शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

पुरस्कार परत करणे अर्थहीन!

By admin | Updated: October 16, 2015 03:38 IST

देशातील असहिष्णू वातावरणाचे खापर केंद्र सरकारवर फोडून, साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले जात आहेत, पण सोलापुरातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार

रवींद्र देशमुख, सोलापूरदेशातील असहिष्णू वातावरणाचे खापर केंद्र सरकारवर फोडून, साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले जात आहेत, पण सोलापुरातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार आणि ख्यातनाम लेखक प्रा. निशिकांत ठकार यांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांच्या भूमिकेवर असहमती दर्शविली आहे. साहित्य अकादमी ही स्वायत्त संस्था असून, सरकारशी तिचा संबंध नाही. त्यामुळे पुरस्कार परत करणे अर्थहीन आहे, असे मत या दोन मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.डॉ. गो. मा. पवार हे १० वर्षे अकादमीच्या कार्यकारिणीचे सदस्य होते, शिवाय २००७ साली त्यांच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील चरित्र ग्रंथास अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘केंद्राचा निषेध करण्यासाठी पुरस्कार परत करणे, केवळ सनसनाटी ठरू शकते, पण ते अर्थपूर्ण नाही. ही संस्था स्वायत्त आहे. पुरस्कारांची निवड करणाऱ्या समितीमध्ये देशातील विद्वानांचा समावेश आहे. सरकारचा यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसतो,’ असे त्यांनी सांगितले.‘काही साहित्यिकांनी राज्य शासनाचा पुरस्कारही परत करण्यास सुरुवात केली आहे, पण त्यांना मिळालेले पुरस्कार आधीच्या शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही चुकीची वाटते,’ असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.प्रा. ठकार यांनी हिंदीतील अनेक ग्रंथ मराठीत आणले आहेत. २०१४मध्ये त्यांना अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ते म्हणाले की, ‘यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. तेव्हा कुणी पुरस्कार परत केले नव्हते.’ साहित्य अकादमी ही संपूर्ण स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे पुरस्कार परत करण्याचे काहीच कारण नाही. (प्रतिनिधी)>> केंद्र सरकार प्रतिगाम्यांना पाठीशी घालत आहे, हे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. ज्या घटना घडल्या, त्यांचा तपास सुरू आहे. कोणतेही सत्य बाहेर येण्याआधीच मत बनविणे चुकीचे आहे.- डॉ. गो. मा. पवार, ज्येष्ठ समीक्षकआपण आजही मोकळेपणाने बोलू शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कसलीच गदा आलेली नाही. ती जेव्हा येईल, तेव्हा निश्चित भूमिका घेणे योग्य ठरेल, असे मला वाटते.- प्रा. निशिकांत ठकार