शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

मोदींंच्या ‘व्हिडीओ’ वरून उठले वादळ

By admin | Updated: May 13, 2014 04:22 IST

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिडीओ’वरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.

 नवी दिल्ली : भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिडीओ’वरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. ऐन मतदानाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलेल्या या ‘व्हिडीओ’त मोदी यांनी वाराणशीतील नागरिकांना एकता व बंधुतेच्या भावनेचे दर्शन करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. शिवाय वाराणशीतील गंगाजमुना संस्कृतीचीदेखील प्रशंसा केली. दरम्यान, कॉंग्रेसने मात्र या ‘व्हिडीओ’वर आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. वाराणशीतून निवडणूक लढणार्‍या मोदी यांनी या ‘व्हिडीओ’च्या माध्यमातून गंगा मातेचा आशीर्वाद मागितला आणि या पवित्र शहराच्या परंपरेला कायम ठेवण्याचे लक्ष्य असायला हवे. निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात नागरिकांनी उत्साह व एकात्मतेच्या भावनेने मतदान करावे. वाराणशीचा सन्मान शांती, बंधुता आणि एकतेतच आहे. यालाच गंगा-जमुना संस्कृती असे म्हटले जाते. हीच बाब मतदानातदेखील झळकली पाहिजे असे ते म्हणाले. कोट्यवधी लोक इतक्या भीषण गरमीतदेखील निवडणूकांत उत्साहाने सहभागी होत आहे याचे पाश्चिमात्य देशांना या गोष्टीचे विश्लेषण करायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘आप’ची निवडणूक आयोगावर टीका आम आदमी पक्षाने ‘व्हिडीओ’ दाखविणार्‍या वृत्तवाहिन्यांवर कडक ताशेरे ओढत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ज्या वृत्तवाहिन्यांनी मोदी यांचा ‘व्हिडीओ’ प्रसारित केला त्यांच्यावर आयोगाने काहीच कारवाई केलेली नाही. आयोगाच्या या भुमिकेमुळे मोठा धक्का बसल्याचे मत ‘आप’तर्फे व्यक्त करण्यात आले आहे. ‘आप’ने देखील कॉंग्रेसची री ओढत निवडणूक आयोगाला पत्र लिहीले. संपूर्ण देशाला माहित आहे की मोदी हे वाराणशीतून निवडणूक लढत आहेत. ऐन मतदानाच्या दिवशी मोदी यांचे भाषण करणे हा मतदारांना प्रभावित करण्याचाच प्रकार आहे. या तक्रारीनंतर तरी निवडणूक आयोगाला जाग येईल आणि जनतेला तातडीची कारवाई पहायला मिळेल अशी टिप्पणी पत्रात करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता ही देशातील सर्व नागरिकांसाठी लागू असते. वृत्तवाहिन्या याला अपवाद नाहीत. निवडणूका स्वतंत्र व निष्पक्ष वातावरणात झाल्या पाहिजेत ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. परंतु उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना आयोगाने वृत्तवाहिन्यांवर कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही असा प्रश्न ‘आप’तर्फे उपस्थित करण्यात आला आहे.