शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कसारा घाटात जनशताब्दीवर दरोडा

By admin | Updated: February 4, 2016 04:31 IST

औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करून तिच्याकडील पर्स आणि अंगावरील दागिने असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोराने पोबारा केला

कसारा : औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करून तिच्याकडील पर्स आणि अंगावरील दागिने असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोराने पोबारा केला. भरदुपारी साडेबाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर प्रवाशांनी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केली खरी, पण कल्याण व इगतपुरी रेल्वे पोलिसांत हद्दीचा वाद असल्याने उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तसेच बेकायदा फेरीवाले-गर्दुल्ल्यांवर संशय व्यक्त होऊनही पोलिसांनी तातडीने कोणतीच कारवाई केली नाही. या मार्गावर आठवडाभरात घडलेली ही दुसरी घटना असून आठ दिवसांपूर्वी कल्याणच्या प्रवाशांना कसारा रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांनी बाटल्यांनी मारहाण केली होती. त्यातील जखमी प्रवासी अद्याप कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार घेत आहेत.औरंगाबादहून कुर्ला येथे निघालेल्या समरीन बेगम (२३) भाऊ सलीम यांच्यासोबत डी-७ या कोचमध्ये बसल्या होत्या. इगतपुरीत गाडी आल्यावर त्यांनी सामानाची आवराआवर केली आणि नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृहाकडे गेल्या. स्वच्छतागृहात दबा धरून बसलेल्या व्यक्तीने त्यांचा गळा दाबला आणि त्या ओरडू नयेत म्हणून नंतर तोंड दाबून धरले. पोटात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात, त्या बेशुद्ध पडल्या. त्यांच्याकडील रोख रक्कम, पर्स आणि अंगावरील दागिने लुटून बेशुद्धावस्थेत त्यांना तसेच टाकून घाटात गाडीचा वेग कमी झाल्यावर तो पळून गेला. बराच वेळ होऊनही बहीण न आल्याने सलीमने स्वच्छतागृहात शोध घेतला. त्या बेशुद्धावस्थेत सापडल्या. त्याने आरडाओरड करीत सहप्रवाशांच्या मदतीने त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. अखेर, प्रवाशांनी चेन खेचून गाडी थांबवली. स्थानिक रेल्वे पोलिसांनी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने आधी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रकृती चिंताजनक बनल्याने ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय झाला. तोवर, रेल्वे पोलीस देवरे यांनी कुर्ला येथील त्यांच्या नातेवाइकांना घटना कळविल्यानंतर त्यांनी समरीन यांना कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. बेदम मारहाणीमुळे त्यांची प्रकृती गंभीर बनल्याचे आणि त्यांना या घटनेचा मानसिक धक्का बसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (वार्ताहर)टोळी कार्यरतकल्याण ते कसारा आणि पुढे नाशिक मार्गावर गाडीतील प्रवाशांना लुटणारी टोळी कार्यरत असून बंदी असतानाही ते गुटखा, तंबाखूसह अन्य वस्तू विकतात आणि ते करताकरता प्रवाशांच्या किमती वस्तू लंपास करतात. त्याची माहिती वेळोवेळी रेल्वे पोलिसांना देऊनही फरक पडत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.———————रेल्वे कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की आरपीएफचे कर्मचारी, जीआरपी कर्मचाऱ्यांनाही या फेरीवाल्यांनी अनेकदा धक्काबुक्की केली, पण हप्ते आणि पेशाची इभ्रत राहावी म्हणून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. उलट, काही कर्मचाऱ्यांनी बदली करून घेणे किंवा गप्प बसणे पसंत केले.रेल्वे स्थानकांवर पाणी, गुटखा, तंबाखू, वडापाव विकणारे सुमारे ४५० हून अधिक परप्रांतीय फेरीवाले असून त्यातील बहुतांश उत्तर प्रदेशातील भिंडचे असल्याचे समजते. त्यांच्याकडे ओळखपत्रे नाहीत. सर्व जण बेकायदा व्यवसाय करतात. दादागिरी करणे, प्रवाशांना मारहाण करणे, असे प्रकार कसारा स्थानकात कायमच घडतात. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी हप्ता घेत असल्याने सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला.