शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
2
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
3
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
4
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
5
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
6
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
7
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
10
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
11
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
12
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
13
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
15
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
16
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
17
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
18
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
19
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
20
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी

मुरुड तालुक्यातील रस्त्यांची चाळण

By admin | Updated: July 22, 2016 02:11 IST

अलिबाग, रेवदंडा आणि मुरु डमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली

बोर्ली-मांडला/मुरुड : अलिबाग, रेवदंडा आणि मुरु डमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याऐवजी खड्ड्यातून मार्ग काढण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. ५० किमीच्या प्रवासासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागत असल्याने प्रवशांचे हाल होत आहेत.अलिबाग ते मुरु ड या रस्त्यासाठी कोट्यवधी रु पयांचा निधी खर्च करूनसुद्धा हा निधी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात आहे. अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा परिषद आदी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच महाविद्यालये आहेत. या ठिकाणी विविध कामांसाठी जिल्हाभरातील नागरिक येत असतात. मुरु ड चणेरा येथील नागरिक रेवदंडा मार्गे अलिबाग असा प्रवास करून ये -जा करतात. पावसाळ्यापूर्वी दोन महिन्ने आधी या रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर व खडीने खड्डे भरून त्याची मलमपट्टी करण्यात आली, मात्र जून महिन्यात वरुणराजाचे आगमन होताच रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सर्वत्र खड्डे पडले आहेत. पावसामुळे आणि अवजड वाहतुकीमुळे लहान लहान खड्डे मोठे झाले असून यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. >खड्यांमुळे वाढले अपघात अलिबाग ते रेवदंडा या रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना गणपती सणापूर्वी दुरु स्ती तसेच आॅक्टोबर महिन्यापूर्वी रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यास सुरु वात करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने हात झटकल्याने पावसात या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.>नागोठणे - पोयनाड रस्त्याची दैनानागोठणे : पोयनाडमार्गे अलिबागकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. या मार्गात नागोठणे ते शिहू दरम्यान जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. या परिसरात रिलायन्सचा कारखाना असल्याने शेकडो वाहनांची दररोज वर्दळ असते. नागोठणे - शिहू दरम्यान सहा आसनी मिनीडोर सुरू असतात. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे.दोन - चार दिवसांनी रिक्षाची दुरु स्ती करावी लागत असल्याने, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे मिनीडोर चालक जयराम खाडे यांनी सांगितले. पावसाळ्याच्या तोंडावर काही भागाचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. पावसाळा चालू झाल्यानंतर लगेचच हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. यामुळे नागरिकांसह प्रवासी हैराण झाले आहेत. वाहनचालकांना येथून जाताना कसरत करावी लागत आहे, यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.