शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रीमाचा चेहऱ्यातील मोहकपणा अखेरपर्यंत टिकून - जब्बार पटेल

By admin | Updated: May 19, 2017 01:13 IST

मोहन तोंडवळकर यांच्या नाटकात, रीमाला पहिल्यांदा पाहिले होते, त्या वेळेस ती १८-१९ वर्षांची असेल. त्या वेळी तिचे रंगभूमीवरील काम पाहून सगळेच थक्क झाले होते.

मोहन तोंडवळकर यांच्या नाटकात, रीमाला पहिल्यांदा पाहिले होते, त्या वेळेस ती १८-१९ वर्षांची असेल. त्या वेळी तिचे रंगभूमीवरील काम पाहून सगळेच थक्क झाले होते. नाटक मुरण्यापूर्वीच ती एखाद्या अनुभवी अभिनेत्रीसारखी सहज रंगमंचावर वावरत होती. त्यादरम्यान, ‘सिंहासन’ सिनेमासाठी नट-नट्यांचा शोध सुरू होता, याच सिनेमातून मराठी सिनेनाट्य सृष्टीला ‘रीमा’च्या रूपाने नवीन फ्रेश चेहरा मिळाला. या राजकीय पटात रीमाने केलेली भूमिका, तिच्या डोळ््यांतील भाव, तिचा अभिनय सगळ््यानेच वाहवा मिळविली. तिच्या चेहऱ्यात जो मोहकपणा होता तो तिने शेवटपर्यंत टिकवून ठेवला होता. ती नाटकातून बाहेर आली, नंतर सिनेमेदेखील बंद केले. रीमाने गेली ७ ते ८ वर्षे सिनेमात काम करणे बंद केले होते. ती थकलीही होती, की आता काही वेगळी भूमिका करायला मिळत नाही म्हणून. तिने बहुतेक भूमिका नाकारल्या होत्या. आता किती वेळा आईची भूमिका करायची? नकोसे वाटते. त्यामुळे रीमाने त्याच त्याच भूमिका नाकारल्या; पण शेवटपर्यंत तिचा मोहकपणा जो होता तो तिने टिकवून ठेवला होता. मराठी सिनेमात ती बऱ्यापैकी गाजली; पण हिंदी सिनेमात लोकांनी तिला जे घेतले ना त्याचे कारण असे की, फार कमी चेहरे असे असतात की, ज्यामध्ये एक प्रकारे चेहऱ्यांमध्ये पावित्र्याची भावना दिसते, असे खूप कमी चेहरे असतात. वास्तविक पाहता, ती हिंदी सिनेमात आली ना तर तिने प्रेमळ आई आणि मोठी बहीण, अशा भूमिका केल्या. हिंदी भूमिकेत तिला ‘खल’भूमिकांऐवजी, आईच्याच भूमिका मिळाल्या. आवाज, देहबोली अशा गुणाने सर्वगुण संपन्न होती. तिला भूमिकेची समज चांगली होती. मला ती सारखी म्हणायची की, ‘जब्बार मला तुझ्याबरोबर काम करायचे आहे. मला एखादे एकपात्री काम दे. मला आता चांगल्या भूमिका नाही मिळत,’ अशी ती म्हणायची. मी तिला म्हणायचो की, ‘तू आता भूमिकेचा नाद सोडून दे आणि एखादी कादंबरी घे आणि त्यात एकपात्री काही करता येईल असे कर, अशी प्रभावी भूमिका कर की, त्यात स्त्रीची अनेक रूपे दिसली पाहिजेत,’ नाटकात मी तिच्याबरोबर कामे केली नाहीत कारण, ती कमर्शियल नाटकात होती. पहिल्यांदा, ‘सिंहासन’ झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर ती हिंदी सिनेमात प्रचंड व्यस्त होती. तेव्हा ती म्हणाली की, ‘मला तुमच्या सिनेमामध्ये काम करायचे आहे.’ अतिशय वेगळ््या प्रकारची भूमिका होती. उच्चवर्गीय आणि दलित समाजातील मुलगा यांच्या प्रेमसंबंधांची गोष्ट आहे. अशा प्रभावी राजकीय कुटुंबातली मुलगी, अशी भूमिका होती. ती मुलगी एका आंदोलनकर्त्यां दलित मुलाच्या प्रेमात पडते. अशा भूमिकेसाठी रीमा ही एकमेव होती. तिच्या डोळ््यात प्रेमळपणा आणि करारीपणा दिसून येत होता. तिच्या गालाची जी उभारी होती त्यातच एक मूलत: करारीपण होते. तो हवा होता त्या भूमिकेसाठी. एक आव्हानात्मक असे होते, मी शिरवाडकरांच्या वरती एक चित्रपट केला ‘प्रवासी पक्षी’ नावाचा. त्यात स्वत: कुसुमाग्रज आहेत. दीड तासांची फिल्म आहे. तात्यासाहेबांच्या नाटकामधील एक भाग होता. ‘कौन्तेय’ नावाच शिरवाडकरांचे एक नाटक आहे. कौन्तेय नाटकाचा एक भाग मला करायचा होता. कौन्तेय म्हणजे, कुंतीचा मुलगा कर्ण. युद्धाच्या छावणीमध्ये कुंती हिला माहीत असते की, पाच पांडव आणि कौरवांच्या बाजूने उभा असलेला कर्ण याचे युद्ध अटल आहे. यामध्ये भाऊ भाऊच एकमेकांना मारणार आहेत. कुंतीला माहीत होते की, बाबा रे तूदेखील पाच पांडवांच्या पैकीच एक आहेस. हे रहस्य तिने इतकी वर्षे लपवून ठेवले होते. हे सांगायला युद्धाच्या छावणीत कर्णाच्या भेटीला कुंती येते, या प्रसंगाचा भाग आहे. जवळ-जवळ ७ ते ८ मिनिटांचा प्रसंग आहे. त्यामध्ये मला असे वाटले की, कुंतीची भूमिका ही रीमाच करू शकते. आता कर्ण कोण, तर विक्रम गोखले याला कर्णाची भूमिका देण्यात आली. तीन-चार दिवस सराव करून मग ते चित्रित करण्यात आले. यामध्ये अप्रतिम भूमिका रीमाने केलेली आहे. - मुक्ता बर्वेने काढलेले नाटक ‘छापा काटा’ त्यामध्येही रीमाने अप्रतिम काम केले. तेव्हा ती म्हणाली की, असे काही फार कमी मिळते करायला. समारंभाच्या वेळी आम्ही भेटलो की, जेव्हा घरी जायच्या वेळेत आमच्या दोघांच्या गाड्या असतानाही, आम्ही एका कोणाच्या तरी गाडीने बोलत बोलत जायचो. कारण असे की, आता आम्ही मुंबईमध्ये राहतो, तर रीमा शास्त्रीनगरमध्ये राहते. तिथेच पुढच्या इमारतीमध्ये मी राहतो. ती मला एका ‘झी’च्या कार्यक्रमाला भेटली होती, तेव्हा आम्ही एकत्र आलो होतो. तेव्हा ती म्हणायची, ‘एखादी चांगली भूमिका असेल तर सांग, त्याच त्याच भूमिका नको वाटतात.’ - तिच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहून मला कधी वाटलेही नाही की, ही बाई अशी अचानक निघून जाईल. आजारपणामुळे तिचे इतके हालही झाले नाहीत. बिचारी कोणालाही त्रास न देता गेली. तिच्या पहिल्या सिनेमाचा मी दिग्दर्शक होतो, याचा मला आनंद आहे.- फार वेगळ््या स्वभावाची, वेगळ््या टॅलेंटची, अशी आगळी-वेगळी मुलगी होती. मला असे वाटते की, अजून १० वर्षे तरी तिच्या वाट्याला उत्तम नाटकांच्या भूमिका आल्या असत्या.- नाटकापेक्षा रीमाने सिनेमात नक्कीच चांगल्या भूमिका केल्या असत्या. त्यामुळे एक चांगली अभिनेत्री आपण नक्कीच गमावलेली आहे. मी तिला ४० वर्षांपासून पाहतोय, तिला वाढताना आणि खुलताना पाहिलेले आहे. - विशेष म्हणजे, तिने स्वत:च्या कर्तृत्वावर सगळे कमावले होते. या नटांचे मला प्रचंड कौतुक आहे. त्यातलीच एक रीमा लागू होती. अकाली जाणे जे असते ना, ते भयंकर त्रासदायक असते. याचा रीमा गेल्याने फार त्रास झाला. तिच्या मनातच राहिले चांगलं करण्यासारखे. - तिच्यात इतके अभिनयाचे गुण होते, बुद्धिमत्ता होती, कल्पकता होती, सगळेच गुण होते. सुंदर आणि आकर्षक होती दिसायला. जर काही करायचे राहून गेले ना, तर याचे खूप वाईट वाटते. अशा गुणी कलांवताचे अकाली जाणे, हे त्रासदायक असते. (शब्दांकन : सागर नेवरेकर)