शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार शेतकऱ्यांचा हक्क हिरावला !

By admin | Updated: February 1, 2015 01:23 IST

महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवर वर्षानुवर्षे उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने त्या जमिनीचे हक्क देण्याचा निर्णय घेतला.

मंगेश व्यवहारे - नागपूरमहसूल आणि वन विभागाच्या जमिनीवर वर्षानुवर्षे उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने त्या जमिनीचे हक्क देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकारकडे ९० हजार ४५२ शेतकऱ्यांनी दावे सादर केले. सरकारने यापैकी ३६ हजार ५१६ दावे निकाली काढले, तर सुमारे ५५ हजार दावे नाकारले गेले. काहींचे दावे प्रलंबित ठेवल्याने वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी १९७०च्या काळात सरकारच्या पडीक जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क मिळावेत, यासाठी राज्यव्यापी आंदोलन केले होते. याची दखल घेत ३१ मार्च १९७८ रोजी तत्कालीन सरकारने संबंधित भोगवटादारांना जमिनीचे हस्तांतरण करावे, असे आदेश दिले होते. मात्र त्या वेळी याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर २८ नोव्हेंबर १९९१ला सरकारने परत शासन निर्णय काढून १४ एप्रिल १९९० पर्यंत अतिक्रमण करून शेती वाहत असणाऱ्या भोगवटादाराच्या नावावर जमिनी कराव्यात, असा आदेश दिला. त्यावेळी सरकारने केलेल्या सर्वेक्षणात मागासवर्ग प्रवर्गात ५३ हजार ३७९ व इतर वर्गांतील ३९ हजार ८५१ जणांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले होते. अतिक्रमण केलेली जमीन १ लाख ८ हजार ९१५ हेक्टर होती. नियम बनले, शासन निर्णय झाला; मात्र प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पुन्हा ही प्रक्रिया खोळंबली. यासंदर्भात २०१० मध्ये निवृत्त तहसीलदाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याची दखल घेत सरकारने अतिक्रमणधारकांची यादी तयार करून, ती यादी ग्रामपंचायत व तहसीलस्तरावर लावावी. जिल्ह्याच्या संकेतस्थळावर यादी टाकावी, अतिक्रमणधारकांना माहिती द्यावी, असे आदेश सरकारला दिले. त्यानुसार सरकारी यंत्रणेने अतिक्रमणधारकांचे दावे स्वीकारण्यास सुरुवात केली. अतिक्रमणधारकांचे जवळपास ९०,४५२ दावे सरकारला प्राप्त झाले. यापैकी सरकारने केवळ ३६ हजार ५१६ दावे नियमित केले, तर ३७ हजार ६९५ दावे नाकारले व १६ हजार २४१ दावे प्रलंबित ठेवले. ज्या अतिक्रमणधारकांचे दावे नाकारले अथवा ज्यांचे दावे प्रलंबित ठेवले, त्या शेतकऱ्यांना सध्या शेती करण्याला अडचणी येत आहेत. सोयीसाठी नाकारले दावेजमिनीचे हस्तांतरण शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी मोठी प्रशासकीय कसरत करावी लागते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश मिळवून शेतकऱ्यांच्या नावावर नवीन सातबारा चढवावा लागतो. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने प्रशासकीय अधिकारी थेट दावे नाकारून या भानगडीपासून स्वत:ची सुटका करून घेतात. अनेक प्रकरणात छोटे-मोठे कारण दाखवून दावे नाकारल्याचे अनेक प्रकरण पुढे आले आहेत. - अ‍ॅड. निहालसिंग राठोड, ह्युमन राइट्स लॉ नेटवर्कसंघर्ष वाहिनीची आंदोलनाची भूमिका सरक ारने नाकारलेले दावे व प्रलंबित ठेवलेले दावे याच्या कारणांचा शोध संघर्ष वाहिनी घेत आहे. तसेच संघर्ष वाहिनी व दिल्लीच्या ह्युमन राइट्स लॉ नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय जमीन हक्क परिषद होणार आहे. या परिषदेत जमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार आहे. - दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्ष वाहिनीविभाग प्राप्त निकाली दावेकाढलेले प्रलंबित कोकण६,२०५१,९७८४,२२७नाशिक५,२३२२,५३४२,६९८पुणे१,२४२ ४३७८०५नागपूर ४१,०३९६,५३६३४,५०३अमरावती १०,४९७८,६७४१,८२३औरंगाबाद२६,२३७१६,३५७९,८८०