शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

पुरस्कार परत करणे अर्थहीन!

By admin | Updated: October 16, 2015 03:38 IST

देशातील असहिष्णू वातावरणाचे खापर केंद्र सरकारवर फोडून, साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले जात आहेत, पण सोलापुरातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार

रवींद्र देशमुख, सोलापूरदेशातील असहिष्णू वातावरणाचे खापर केंद्र सरकारवर फोडून, साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले जात आहेत, पण सोलापुरातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार आणि ख्यातनाम लेखक प्रा. निशिकांत ठकार यांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांच्या भूमिकेवर असहमती दर्शविली आहे. साहित्य अकादमी ही स्वायत्त संस्था असून, सरकारशी तिचा संबंध नाही. त्यामुळे पुरस्कार परत करणे अर्थहीन आहे, असे मत या दोन मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.डॉ. गो. मा. पवार हे १० वर्षे अकादमीच्या कार्यकारिणीचे सदस्य होते, शिवाय २००७ साली त्यांच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील चरित्र ग्रंथास अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘केंद्राचा निषेध करण्यासाठी पुरस्कार परत करणे, केवळ सनसनाटी ठरू शकते, पण ते अर्थपूर्ण नाही. ही संस्था स्वायत्त आहे. पुरस्कारांची निवड करणाऱ्या समितीमध्ये देशातील विद्वानांचा समावेश आहे. सरकारचा यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसतो,’ असे त्यांनी सांगितले.‘काही साहित्यिकांनी राज्य शासनाचा पुरस्कारही परत करण्यास सुरुवात केली आहे, पण त्यांना मिळालेले पुरस्कार आधीच्या शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही चुकीची वाटते,’ असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.प्रा. ठकार यांनी हिंदीतील अनेक ग्रंथ मराठीत आणले आहेत. २०१४मध्ये त्यांना अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ते म्हणाले की, ‘यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. तेव्हा कुणी पुरस्कार परत केले नव्हते.’ साहित्य अकादमी ही संपूर्ण स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे पुरस्कार परत करण्याचे काहीच कारण नाही. (प्रतिनिधी)>> केंद्र सरकार प्रतिगाम्यांना पाठीशी घालत आहे, हे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. ज्या घटना घडल्या, त्यांचा तपास सुरू आहे. कोणतेही सत्य बाहेर येण्याआधीच मत बनविणे चुकीचे आहे.- डॉ. गो. मा. पवार, ज्येष्ठ समीक्षकआपण आजही मोकळेपणाने बोलू शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कसलीच गदा आलेली नाही. ती जेव्हा येईल, तेव्हा निश्चित भूमिका घेणे योग्य ठरेल, असे मला वाटते.- प्रा. निशिकांत ठकार