शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘बुलेट ट्रेन’साठी ‘समृद्धी’सारखा मोबदला - रावते यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:59 IST

राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाचा असून, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर भार येणार नसल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मुंबई : राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाचा असून, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर भार येणार नसल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत सांगितले. शिवाय, या प्रकल्पासाठी संपादित जमिनींना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे प्रकल्पाच्या मार्गावरील आदिवासी पट्ट्यात उद्योगधंदे उभे राहतील, तसेच हा मार्ग मुंबई ते ठाण्यापर्यंत जमिनीखालून जाणार असल्याने, शेतकºयांची जमीन जास्त प्रमाणात संपादित होणार नाही. मात्र, भूसंपादन झालेल्या शेतकºयांना समृद्धी महामार्गाप्रमाणे योग्य मोबदला मिळेल, असे रावते यांनी सांगितले.बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प सुमारे एक लाख कोटी रुपयांचा असून, त्यासाठी ८० टक्के कर्ज जपानी बॅँकेकडून मिळणार आहे, तर २० टक्के हिश्श्यापैकी केंद्र सरकार १० टक्के, तर उर्वरित १० टक्के हिस्सा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा असणार आहे. जपानी बॅँकेचे कर्ज ५० वर्षांसाठी असून, पहिल्या १० वर्षांसाठी कर्जफेड करावी लागणार नाही, तसेच राज्याला सुरुवातीला १२५ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी माहिती रावते यांनी दिली. या बुलेट ट्रेनचे भाडे विमानाच्या तिकिटापेक्षा दीडपट असेल. मात्र, विमानाने जाण्या-येण्यात जो संपूर्ण वेळ जातो, त्यापेक्षा ही ट्रेन लवकर पोहोचणार आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातली जमीन देण्यात आलेली नाही. संकुलातली चाळीस हजार वर्गमीटर जमीन देण्याचा सरकारचा विचार आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांनी केलेला आरोप रावते यांनी फेटाळून लावला.मुंबई-कोलकाता बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिक-औरंगाबाद-अमरावती -नागपूरमार्गे नेण्यात यावा, अशी केंद्र सरकारला सूचना करण्यात आली असून, याचे सर्वेक्षण स्पॅनिश कंपनीकडून सुरू असल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे संजय दत्त यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित करत, प्रकल्प फक्त धनदांडग्यांसाठी असल्याचा आरोप केला होता.नीलम गोऱ्हे  यांचा रावतेंना सवालएकीकडे दिवाकर रावते बुलेट ट्रेनची आवश्यकता सांगत असताना, शिवसेनेच्या नीलम गोºहे यांनी मात्र, हा प्रकल्प म्हणजे मराठी नागरिकांच्या हितावर अंधारात मारलेली कुºहाड असल्याचा आरोप केला. बुलेट ट्रेनवाल्यांसाठी पार्किंगची सोय कुठे करणार, मुंबईत आधीच घरे महाग आहेत. बुलेट ट्रेनऐवजी दुसरा काही पर्याय आहे का, असे विचारत, फक्त हिरे व्यापाºयांच्या सोयीसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.