शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

मुरुड तालुक्यातील रस्त्यांची चाळण

By admin | Updated: July 22, 2016 02:11 IST

अलिबाग, रेवदंडा आणि मुरु डमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली

बोर्ली-मांडला/मुरुड : अलिबाग, रेवदंडा आणि मुरु डमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याऐवजी खड्ड्यातून मार्ग काढण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. ५० किमीच्या प्रवासासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागत असल्याने प्रवशांचे हाल होत आहेत.अलिबाग ते मुरु ड या रस्त्यासाठी कोट्यवधी रु पयांचा निधी खर्च करूनसुद्धा हा निधी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात आहे. अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा परिषद आदी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच महाविद्यालये आहेत. या ठिकाणी विविध कामांसाठी जिल्हाभरातील नागरिक येत असतात. मुरु ड चणेरा येथील नागरिक रेवदंडा मार्गे अलिबाग असा प्रवास करून ये -जा करतात. पावसाळ्यापूर्वी दोन महिन्ने आधी या रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर व खडीने खड्डे भरून त्याची मलमपट्टी करण्यात आली, मात्र जून महिन्यात वरुणराजाचे आगमन होताच रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सर्वत्र खड्डे पडले आहेत. पावसामुळे आणि अवजड वाहतुकीमुळे लहान लहान खड्डे मोठे झाले असून यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. >खड्यांमुळे वाढले अपघात अलिबाग ते रेवदंडा या रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना गणपती सणापूर्वी दुरु स्ती तसेच आॅक्टोबर महिन्यापूर्वी रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यास सुरु वात करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने हात झटकल्याने पावसात या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.>नागोठणे - पोयनाड रस्त्याची दैनानागोठणे : पोयनाडमार्गे अलिबागकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. या मार्गात नागोठणे ते शिहू दरम्यान जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. या परिसरात रिलायन्सचा कारखाना असल्याने शेकडो वाहनांची दररोज वर्दळ असते. नागोठणे - शिहू दरम्यान सहा आसनी मिनीडोर सुरू असतात. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे.दोन - चार दिवसांनी रिक्षाची दुरु स्ती करावी लागत असल्याने, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे मिनीडोर चालक जयराम खाडे यांनी सांगितले. पावसाळ्याच्या तोंडावर काही भागाचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. पावसाळा चालू झाल्यानंतर लगेचच हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. यामुळे नागरिकांसह प्रवासी हैराण झाले आहेत. वाहनचालकांना येथून जाताना कसरत करावी लागत आहे, यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.