शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

खारघरमध्ये रिक्षा बंद

By admin | Updated: June 11, 2014 00:27 IST

खारघर परिसरात अनधिकृत प्रवासी वाहतूकदारांचे स्तोम माजले आहे. याचा फटका परवानाधारक रिक्षा चालकांना बसला आहे.

नवी मुंबई :  खारघर परिसरात अनधिकृत प्रवासी वाहतूकदारांचे स्तोम माजले आहे. याचा फटका परवानाधारक रिक्षा चालकांना बसला आहे. याविरोधात आज रिक्षा चालकांनी बंद पुकारून बेकायदा प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली. 
खारघर परिसरात आठ आसनी रिक्षा चालकांनी धुमाकूळ घातला आहे. या रिक्षांना आरटीओची परवानगी नसतानाही खारघर परिसरात सर्रास प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अधिकृत परवाना असलेल्या रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावर याचा परिणाम होताना दिसत आहे. यासंदर्भात अनेकदा रिक्षा चालकांनी आरटीओकडे तक्रारी केल्या आहेत. सहा व त्यापेक्षा अधिक सिटर रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
मात्र पनवेल आरटीओकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला होता. मात्र आरटीओ अधिका:यांच्या ठोस आश्वासनानंतर दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले. असे असले तरी या बंदमुळे 
सकाळच्या सत्रत प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
खारघर वाहतूक शाखेचे संदीपन शिंदे, एकता रीक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष विष्णू पाटील व इतर पदाधिका:यांच्या  उपस्थितीत झालेल्या बैठकीत  प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत पाटील यांनी कारवाईचे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला. (प्रतिनिधी)
 
खारघरमधील बेकायदा प्रवासी वाहतुकीसंदर्भात मागील तीन वर्षापासून आरटीओकडे तक्रारी करीत आहोत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अखेर आज संपाचे हत्यार रिक्षा चालकांनी उगारले होते. असे असले तरी आरटीओ अधिका:यांनी यासंदर्भात ठोस आश्वासन दिल्याने हा संप मागे घेण्यात आल्याचे एकता रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विष्णू पाटील यांनी सांगितले. 
 
खारघर परिसरात जवळपास दोनशेपेक्षा अधिक आठ आसनी रिक्षा आहेत. या रिक्षांना आरटीओची परवानगी नसतानाही ते बेकायदा प्रवासी वाहतूक करत असल्याचा आरोप आहे.