शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

मुंबईला जलप्रलयाचा धोका - संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

By admin | Updated: May 20, 2016 16:11 IST

जवळपास चार कोटी भारतीयांना समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका असून विशेषत: मुंबई व कोलकात्यावर सगळ्यात जास्त भीतीचे सावट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात नमूद करण्यात आले

ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्रे, दि. 20 - जवळपास चार कोटी भारतीयांना समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका असून विशेषत: मुंबई व कोलकात्यावर सगळ्यात जास्त भीतीचे सावट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2050 पर्यंत भारतातील समुद्रकिनाऱ्यानजीक राहणाऱ्या सुमारे 4 कोटी लोकांना पूराचा फटका बसू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्या शहरांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे, त्यांना जास्त धोका आहे.
ग्लोबल एन्व्हायर्नमेंट आउटलुकच्या अंदाजानुसार पॅसिफिक आणि आशियामधील देशांना वातावरणातील बदलांमुळे सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. 2050 पर्यंत समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे सगळ्यात जास्त 10 शहरांचे नुकसान होणार असून त्यातली 6 शहरे आशिया पॅसिफिकमध्ये येतात.
 
सगळ्यात जास्त धोका भारताला
 
ज्या देशांना सर्वादिक फटका बसणार आहे, त्यामध्ये भारत अग्रस्थानी आहे. भारतामध्ये 4 कोटी लोकांना पुरांचा व अन्य जलप्रलयाचा फटका बसेल तर त्याखालोखाल बांग्लादेशमधल्या 2.5 कोटी लोकांना सागरी कोपाच्या झळा बसणार आहेत. चीनमधल्या सागरी किनाऱ्यानजीक राहणाऱ्या 2 कोटी लोकांना फटका बसणार असून फिलिपाइन्समध्ये 1.5 कोटी लोकांना जलप्रलयाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
वाढत्या वसाहतींचा ताण
 
सागरी किनाऱ्यानजीक शहरीकरण वेगाने वाढत असून त्यामुळे व आर्थिक विकासामुळे वसाहतींची संख्या वाढत आहे. यामुळे सागरी किनाऱ्यांची जलप्रलयाचा सामना करण्याची नैसर्गिक क्षमता कोलमडत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. विशेषत: भारत, चीन व थायलंडमध्ये आर्थिक प्रगतीमुळे नागरीकरण वाढत आहे, आणि लोकसंख्येचे केंद्रीकरण होत आहे. 
 
 
पूर व जलप्रलयाचा धोका असलेली शहरे
 
भारत - मुंबई, कोलकाता. थायलंड - बँकॉक, म्यानमार - याँगोन, व्हिएतनाम - हो ची मिन्ह व हाय फोंग
यापैकी अनेक शहरे आत्ताही पुरांचा सामना करत आहेत. परंतु विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे पूरनियंत्रणाची क्षमता मर्यादीत आहे. जलप्रलयाखेरीज यापैकी अनेक शहरांना वादळांचा सामना करायला लागू शकतो अशी भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.