शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

शेतकऱ्यांच्या विधवांना मिळणार रिक्षा परवाने !

By admin | Updated: March 26, 2016 01:27 IST

कर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा, यासाठी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला रिक्षा परवाने देण्याचा निर्णय घेतला

- सचिन लाड,  सांगलीकर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा, यासाठी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला रिक्षा परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विधवा पत्नींनी एक लाखाचे सानुग्रह अनुदान घेतले आहे, त्यांनाच रिक्षा परवाने दिले जाणार आहेत. याची सर्व जबाबदारी आरटीओंकडे सोपविण्यात आली आहे. आरटीओंनी परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून विधवा पत्नींची यादी मागविली आहे.कर्जास कंटाळून किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची सांगली जिल्ह्यातही मोठी संख्या आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला तातडीने एक लाखाचे सानुग्रह अनुदान दिले जाते. पण हे अनुदान आयुष्यभर पुरणारे नसते. कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांंनी त्यांच्या जमिनी गहाण ठेवलेल्या असतात. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला जगायचे कसे, असा प्रश्न पडतो. यासाठी शासनाने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना रिक्षा परवाने देण्याची योजना सुरू केली आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील आरटीओंना या आदेशाचे पालन करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार सांगलीचे आरटीओ दशरथ वाघुले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून, ज्या विधवा महिलांनी पतीच्या आत्महत्येनंतर लाखाचे अनुदान घेतले आहे, त्यांची यादी देण्याची मागणी केली आहे. यादी मिळाल्यानंतर परवाने देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. महिलांना परवाने देण्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. तसेच किती परवाने द्यावेत, याचे कोणतेही बंधन नाही. ज्या शेतकऱ्याची शेती होती आणि त्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीस शासनाकडून लाखाचे सानुग्रह अनुदान मिळाले आहे, त्याच महिलेस रिक्षा परवाना दिला जाणार आहे. स्वत: महिला जरी पुढे आल्या नाहीत तरी आरटीओ कार्यालय त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. शासनाच्या या योजनेतून किती महिलांचा रिक्षा परवाने मिळाल्यानंतर संसार फुलला, याची माहिती संबंधित जिल्ह्याच्या आरटीओंना शासनाकडे सादर करावी लागणार आहे. या योजनेचे पालकत्व आरटीओंकडे सोपविण्यात आले आहे. रिक्षा घ्यावी लागणार!रिक्षा परवाने मिळाल्यानंतर ते करार पद्धतीने भाड्याने देता येणार नाहीत, अशी अट शासनाने घातली आहे. परवाने मिळाल्यानंतर त्यांना रिक्षा खरेदी करावी लागणार आहे. रिक्षा खरेदी केल्यानंतर त्यांनी ती स्वत: न चालविता भाडेतत्त्वावर चालक ठेवायचा आहे. रिक्षा घेण्यासाठी सव्वा ते दीड लाखाची रक्कम पाहिजे. याचीही शासनाने सोय केली आहे. रिक्षा परवाने घेतलेल्या विधवा महिलांना कोणतीही अट न लावता कर्जपुरवठा करण्याची सूचना राज्यातील सर्व बँकांना केली आहे. दररोज हप्ता :खात्यावर जमारिक्षावर भाडेतत्त्वावर चालक म्हणून काम करणाऱ्या चालकाने या महिलेला दररोज किती हप्ता द्यायचा? हे सुरुवातीला ठरवून घ्यायचे आहे. त्यानंतर हप्त्याची दररोजही रक्कम महिलेच्या बँक खात्यावर जमा करायची आहे. चालक नियमित हप्ता जमा करतो की नाही, याची तपासणी करण्याचे काम आरटीओंकडे सोपविण्यात आले आहे.