नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अनेक ठिकाणी बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले होते. गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढले नसल्याने या गतिरोधकांमुळे अनेक अपघात घडले आहेत. या टाकण्यात आलेल्या गतिरोधकांचा वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहने आपटून नुकसान होऊन अपघातही घडले आहेत. त्यामुळे हे गतिरोधक काढण्यात यावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील गतिरोधकांमुळे घडतात अपघात’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत एमएमआरडीएने हे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्ग कोट्यवधी रु पये खर्च करून तयार करण्यात आला असला तरी या रस्त्यावर कर्जत ते शेलू वांगणी दरम्यान अनेक ठिकाणी गरज नसताना गतिरोधक टाकण्यात आले आहेत व हे गतिरोधक कोणतीही परवानगी न घेता अचानक टाकले असून त्यामुळे वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नसल्याने अचानक ब्रेक लावावा लागल्याने अनेक ठिकाणी अपघात घडले आहेत. ज्या ठिकाणी एखादे गाव, शाळा असेल तर गतिरोधक टाकणे गरजेचे आहे. परंतु गरज नसताना हे गतिरोधक कशासाठी अशा प्रश्न वाहनचालक यांनी उपस्थित केला होता. ही बातमी प्रसिद्ध होताच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील शेलू, व अन्य ठिकाणचे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे. (वार्ताहर) >बातमीची दखलकोणतीच परवानगी न घेता जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले होते. त्यामुळे वाहने जोरात आपटून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहेत. ही बातमी प्रसिद्ध होताच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील शेलू, व अन्य ठिकाणचे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे. सोमवारी जेसीबी सहाय्याने हे गतिरोधक काढण्यात आले. यावेळी एमएमआरडीएचे ठेकेदार, अधिकारी व पोलीस प्रशासन उपस्थित होते.
राज्यमार्गावरील गतिरोधक हटविले
By admin | Updated: June 9, 2016 03:27 IST