शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

प्रवाशांचा रिक्षाचालकांना दणका

By admin | Updated: June 9, 2017 00:43 IST

बहुतांश प्रवाशी रिक्षाचालकांचा मुजोरपणा सहन करून गप्प बसतात

विशाल शिर्के । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : रिक्षाचालक भाडे नाकारतात... हुज्जत घालतात... जादा भाडे घेतात... अशा प्रवाशांच्या तक्रारी वरचेवर ऐकायला येत असतात. बहुतांश प्रवाशी रिक्षाचालकांचा मुजोरपणा सहन करून गप्प बसतात. काही पुणेकरांनी पुढे येत अशा रिक्षाचालकांची प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) तक्रार करीत त्यांना अद्दल घडविली आहे. त्यामुळे ६९५ रिक्षाचालकांवर गेल्या १४ महिन्यांत कारवाई करण्यात आली असून, त्यातील ६३२ रिक्षाचालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच त्यांना ३ लाख ५७ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. रिक्षाचालक आणि सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही चालकांच्या वर्तनाबद्दल अनेकदा बोलले जाते. त्यांच्या विपरीत वर्तनाचा अनुभवदेखील अनेक नागरिकांनी घेतला असेल. मात्र, अशा प्रवृत्तीला चाप बसविण्यासाठी कोणी फारसे पुढे येत नाही. काही प्रवाशांनी पुढे येत आरटीओकडे तक्रार करून संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षात रिक्षाचालकांविरुद्ध ४२९ नवीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या पूर्वीच्या प्रलंबित तक्रारी धरून ५९५ रिक्षाचालकांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात अनुक्रमे ३७ आणि २१ रिक्षाचालकांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तडजोड शुल्कापोटी त्यांच्याकडून २७ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. दरमहा सरासरी ३५ तक्रारी आरटीओकडे दाखल होत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्यात सर्वांत कमी १३ नवीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. मे आणि आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक प्रत्येकी ५३, त्या खालोखाल एप्रिल महिन्यात ५१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. म्हणजेच उन्हाळी सुट्टीचा काळ तक्रारींचा महिना राहिला आहे. भाडे नाकारणे, जास्त भाडे आकारणे, उद्धट वर्तन आणि मीटर फास्ट असल्याच्या तक्रारी आरटीओकडे दाखल करण्यात आल्या होत्या. या विषयी माहिती देताना आरटीओचे सहायक परिवहन अधिकारी सर्जेराव पवार म्हणाले, ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यात दोषी आढळल्यास रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते. भाडे नाकारणे, ज्यादा भाडे घेणे, मीटर फास्ट असणे आणि उद्धट वर्तनासाठी पाचशे रुपयांचा दंड आकारला जातो. मीटर फास्ट नसल्याचे नाकबुल केल्यास त्याची चाचणी घेऊन, संबंधितावर परवाना निलंबनाची कारवाई केली जाते. कबुल केल्यास तातडीने दंड करून, त्यात दुरुस्ती करण्यास सांगण्यात येते. ।वर्तनाची तक्राररिक्षाचालकांकडून भाडे नाकारणे, ज्यादा भाडे घेण्याचे आणि उद्धट वर्तनाचे प्रकार घडल्यास प्रवाशांनी १८००२३३००१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरटीओ कार्यालया कडून करण्यात आले आहे.