शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

धान्याचे उत्पादन घटणार?

By admin | Updated: November 15, 2015 02:19 IST

हवामान बदलाचा फटका यंदाही थंडीला बसणार असून, हिवाळ्यात थंडीचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे, असे भाकीत हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविले आहे.

पुणे : हवामान बदलाचा फटका यंदाही थंडीला बसणार असून, हिवाळ्यात थंडीचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे, असे भाकीत हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविले आहे. रब्बीच्या अनुषंगाने आवश्यक असणारी थंडी यंदा कमी पडणार असल्यामुळे, त्याचा पिकांवर परिणाम जाणवण्याची शक्यता असल्याने, त्यामुळे धान्याच्या उत्पादनात घट होण्याची भीती आहे, अशी माहिती साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे दोन वर्षांपासून थंडी जाणवलीच नाही आणि यंदाही थंडी कमीच राहील, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली. जागतिक तापमान वाढीमुळे काही वर्षांपासून हवामानात बदल होत आहे. दोन वर्षांत जाणवण्याइतकी थंडी पडलीच नाही. ढगाळ वातावरण आणि अवेळी पाऊस, अशी स्थिती राहिली आहे. यंदाही डिसेंबर अखेरपर्यंत काही प्रमाणात अवेळी पाऊस पडेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नाशिकच्या भागातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात होते. अवेळी पावसाचा त्यावर दोन-तीन वर्षांपासून परिणाम होत आहे.पूर्वी नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे ४ महिने थंडी असायची. १२० दिवसांची थंडी रब्बीतील पिकांसाठी योग्य ठरायची. ४० वर्षांपूर्वी डिसेंबर अखेरच्या सप्ताहात प्रचंड प्रमाणात थंडी असायची. मात्र, आता सर्वाधिक थंडीचा काळ म्हणून जानेवारीचा दुसरा-तिसरा आठवडा गृहित धरला जातो. हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.अचानक जास्त थंडी पडणे किंवा एकदम थंडी कमी होणे, हे रब्बीसाठी घातक आहेत. कोणतीही टोकाची स्थिती पिकांना अपायकारक आहे. ७ जानेवारी २०११ रोजी नगरमध्ये १.६ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले होते. त्याचवेळी नाशिकमध्ये ० अंश सेल्सियस तापमान होते, याचा द्राक्षांच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. गव्हाच्या पिकाला साधारणत: १२०-१३० दिवस थंडीचा कालावधी लागतो. या संदर्भात ‘डिग्री डेट’ ही संकल्पना वापरली जाते. प्रत्येक दिवसाला कमाल-किमान तापमानात १ अंशानेही बदल झाला, तरी त्याचा पिकावर परिणाम होतो. गेल्या १५ वर्षांचा कालावधी पाहता, गव्हाला चांगली थंडीच मिळालेली नाही. १ अंशानेही कमाल तापमान वाढले की उष्णता मिळून १०० दिवसांतच पीक तयार होते, पण त्यातील उत्पादनता घटते, दाणे कमी होतात. गव्हाचे क्षेत्र वाढविण्याऐवजी ज्वारी, हरभरा असे क्षेत्र घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)