शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

राज्यमार्गावरील गतिरोधक हटविले

By admin | Updated: June 9, 2016 03:27 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अनेक ठिकाणी बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले होते.

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अनेक ठिकाणी बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले होते. गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढले नसल्याने या गतिरोधकांमुळे अनेक अपघात घडले आहेत. या टाकण्यात आलेल्या गतिरोधकांचा वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहने आपटून नुकसान होऊन अपघातही घडले आहेत. त्यामुळे हे गतिरोधक काढण्यात यावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील गतिरोधकांमुळे घडतात अपघात’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत एमएमआरडीएने हे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्ग कोट्यवधी रु पये खर्च करून तयार करण्यात आला असला तरी या रस्त्यावर कर्जत ते शेलू वांगणी दरम्यान अनेक ठिकाणी गरज नसताना गतिरोधक टाकण्यात आले आहेत व हे गतिरोधक कोणतीही परवानगी न घेता अचानक टाकले असून त्यामुळे वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नसल्याने अचानक ब्रेक लावावा लागल्याने अनेक ठिकाणी अपघात घडले आहेत. ज्या ठिकाणी एखादे गाव, शाळा असेल तर गतिरोधक टाकणे गरजेचे आहे. परंतु गरज नसताना हे गतिरोधक कशासाठी अशा प्रश्न वाहनचालक यांनी उपस्थित केला होता. ही बातमी प्रसिद्ध होताच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील शेलू, व अन्य ठिकाणचे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे. (वार्ताहर) >बातमीची दखलकोणतीच परवानगी न घेता जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले होते. त्यामुळे वाहने जोरात आपटून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहेत. ही बातमी प्रसिद्ध होताच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील शेलू, व अन्य ठिकाणचे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे. सोमवारी जेसीबी सहाय्याने हे गतिरोधक काढण्यात आले. यावेळी एमएमआरडीएचे ठेकेदार, अधिकारी व पोलीस प्रशासन उपस्थित होते.