शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

अंधेरीत अज्ञात व्यक्तींकडून रिक्षाची जाळपोळ, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर रिक्षा जाळल्याचा संशय

By admin | Updated: March 11, 2016 00:06 IST

रस्त्यालगत उभी असलेल्या एका रिक्षाला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना गुरुवारी रात्री अंधेरी आरटीओ बाहेर घडली. ही रिक्षा मनसे कार्यकर्त्यांनीच जाळल्याचा संशय पोलिसांना आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि.११- रस्त्यालगत उभी असलेल्या एका रिक्षाला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना गुरुवारी रात्री अंधेरी आरटीओ बाहेर घडली. ही रिक्षा मनसे कार्यकर्त्यांनीच जाळल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार अंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत. एका उदयोगपतीला कोट्यावधींचा नफा मिळवून देण्यासाठी ७० हजार रिक्षांचे परवाने देण्याचे काम राज्य शासनाकडून सुरु असल्याचा आरोप बुधवारी राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे रस्त्यावर नवीन रिक्षा दिसल्यास रिक्षा चालकास आणि प्रवाशाला बाहेर काढून ती रिक्षा जाळून टाका असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. याचाच परिणाम गुरुवारी रात्री अंधेरी येथे पहायला मिळाला. रत्यालगत उभी असलेल्या एका रिक्षाला काही अज्ञात व्यक्तींनी रात्री साडे दहाच्या सुमारास आग लावत पळ काढला. ही बाब काही स्थानिक रहिवाशांनी पाहताच त्यांनी अग्नीशामक दलास घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या अग्नीशामक जवानांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र तो पर्यंत रिक्षा पुर्णपणे जळून खाक झाली होती. याबाबत अंबोली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)