शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

कसारा घाटात जनशताब्दीवर दरोडा

By admin | Updated: February 4, 2016 04:31 IST

औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करून तिच्याकडील पर्स आणि अंगावरील दागिने असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोराने पोबारा केला

कसारा : औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करून तिच्याकडील पर्स आणि अंगावरील दागिने असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोराने पोबारा केला. भरदुपारी साडेबाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर प्रवाशांनी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केली खरी, पण कल्याण व इगतपुरी रेल्वे पोलिसांत हद्दीचा वाद असल्याने उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तसेच बेकायदा फेरीवाले-गर्दुल्ल्यांवर संशय व्यक्त होऊनही पोलिसांनी तातडीने कोणतीच कारवाई केली नाही. या मार्गावर आठवडाभरात घडलेली ही दुसरी घटना असून आठ दिवसांपूर्वी कल्याणच्या प्रवाशांना कसारा रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांनी बाटल्यांनी मारहाण केली होती. त्यातील जखमी प्रवासी अद्याप कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार घेत आहेत.औरंगाबादहून कुर्ला येथे निघालेल्या समरीन बेगम (२३) भाऊ सलीम यांच्यासोबत डी-७ या कोचमध्ये बसल्या होत्या. इगतपुरीत गाडी आल्यावर त्यांनी सामानाची आवराआवर केली आणि नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृहाकडे गेल्या. स्वच्छतागृहात दबा धरून बसलेल्या व्यक्तीने त्यांचा गळा दाबला आणि त्या ओरडू नयेत म्हणून नंतर तोंड दाबून धरले. पोटात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात, त्या बेशुद्ध पडल्या. त्यांच्याकडील रोख रक्कम, पर्स आणि अंगावरील दागिने लुटून बेशुद्धावस्थेत त्यांना तसेच टाकून घाटात गाडीचा वेग कमी झाल्यावर तो पळून गेला. बराच वेळ होऊनही बहीण न आल्याने सलीमने स्वच्छतागृहात शोध घेतला. त्या बेशुद्धावस्थेत सापडल्या. त्याने आरडाओरड करीत सहप्रवाशांच्या मदतीने त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. अखेर, प्रवाशांनी चेन खेचून गाडी थांबवली. स्थानिक रेल्वे पोलिसांनी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने आधी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रकृती चिंताजनक बनल्याने ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय झाला. तोवर, रेल्वे पोलीस देवरे यांनी कुर्ला येथील त्यांच्या नातेवाइकांना घटना कळविल्यानंतर त्यांनी समरीन यांना कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. बेदम मारहाणीमुळे त्यांची प्रकृती गंभीर बनल्याचे आणि त्यांना या घटनेचा मानसिक धक्का बसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (वार्ताहर)टोळी कार्यरतकल्याण ते कसारा आणि पुढे नाशिक मार्गावर गाडीतील प्रवाशांना लुटणारी टोळी कार्यरत असून बंदी असतानाही ते गुटखा, तंबाखूसह अन्य वस्तू विकतात आणि ते करताकरता प्रवाशांच्या किमती वस्तू लंपास करतात. त्याची माहिती वेळोवेळी रेल्वे पोलिसांना देऊनही फरक पडत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.———————रेल्वे कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की आरपीएफचे कर्मचारी, जीआरपी कर्मचाऱ्यांनाही या फेरीवाल्यांनी अनेकदा धक्काबुक्की केली, पण हप्ते आणि पेशाची इभ्रत राहावी म्हणून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. उलट, काही कर्मचाऱ्यांनी बदली करून घेणे किंवा गप्प बसणे पसंत केले.रेल्वे स्थानकांवर पाणी, गुटखा, तंबाखू, वडापाव विकणारे सुमारे ४५० हून अधिक परप्रांतीय फेरीवाले असून त्यातील बहुतांश उत्तर प्रदेशातील भिंडचे असल्याचे समजते. त्यांच्याकडे ओळखपत्रे नाहीत. सर्व जण बेकायदा व्यवसाय करतात. दादागिरी करणे, प्रवाशांना मारहाण करणे, असे प्रकार कसारा स्थानकात कायमच घडतात. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी हप्ता घेत असल्याने सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला.