शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ’

By admin | Updated: April 16, 2016 02:08 IST

बंदरांच्या विकासासाठी शासनाने सर्वंकष धोरण आखले असून, ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’च्या माध्यमातून विविध परवानग्या देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात गुंतवणूक करण्याची

मुंबई : बंदरांच्या विकासासाठी शासनाने सर्वंकष धोरण आखले असून, ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’च्या माध्यमातून विविध परवानग्या देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंतवणूकदारांना केले.गोरेगाव येथील मेरिटाइम इंडिया समिटमधील चर्चासत्रात ते बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत बंदर विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राला बंदर विकासाची समृद्ध परंपरा लाभली आहे. मुंबई देशाच्या सागरी विकासाचे केंद्र असून, येथे जागतिक दर्जाची जहाजे बांधली जातात. त्यामुळे राज्य सरकारने सर्वंकष असे बंदर विकास धोरण तयार केले आहे. इज आॅफ डुइंग बिझनेस या संकल्पनेवरील या धोरणामुळे राज्यात गुंतवणुकीला चालना मिळत आहे.सागरमाला प्रकल्पाबरोबरच राज्यातील बंदरे जोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वाढवन बंदराच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत केंद्र सरकारशी करार झाला आहे. बंदरांच्या विकासातून अर्थव्यवस्थेला गती देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नवीन बंदरांची निर्मिती, जेट्टींचा विकास, जहाजबांधणी आदी विविध विषयांबाबतचा आढावा घेताना गुंतवणूकदारांनी राज्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यापैकी ७ सामंजस्य करार महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे तर एक सामंजस्य करार एमटीडीसी आणि जेएनपीटीमध्ये होता. चर्चासत्रासाठी उद्योजक, गुंतवणूकदार, गोवा, कर्नाटक, गुजरात, केरळ या सागरीसीमा असलेल्या राज्यांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ब्रिक्स देशांमध्ये नवे पर्व सुरू होईलब्रिक्स देशांच्या शहरांमधील समस्या आणि आव्हाने ही जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे एकमेकांचे अनुभव आणि कल्पनांच्या देवाणघेवाणीतून शहरांचा विकास करणे अधिक सुलभ होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून ब्रिक्स देशांमध्ये अशा सहकार्याच्या एका नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.तीन दिवसीय ब्रिक्स मैत्री शहरे परिषदेत सहभागी झालेल्या रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन केले. राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून, उद्योग उभारणीसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधो उपलब्ध आहेत. तसेच औद्योगिकरणाला गती देण्यासाठी ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ची संकल्पना राबविण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटी योजना, नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण, नवीन बंदर धोरणांची माहिती दिली. दरम्यान, रशियाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना रशिया भेटीचे निमंत्रण दिले.