शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

घातपाताचा धोका..!

By admin | Updated: July 2, 2015 22:42 IST

कोकण किनारा : पोलीस महासंचालकांचा सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी : राज्याच्या सागरी क्षेत्रात विशेषत: कोकण किनारपट्टीवर २ ते ४ जुलै २०१५ या कालावधीत देशविरोधी प्रवृत्तींकडून घातपाती कारवायांची शक्यता असून, त्यासाठी पोलीस, सागरी सुरक्षा दल व नागरिकांनीही सतर्क राहावे, असा बिनतारी संदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी जिल्हा पोलीस यंत्रणेला दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, सागरी सुरक्षेवर सर्वाधिक भर दिला जात आहे. सागरी पोलीस स्थानकांनी अधिक कार्यक्षमतेने सागरी किनाऱ्यावर करडी नजर ठेवली आहे. पावसाळ्यात कोकणच्या सागरी क्षेत्रातील मासेमारी २ महिने बंद ठेवली जाते. हा कालावधी मासळीच्या प्रजननाचा असल्याने ही बंदी घातली जाते. तसेच पावसामुळे समुद्रही खवळलेला असतो. याकरिता सर्वच मच्छीमारी नौका किनाऱ्यावर, बंदरात उभ्या केल्या जातात. मासेमारी बंद असल्याने या काळात समुद्रातील वावर कमी असतो. त्याचाच गैरफायदा घेऊन देशविरोधी प्रवृत्तींद्वारे किनारपट्टी भागात घातपाती कृत्य घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसा इशारा राज्याच्या पोलीस खात्याला गुप्तचर यंत्रणांकडून दिला गेल्याने पोलीस महासंचालकांनी सागरी सुरक्षेबाबत सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सागरी सुरक्षेसाठी निर्माण केलेल्या पोलीस ठाण्यांकडून सागरी किनाऱ्यांवर गस्त वाढविण्यात आली आहे. पावसाळा असल्याने समुद्र खवळला आहे. पोलीस, कस्टम यांच्याकडे स्पीड बोटी असूनही त्यांचा वापर करणे शक्य होणारे नाही. मात्र, तटरक्षक दलामार्फत उपग्रह यंत्रणेद्वारे सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवले जात आहे. सागरी किनाऱ्यावरील सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देण्याचा संदेश पाहता पोलिसांकडून ग्रामसुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. पावसाळ्यात सागरात गस्त घालणे शक्य नसल्याने सागरात काही संशयास्पद हालचाली होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी, ग्रामसुरक्षा दलांनी तत्काळ त्याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून इसिस भारतात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून पुढे येत आहेत. त्यामुळे गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्यभरातील पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे.मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेसाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स रायगड जिल्ह्यातील शेखाडी येथून उतरवून नेल्याचे नंतर तपासात स्पष्ट झाले होते. अलिकडेच सागरी सुरक्षा कवच अभियानदरम्यान जिल्ह्यात राबविण्यात आले होते. सागरी क्षेत्रातून येणाऱ्या डमी घातपाती व्यक्तींना पकडण्याचे प्रशिक्षण दिले होते. कोकणातील किनाऱ्यांचा अशा कारवायांसाठी वापर केला जाण्याची दाट शक्यता असल्याने ही सतर्कता दाखवली जात आहे. (प्रतिनिधी)४ जुुलैपर्यंत सागरावर करडी नजर...पोलीस, सागरी सुरक्षा दल व नागरिकांनाही सतर्कतेचे आदेश.जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क.सागरी पोलीस ठाण्यांकडून सागरी कनाऱ्यांवर विशेष गस्त.इसिस भारतात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा.तटरक्षक दलामार्फत उपग्रह यंत्रणेव्दारे सागरी क्षेत्रावर लक्ष.पोलीस महासंचालकांच्या आदेशाने यंत्रणा सतर्क.