शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

तांदूळ निर्यातीला धोरणाचा फटका

By admin | Updated: May 27, 2015 23:43 IST

विदेशात तांदळाच्या विक्रमी उत्पादनाचा फटका देशातील तांदूळ निर्यातदारांना बसला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या निर्यातीत ६० टक्के घट झाली आहे.

नागपूर : केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरण आणि यंदा देशांतर्गत व विदेशात तांदळाच्या विक्रमी उत्पादनाचा फटका देशातील तांदूळ निर्यातदारांना बसला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या निर्यातीत ६० टक्के घट झाली आहे. धान खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणारा २५० रुपयांचा बोनस यंदा केंद्र सरकारने बंद केल्याने खुल्या बाजारात तांदूळ मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला. परिणामी तांदळाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. किमती कमी झाल्यानंतरही उठाव नसल्याने यंदा बहुतांश राईस मिल मालकाला ५० लाख ते ५ कोटींपर्यंत फटका बसला आहे. याशिवाय काही मिल एकाच शिफ्टमध्ये तर अनेकांनी मिल बंद केल्या आहेत. तसेच उद्भवलेल्या परिस्थितीमुळे निर्यातदारही चिंतेत आहेत. पंजाब, आंध्र प्रदेश, ओडिशा राज्यांसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्णातील ७५ टक्के राईस मिल बंद असल्याची माहिती गोंदिया येथील तांदूळ निर्यातदार आणि श्री साई प्रभू राईस मिलचे संचालक दिलीप लधानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. निर्यातीत भंडारा व गोंदियाचा २० टक्के वाटागेल्यावर्षी भारतातून एक कोटी टन तांदळाची निर्यात झाली होती. त्यात २० टक्के वाटा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्णाचा आहे. बॉईल आणि स्टीम तांदळाची सर्वाधिक निर्यात होते. पण यावर्षी किमती कमी झाल्यानंतरही निर्यात ४० टक्के होण्याची शक्यता आहे.४तांदळाची निर्यात आॅक्टोबर महिन्यातही सुरू राहील. व्हिएतनाम, पाकिस्तान आणि लगतच्या देशांमध्ये तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे या देशातून आखाती देशांत तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे, शिवाय भावही कमी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतर इराणने बासमती तांदळाची खरेदी थांबविल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. ४त्यामुळे देशांतर्गत बासमती तांदळाचे भाव १३० रुपयांवरून ७० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. यंदा बासमती तांदळाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आणि व्यापारी चिंतेत असल्याचे लधानी यांनी सांगितले.