शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

६० हजार शेतकऱ्यांचा हक्क हिरावला !

By admin | Updated: February 1, 2015 01:23 IST

महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवर वर्षानुवर्षे उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने त्या जमिनीचे हक्क देण्याचा निर्णय घेतला.

मंगेश व्यवहारे - नागपूरमहसूल आणि वन विभागाच्या जमिनीवर वर्षानुवर्षे उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने त्या जमिनीचे हक्क देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकारकडे ९० हजार ४५२ शेतकऱ्यांनी दावे सादर केले. सरकारने यापैकी ३६ हजार ५१६ दावे निकाली काढले, तर सुमारे ५५ हजार दावे नाकारले गेले. काहींचे दावे प्रलंबित ठेवल्याने वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी १९७०च्या काळात सरकारच्या पडीक जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क मिळावेत, यासाठी राज्यव्यापी आंदोलन केले होते. याची दखल घेत ३१ मार्च १९७८ रोजी तत्कालीन सरकारने संबंधित भोगवटादारांना जमिनीचे हस्तांतरण करावे, असे आदेश दिले होते. मात्र त्या वेळी याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर २८ नोव्हेंबर १९९१ला सरकारने परत शासन निर्णय काढून १४ एप्रिल १९९० पर्यंत अतिक्रमण करून शेती वाहत असणाऱ्या भोगवटादाराच्या नावावर जमिनी कराव्यात, असा आदेश दिला. त्यावेळी सरकारने केलेल्या सर्वेक्षणात मागासवर्ग प्रवर्गात ५३ हजार ३७९ व इतर वर्गांतील ३९ हजार ८५१ जणांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले होते. अतिक्रमण केलेली जमीन १ लाख ८ हजार ९१५ हेक्टर होती. नियम बनले, शासन निर्णय झाला; मात्र प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पुन्हा ही प्रक्रिया खोळंबली. यासंदर्भात २०१० मध्ये निवृत्त तहसीलदाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याची दखल घेत सरकारने अतिक्रमणधारकांची यादी तयार करून, ती यादी ग्रामपंचायत व तहसीलस्तरावर लावावी. जिल्ह्याच्या संकेतस्थळावर यादी टाकावी, अतिक्रमणधारकांना माहिती द्यावी, असे आदेश सरकारला दिले. त्यानुसार सरकारी यंत्रणेने अतिक्रमणधारकांचे दावे स्वीकारण्यास सुरुवात केली. अतिक्रमणधारकांचे जवळपास ९०,४५२ दावे सरकारला प्राप्त झाले. यापैकी सरकारने केवळ ३६ हजार ५१६ दावे नियमित केले, तर ३७ हजार ६९५ दावे नाकारले व १६ हजार २४१ दावे प्रलंबित ठेवले. ज्या अतिक्रमणधारकांचे दावे नाकारले अथवा ज्यांचे दावे प्रलंबित ठेवले, त्या शेतकऱ्यांना सध्या शेती करण्याला अडचणी येत आहेत. सोयीसाठी नाकारले दावेजमिनीचे हस्तांतरण शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी मोठी प्रशासकीय कसरत करावी लागते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश मिळवून शेतकऱ्यांच्या नावावर नवीन सातबारा चढवावा लागतो. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने प्रशासकीय अधिकारी थेट दावे नाकारून या भानगडीपासून स्वत:ची सुटका करून घेतात. अनेक प्रकरणात छोटे-मोठे कारण दाखवून दावे नाकारल्याचे अनेक प्रकरण पुढे आले आहेत. - अ‍ॅड. निहालसिंग राठोड, ह्युमन राइट्स लॉ नेटवर्कसंघर्ष वाहिनीची आंदोलनाची भूमिका सरक ारने नाकारलेले दावे व प्रलंबित ठेवलेले दावे याच्या कारणांचा शोध संघर्ष वाहिनी घेत आहे. तसेच संघर्ष वाहिनी व दिल्लीच्या ह्युमन राइट्स लॉ नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय जमीन हक्क परिषद होणार आहे. या परिषदेत जमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार आहे. - दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्ष वाहिनीविभाग प्राप्त निकाली दावेकाढलेले प्रलंबित कोकण६,२०५१,९७८४,२२७नाशिक५,२३२२,५३४२,६९८पुणे१,२४२ ४३७८०५नागपूर ४१,०३९६,५३६३४,५०३अमरावती १०,४९७८,६७४१,८२३औरंगाबाद२६,२३७१६,३५७९,८८०