शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पुरस्कार परत करणे अर्थहीन!

By admin | Updated: October 16, 2015 03:38 IST

देशातील असहिष्णू वातावरणाचे खापर केंद्र सरकारवर फोडून, साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले जात आहेत, पण सोलापुरातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार

रवींद्र देशमुख, सोलापूरदेशातील असहिष्णू वातावरणाचे खापर केंद्र सरकारवर फोडून, साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले जात आहेत, पण सोलापुरातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार आणि ख्यातनाम लेखक प्रा. निशिकांत ठकार यांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांच्या भूमिकेवर असहमती दर्शविली आहे. साहित्य अकादमी ही स्वायत्त संस्था असून, सरकारशी तिचा संबंध नाही. त्यामुळे पुरस्कार परत करणे अर्थहीन आहे, असे मत या दोन मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.डॉ. गो. मा. पवार हे १० वर्षे अकादमीच्या कार्यकारिणीचे सदस्य होते, शिवाय २००७ साली त्यांच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील चरित्र ग्रंथास अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘केंद्राचा निषेध करण्यासाठी पुरस्कार परत करणे, केवळ सनसनाटी ठरू शकते, पण ते अर्थपूर्ण नाही. ही संस्था स्वायत्त आहे. पुरस्कारांची निवड करणाऱ्या समितीमध्ये देशातील विद्वानांचा समावेश आहे. सरकारचा यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसतो,’ असे त्यांनी सांगितले.‘काही साहित्यिकांनी राज्य शासनाचा पुरस्कारही परत करण्यास सुरुवात केली आहे, पण त्यांना मिळालेले पुरस्कार आधीच्या शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही चुकीची वाटते,’ असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.प्रा. ठकार यांनी हिंदीतील अनेक ग्रंथ मराठीत आणले आहेत. २०१४मध्ये त्यांना अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ते म्हणाले की, ‘यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. तेव्हा कुणी पुरस्कार परत केले नव्हते.’ साहित्य अकादमी ही संपूर्ण स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे पुरस्कार परत करण्याचे काहीच कारण नाही. (प्रतिनिधी)>> केंद्र सरकार प्रतिगाम्यांना पाठीशी घालत आहे, हे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. ज्या घटना घडल्या, त्यांचा तपास सुरू आहे. कोणतेही सत्य बाहेर येण्याआधीच मत बनविणे चुकीचे आहे.- डॉ. गो. मा. पवार, ज्येष्ठ समीक्षकआपण आजही मोकळेपणाने बोलू शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कसलीच गदा आलेली नाही. ती जेव्हा येईल, तेव्हा निश्चित भूमिका घेणे योग्य ठरेल, असे मला वाटते.- प्रा. निशिकांत ठकार