शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

पीक नुकसानाला सुधारित विम्याचे ‘कवच’

By admin | Updated: July 7, 2016 02:03 IST

नैसर्गिक आपत्तीपुढे हतबल झालेल्या शेतक-यांना संरक्षित रकमेत भरघोस भरपाईची हमी; ३१ जुलै अंतिम मुदत.

संतोष वानखडे / वाशिम नैसर्गिक आपत्तीपुढे हतबल झालेल्या शेतकर्‍यांना आता सुधारित पीक विमा योजनेतून भरघोस भरपाईची हमी मिळाली असून, या योजनेत ३१ जुलैपर्यंत शेतकर्‍यांना सहभागी होता येणार आहे. पश्‍चिम वर्‍हाडात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.नैसर्गिक आपत्ती आणि पिकांवरील कीड, रोगराईमुळे शेतकर्‍यांना शेतीतून अपेक्षित उत्पादन घेता येत नाही. उत्पादनात घट झाल्याने लागवड खर्चही वसूल होत नाही. परिणामी, शेतकर्‍यांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागते. पूर्वीच्या तुलनेत आता नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, शेतकर्‍यांना भरावयाचा विमा हप्ताही कमी करण्यात आला आहे. खरीप हंगामात विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के, रब्बी हंगामात १.५ टक्के आणि कापूस व कांदा या नगदी पिकांसाठी पाच टक्के अशी विमा हप्त्याची रक्कम निश्‍चित करण्यात आली. पूर्वी सोयाबीन या पिकासाठी भरपाईची रक्कम हेक्टरी १६ हजार रुपये अशी होती. २0१६ पासून सदर रक्कम ३६ हजार अशी करण्यात आली असून, विमा हप्ता ७२0 रुपये निश्‍चित करण्यात आली. खरीप ज्वारीसाठी हेक्टरी पीक संरक्षित रक्कम २४ हजार असून, शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता ४८0 रुपये असा आहे. याप्रमाणे तूर पिकासाठी हेक्टरी संरक्षित रक्कम २८ हजार असून विमा हप्ता ५६0 रुपये आहे. मूग व उडीद पिकासाठी प्रत्येकी संरक्षित रक्कम १८ हजार असून हप्ता ३६0 रुपये, भुईमुगसाठी संरक्षित रक्कम ३0 हजार असून हप्ता ६00 रुपये, सूर्यफूलसाठी संरक्षित रक्कम असून २२ हजार रुपये असून हप्ता ४४0 रुपये, कापूस पिकासाठी संरक्षित रक्कम ३६ हजार असून हप्ता १८00 व कांदा पिकासाठी संरक्षित रक्कम ५0 हजार असून हप्ता २५00 रुपये आहे. ३१ जुलैपर्यंत शेतकर्‍यांना खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविता येणार आहे. दरम्यान, ही नवीन विमा योजना शेतकर्‍यांपर्यंत पोचविण्यासाठी वाशिमच्या कृषी विभागाने जनजागृती सुरू केली आहे.