शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

मोदींंच्या ‘व्हिडीओ’ वरून उठले वादळ

By admin | Updated: May 13, 2014 04:22 IST

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिडीओ’वरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.

 नवी दिल्ली : भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिडीओ’वरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. ऐन मतदानाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलेल्या या ‘व्हिडीओ’त मोदी यांनी वाराणशीतील नागरिकांना एकता व बंधुतेच्या भावनेचे दर्शन करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. शिवाय वाराणशीतील गंगाजमुना संस्कृतीचीदेखील प्रशंसा केली. दरम्यान, कॉंग्रेसने मात्र या ‘व्हिडीओ’वर आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. वाराणशीतून निवडणूक लढणार्‍या मोदी यांनी या ‘व्हिडीओ’च्या माध्यमातून गंगा मातेचा आशीर्वाद मागितला आणि या पवित्र शहराच्या परंपरेला कायम ठेवण्याचे लक्ष्य असायला हवे. निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात नागरिकांनी उत्साह व एकात्मतेच्या भावनेने मतदान करावे. वाराणशीचा सन्मान शांती, बंधुता आणि एकतेतच आहे. यालाच गंगा-जमुना संस्कृती असे म्हटले जाते. हीच बाब मतदानातदेखील झळकली पाहिजे असे ते म्हणाले. कोट्यवधी लोक इतक्या भीषण गरमीतदेखील निवडणूकांत उत्साहाने सहभागी होत आहे याचे पाश्चिमात्य देशांना या गोष्टीचे विश्लेषण करायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘आप’ची निवडणूक आयोगावर टीका आम आदमी पक्षाने ‘व्हिडीओ’ दाखविणार्‍या वृत्तवाहिन्यांवर कडक ताशेरे ओढत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ज्या वृत्तवाहिन्यांनी मोदी यांचा ‘व्हिडीओ’ प्रसारित केला त्यांच्यावर आयोगाने काहीच कारवाई केलेली नाही. आयोगाच्या या भुमिकेमुळे मोठा धक्का बसल्याचे मत ‘आप’तर्फे व्यक्त करण्यात आले आहे. ‘आप’ने देखील कॉंग्रेसची री ओढत निवडणूक आयोगाला पत्र लिहीले. संपूर्ण देशाला माहित आहे की मोदी हे वाराणशीतून निवडणूक लढत आहेत. ऐन मतदानाच्या दिवशी मोदी यांचे भाषण करणे हा मतदारांना प्रभावित करण्याचाच प्रकार आहे. या तक्रारीनंतर तरी निवडणूक आयोगाला जाग येईल आणि जनतेला तातडीची कारवाई पहायला मिळेल अशी टिप्पणी पत्रात करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता ही देशातील सर्व नागरिकांसाठी लागू असते. वृत्तवाहिन्या याला अपवाद नाहीत. निवडणूका स्वतंत्र व निष्पक्ष वातावरणात झाल्या पाहिजेत ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. परंतु उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना आयोगाने वृत्तवाहिन्यांवर कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही असा प्रश्न ‘आप’तर्फे उपस्थित करण्यात आला आहे.