शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

होल्डिंग पॉण्डमुळे पुराचा धोका

By admin | Updated: July 10, 2017 03:12 IST

अनेक वर्षे साफसफाई न झाल्याने शहरातील होल्डिंग पॉण्डमध्ये (धारण तलाव) बेसुमार खारफुटीची वाढ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अनेक वर्षे साफसफाई न झाल्याने शहरातील होल्डिंग पॉण्डमध्ये (धारण तलाव) बेसुमार खारफुटीची वाढ झाली आहे. तसेच त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पावसाळ्यात या पॉण्डमुळे आजूबाजूच्या वसाहतींना पुराचा धोका निर्माण झाला आहे. गाळ उपासण्यास आणि खारफुटीची तोड करण्यास पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; परंतु कोणतीही कार्यवाही होत नसल्याने महापालिका प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे. नवी मुंबई शहराची भौगोलिक रचना ही किनारपट्टीपासून खाली आहे. त्यामुळे या शहराची निर्मिती करताना सिडकोने जगातील वेगवेगल्या शहरांचा अभ्यास केला. मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे भरतीचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी काय करता येईल याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. यानंतर हॉलंडच्या धर्तीवर नवी मुंबईतील खाडीकिनाऱ्याजवळ होल्डिंग पॉण्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पॉण्डच्या मुखावर मोठे दरवाजे उभे करण्यात आले. भरतीच्या काळात खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही आणि पावसाचे पाणी या पॉण्डमध्ये जमा होईल, अशा पद्धतीने या दरवाजांची रचना करण्यात आली. ओहोटी सुरू होताच पॉण्डमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून त्यातील पाणी खाडीत जाईल, अशी या पॉण्डची रचना करण्यात आली आहे. त्यामुळेच २६ जुलैच्या मुसळधार पावसातही होल्डिंग पॉण्डमुळे अवघ्या काही तासांत नवी मुंबईतील महत्त्वाच्या उपनगरांमधील पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे मुसळधार पावसातही मुंबई-ठाण्याप्रमाणे नवी मुंबईत सहसा पावसाचे पाणी तुंबून राहत नाही. असे असले तरी पॉण्डमधील खारफुटी व गाळ उपसला गेला नाही, तर भविष्यात याचा मोठा फटका शहराला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्यात भरतीरेषा तब्बल एक किलोमीटर आत शिरल्यामुळे पावसाच्या पुरापासून नवी मुंबईचा वर्षानुवर्षे बचाव करणारे होल्डिंग पॉण्ड आणि मोठे नाले किनारपट्टी नियंत्रण क्षेत्रात (सीआरझेड) समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे हे पॉण्ड व नाल्यांची देखभाल, दुरु स्तीच्या कामांना खोडा बसला आहे. या पॉण्डमध्ये खारफुटींची जंगले उभी राहिली आहेत. गाळाची पातळी वाढली आहे. शहरातील महत्त्वाच्या नाल्यांचाही ‘सीआरझेड’मध्ये समावेश झाल्याने त्यातील गाळ उपसणेही अशक्य झाले आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत असल्याने शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधी व डासांचा उपद्रव : वाशी, ऐरोली, नेरु ळ व कोपरखैरणे आदीसह सिडकोने शहर वसविताना जवळपास ११ होल्डिंग पॉण्डची निर्मिती केली आहे. यातील बहुतांशी पॉण्डमध्ये अनियंत्रित खारफुटी वाढली आहे. नियमित देखभालीअभावी त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे त्याची पाणी साठविण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे. अनेक वर्षे या पॉण्डमधील गाळ उपसला न गेल्याने त्यातून दुर्गंधी येत आहे. डासांचा उपद्रव वाढला आहे. त्याचा फटका परिसरातील नागरी वसाहतींना बसला आहे.