शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचा रिक्षाचालकांना दणका

By admin | Updated: June 9, 2017 00:43 IST

बहुतांश प्रवाशी रिक्षाचालकांचा मुजोरपणा सहन करून गप्प बसतात

विशाल शिर्के । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : रिक्षाचालक भाडे नाकारतात... हुज्जत घालतात... जादा भाडे घेतात... अशा प्रवाशांच्या तक्रारी वरचेवर ऐकायला येत असतात. बहुतांश प्रवाशी रिक्षाचालकांचा मुजोरपणा सहन करून गप्प बसतात. काही पुणेकरांनी पुढे येत अशा रिक्षाचालकांची प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) तक्रार करीत त्यांना अद्दल घडविली आहे. त्यामुळे ६९५ रिक्षाचालकांवर गेल्या १४ महिन्यांत कारवाई करण्यात आली असून, त्यातील ६३२ रिक्षाचालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच त्यांना ३ लाख ५७ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. रिक्षाचालक आणि सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही चालकांच्या वर्तनाबद्दल अनेकदा बोलले जाते. त्यांच्या विपरीत वर्तनाचा अनुभवदेखील अनेक नागरिकांनी घेतला असेल. मात्र, अशा प्रवृत्तीला चाप बसविण्यासाठी कोणी फारसे पुढे येत नाही. काही प्रवाशांनी पुढे येत आरटीओकडे तक्रार करून संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षात रिक्षाचालकांविरुद्ध ४२९ नवीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या पूर्वीच्या प्रलंबित तक्रारी धरून ५९५ रिक्षाचालकांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात अनुक्रमे ३७ आणि २१ रिक्षाचालकांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तडजोड शुल्कापोटी त्यांच्याकडून २७ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. दरमहा सरासरी ३५ तक्रारी आरटीओकडे दाखल होत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्यात सर्वांत कमी १३ नवीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. मे आणि आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक प्रत्येकी ५३, त्या खालोखाल एप्रिल महिन्यात ५१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. म्हणजेच उन्हाळी सुट्टीचा काळ तक्रारींचा महिना राहिला आहे. भाडे नाकारणे, जास्त भाडे आकारणे, उद्धट वर्तन आणि मीटर फास्ट असल्याच्या तक्रारी आरटीओकडे दाखल करण्यात आल्या होत्या. या विषयी माहिती देताना आरटीओचे सहायक परिवहन अधिकारी सर्जेराव पवार म्हणाले, ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यात दोषी आढळल्यास रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते. भाडे नाकारणे, ज्यादा भाडे घेणे, मीटर फास्ट असणे आणि उद्धट वर्तनासाठी पाचशे रुपयांचा दंड आकारला जातो. मीटर फास्ट नसल्याचे नाकबुल केल्यास त्याची चाचणी घेऊन, संबंधितावर परवाना निलंबनाची कारवाई केली जाते. कबुल केल्यास तातडीने दंड करून, त्यात दुरुस्ती करण्यास सांगण्यात येते. ।वर्तनाची तक्राररिक्षाचालकांकडून भाडे नाकारणे, ज्यादा भाडे घेण्याचे आणि उद्धट वर्तनाचे प्रकार घडल्यास प्रवाशांनी १८००२३३००१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरटीओ कार्यालया कडून करण्यात आले आहे.