शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

वाढत्या उष्म्याने बदलली दिनचर्या

By admin | Updated: March 4, 2017 01:20 IST

मावळ तालुक्यातील वाढत्या उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत.

कामशेत : मावळ तालुक्यातील वाढत्या उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे अनेकांच्या दिनचर्येत बदल झाला आहे.मार्च महिन्याच्या सुरवातीलाच दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. शहरातील रस्त्यावरही दुपारची वाहतूक कमी होत आहे. येथील हॉटेलांमध्ये चहाऐवजी शीतपेयांना मागणी वाढली आहे. ठिकठिकाणी रसवंतीगृहही सुरू करण्यात आली आहेत. तिथेही नागरिकांची गर्दी वाढत आहे. लिंबू सरबत, लस्सी व ताकालाही पसंती मिळत आहे. फळविक्रेत्यांनी फळांची आकर्षक मांडणी करून दुकाने थाटली आहेत. तिथेही वर्दळ वाढली आहे.उन्हाच्या दाहकतेचा जनजीवनावर प्रभाव पडू लागला आहे. शेतकरी, व्यापारी, व ग्राहक सर्वांच्याच दिनचर्येत बदल झाले आहेत. दुपारच्या वेळी ग्रामीण भागातही शांतता दिसत आहे. तसेच जनावरांनाही सावलीच्या ठिकाणी बांधले जात आहे. काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उन्हाची तीव्रता अशीच राहिल्यास तालुक्यातील ठिकठिकाणी असलेले पाणीसाठे कमी होऊन काही गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे काही दिवसांपूर्वी कामशेत शहरात गरीबांचा फ्रीज अर्थात माठ राजस्थान, बिहार राज्यांमधूनमधून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. विविध आकार, नळ नसलेले, नळ असलेले माठ मिळत आहेत. काळे व लाल रंगाचे माठ खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य लोक गर्दी करीत आहेत.राजस्थान उत्तर प्रदेश व बिहारचे व्यवसायिक डोक्यावर माठांची कामशेत व आजूबाजूच्या गावांमध्ये विक्री करताना दिसत आहेत. कामशेत ेमावळातील प्रमुख शहरांपैकी एक असल्याने येथे माठ आणून नंतर आजूबाजूंच्या गावात प्रवासी वाहनांनी नेऊन व डोक्यावर विक्री करताना परिसरात दिसत आहेत. सर्वसामान्य माणसांना फ्रीज घेणे परवडणारे नसल्याने यांचा ओढा या माठाकडे आहे. शिवाय माठातील थंडगार पाणी प्यायल्यानंतर तहान भागते. फ्रीजमधील थंड पाण्याने तो अनुभव येत नसल्याने माठांना पसंती दिली जात आहे. वाढत्या गर्मीमुळे या माठ व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. हिवाळ्यात बंद असलेले पंखे, कुलर आता घरोघरी फिरू लागले आहेत. विजेचा वापर वाढला आहे. दुपारी गारवा मिळण्यासाठी नदीवर स्नानासाठी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. (वार्ताहर)> शीतपेयांना मागणी : कलिंगडांची विक्री वाढलीहॉटेलमध्ये सॉफ्ट ड्रिंक्स, लस्सी, ताक, फळांचा रस, लिंबू आणि इतर सरबतांना मागणी वाढली आहे. भाजी विक्रेत्यांकडून कलिंगड, खरबूज, काकडी, कैऱ्या आदी फळे खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. उन्हाची तीव्रता डोळ्यांना कमी जाणवावी यासाठी दुचाकीस्वार गॉगल घालताना दिसत आहेत.