शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

होल्डिंग पॉण्डमुळे पुराचा धोका

By admin | Updated: July 10, 2017 03:12 IST

अनेक वर्षे साफसफाई न झाल्याने शहरातील होल्डिंग पॉण्डमध्ये (धारण तलाव) बेसुमार खारफुटीची वाढ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अनेक वर्षे साफसफाई न झाल्याने शहरातील होल्डिंग पॉण्डमध्ये (धारण तलाव) बेसुमार खारफुटीची वाढ झाली आहे. तसेच त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पावसाळ्यात या पॉण्डमुळे आजूबाजूच्या वसाहतींना पुराचा धोका निर्माण झाला आहे. गाळ उपासण्यास आणि खारफुटीची तोड करण्यास पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; परंतु कोणतीही कार्यवाही होत नसल्याने महापालिका प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे. नवी मुंबई शहराची भौगोलिक रचना ही किनारपट्टीपासून खाली आहे. त्यामुळे या शहराची निर्मिती करताना सिडकोने जगातील वेगवेगल्या शहरांचा अभ्यास केला. मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे भरतीचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी काय करता येईल याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. यानंतर हॉलंडच्या धर्तीवर नवी मुंबईतील खाडीकिनाऱ्याजवळ होल्डिंग पॉण्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पॉण्डच्या मुखावर मोठे दरवाजे उभे करण्यात आले. भरतीच्या काळात खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही आणि पावसाचे पाणी या पॉण्डमध्ये जमा होईल, अशा पद्धतीने या दरवाजांची रचना करण्यात आली. ओहोटी सुरू होताच पॉण्डमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून त्यातील पाणी खाडीत जाईल, अशी या पॉण्डची रचना करण्यात आली आहे. त्यामुळेच २६ जुलैच्या मुसळधार पावसातही होल्डिंग पॉण्डमुळे अवघ्या काही तासांत नवी मुंबईतील महत्त्वाच्या उपनगरांमधील पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे मुसळधार पावसातही मुंबई-ठाण्याप्रमाणे नवी मुंबईत सहसा पावसाचे पाणी तुंबून राहत नाही. असे असले तरी पॉण्डमधील खारफुटी व गाळ उपसला गेला नाही, तर भविष्यात याचा मोठा फटका शहराला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्यात भरतीरेषा तब्बल एक किलोमीटर आत शिरल्यामुळे पावसाच्या पुरापासून नवी मुंबईचा वर्षानुवर्षे बचाव करणारे होल्डिंग पॉण्ड आणि मोठे नाले किनारपट्टी नियंत्रण क्षेत्रात (सीआरझेड) समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे हे पॉण्ड व नाल्यांची देखभाल, दुरु स्तीच्या कामांना खोडा बसला आहे. या पॉण्डमध्ये खारफुटींची जंगले उभी राहिली आहेत. गाळाची पातळी वाढली आहे. शहरातील महत्त्वाच्या नाल्यांचाही ‘सीआरझेड’मध्ये समावेश झाल्याने त्यातील गाळ उपसणेही अशक्य झाले आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत असल्याने शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधी व डासांचा उपद्रव : वाशी, ऐरोली, नेरु ळ व कोपरखैरणे आदीसह सिडकोने शहर वसविताना जवळपास ११ होल्डिंग पॉण्डची निर्मिती केली आहे. यातील बहुतांशी पॉण्डमध्ये अनियंत्रित खारफुटी वाढली आहे. नियमित देखभालीअभावी त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे त्याची पाणी साठविण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे. अनेक वर्षे या पॉण्डमधील गाळ उपसला न गेल्याने त्यातून दुर्गंधी येत आहे. डासांचा उपद्रव वाढला आहे. त्याचा फटका परिसरातील नागरी वसाहतींना बसला आहे.