शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

डाव्यांच्या बेइमानीमुळे उजवे माजले

By admin | Updated: January 18, 2016 03:51 IST

डाव्यांनी वेळोवेळी बेइमानी केल्यानेच उजवे माजले आहेत. डाव्यांचा प्रभाव वलय नाहीसा झाल्यानेच उजव्यांकडून विचारवंतांच्या हत्या होत आहेत

कोल्हापूर : डाव्यांनी वेळोवेळी बेइमानी केल्यानेच उजवे माजले आहेत. डाव्यांचा प्रभाव वलय नाहीसा झाल्यानेच उजव्यांकडून विचारवंतांच्या हत्या होत आहेत, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी रविवारी व्यक्त केले. येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये आयोजित बहुभाषिक राष्ट्रीय परिषदेत ‘अभिव्यक्ती के सारे खतरे उठाने पडेंगे’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डाव्या विचारसरणीच्या व्यासपीठावरून खान यांनी डाव्यांच्या चुकीच्या मानसिकतेवर अतिशय जहाल शब्दांत प्रहार केला. खान म्हणाले, बहुतांश समाजवादी आणि डाव्या लोकांत ढोंगीपणा दिसतो. सत्तेच्या आणि खुर्चीच्या लालसेपोटी डावे तत्त्वे गुंडाळून ठेवून उजव्यांच्या वळचणीला गेल्याचा इतिहास आहे. ते विखुरले, विस्कळीत झाले. याउलट उजवे कट्टर राहिले. ते जात, धर्म, लिंग या अजेंड्यावर राजकारण आणि समाजकारण यशस्वी करीत राहिले. अशा टप्प्यात डाव्या विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन चळवळ बळकट करणे गरजेचे होते. आता तरी डाव्यांनी कट्टर राहायला हवे. प्रा. एन.डी. पाटील म्हणाले, राज्यघटनेनुसार देश चालतो; धर्मसंसदेनुसार नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे. महात्मा फुले यांनी मांडलेल्या समाजव्यवस्थेची अंमलबजावणी झाली पाहिजे. (प्रतिनिधी)