शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

राज्यमार्गावरील गतिरोधक हटविले

By admin | Updated: June 9, 2016 03:27 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अनेक ठिकाणी बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले होते.

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अनेक ठिकाणी बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले होते. गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढले नसल्याने या गतिरोधकांमुळे अनेक अपघात घडले आहेत. या टाकण्यात आलेल्या गतिरोधकांचा वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहने आपटून नुकसान होऊन अपघातही घडले आहेत. त्यामुळे हे गतिरोधक काढण्यात यावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील गतिरोधकांमुळे घडतात अपघात’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत एमएमआरडीएने हे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्ग कोट्यवधी रु पये खर्च करून तयार करण्यात आला असला तरी या रस्त्यावर कर्जत ते शेलू वांगणी दरम्यान अनेक ठिकाणी गरज नसताना गतिरोधक टाकण्यात आले आहेत व हे गतिरोधक कोणतीही परवानगी न घेता अचानक टाकले असून त्यामुळे वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नसल्याने अचानक ब्रेक लावावा लागल्याने अनेक ठिकाणी अपघात घडले आहेत. ज्या ठिकाणी एखादे गाव, शाळा असेल तर गतिरोधक टाकणे गरजेचे आहे. परंतु गरज नसताना हे गतिरोधक कशासाठी अशा प्रश्न वाहनचालक यांनी उपस्थित केला होता. ही बातमी प्रसिद्ध होताच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील शेलू, व अन्य ठिकाणचे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे. (वार्ताहर) >बातमीची दखलकोणतीच परवानगी न घेता जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले होते. त्यामुळे वाहने जोरात आपटून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहेत. ही बातमी प्रसिद्ध होताच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील शेलू, व अन्य ठिकाणचे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे. सोमवारी जेसीबी सहाय्याने हे गतिरोधक काढण्यात आले. यावेळी एमएमआरडीएचे ठेकेदार, अधिकारी व पोलीस प्रशासन उपस्थित होते.