस्त्यावर उतरुन भाजप आणि संघाविरोधात आंदोलनाचा इशारा - राधाकृष्ण विखे पाटील

By admin | Updated: February 20, 2016 22:05 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हेतुपुरस्सर लक्ष्य केले जात आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत - 

मुंबई, दि. 20 - देशभक्त विरूद्ध देशद्रोही असा वाद उभा करुन केंद्र सरकार आपले आजवरचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्वलंत प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हेतुपुरस्सर लक्ष्य केले जात आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. भाजप व संघाचे हे षडयंत्र आम्ही कदापीही यशस्वी होऊ देणार नाही. हे उपद्व्याप थांबले नाही तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून चोख प्रत्युत्तर देतील, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला आहे. शिर्डीमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. 
राहुल गांधी यांनी रोहित वेमुलाची आत्महत्या आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील घटनेसंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण भाजप आणि संघ परिवाराने षडयंत्र रचून त्यांच्याविरोधात अपप्रचार सुरु केला. गांधी कुटुंबाची बलिदानाची, त्यागाची परंपरा राहिली आहे. या कुटुंबाला भाजप आणि संघाकडून देशभक्तीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. भाजप व संघाला देशभक्तीवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज तिरंगा हातात घेवून मोर्चे काढत आहे. परंतू नागपुरातील संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्यानंतर किती वर्षे तिरंगा फडकविला नाही, याची माहिती अभाविपने जाणून घ्यावी, असंही ते यावेळी बोलले आहेत. 
 देशभक्तीच्या घोषणा देणारे भाजपवाले अफजल गुरुवरुन राजकारण करु पाहत आहेत. या अतिरेक्याला कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळातच फासावर चढविण्यात आले. पण आता त्याच अफजल गुरुला हुतात्मा संबोधणा-या पीडीपीसोबत भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये युती सरकार स्थापन केले, याचे भान भाजप कार्यकर्त्यांना कसे राहिले नाही, अशीही विचारणा विखे पाटील यांनी केली आहे.