शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांचा सोमवारी आढावा

By admin | Updated: November 27, 2015 03:17 IST

महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या पायाभूत आणि प्रलंबित प्रकल्पांचा ३० नोव्हेंबर रोजी केंद्रीय उच्चाधिकार चमू आढावा घेणार आहे.

नबीन सिन्हा,  नवी दिल्लीमहाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या पायाभूत आणि प्रलंबित प्रकल्पांचा ३० नोव्हेंबर रोजी केंद्रीय उच्चाधिकार चमू आढावा घेणार आहे. सर्व महत्त्वांच्या मुद्द्यांवर राज्य सरकारच्या विविध विभागांशी चर्चा केली जाणार असून, सर्व अधिकाऱ्यांना हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे प्रकल्प ७० हजार कोटी रुपयांच्या घरात आहेत.मुंबईत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला राज्य सरकारचे सर्व सचिव उपस्थित राहातील. विविध विभागांशी निगडित मुद्दे निकाली काढण्याचा त्यामागे उद्देश आहे. पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापन गटातील(पीएमजी)केंद्रीय अधिकाऱ्यांचा या चमूत समावेश असेल. वर्षानुवर्षे रखडलेल्या ऊर्जा, पोलाद, रस्ते, बंदर अशा प्रकल्पांचा त्यात समावेश असेल. जिंदल समूहाने महाराष्ट्रात ३.३ एमपीटीए पोलाद प्रकल्पाचे काम चालविले असून, त्याचा विस्तार करीत, त्याची क्षमता १० एमपीटीएपर्यंत वाढविली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील या प्रकल्पासाठी केवळ १२६ एकर जमीन मंजूर करण्यात आली असून, हा मुद्दा कळीचा बनला आहे. रुग्णालयांची उभारणीचा प्रकल्पही थंडबस्त्यात असून, संवैधानिक गुंतागुंत सोडवावी लागणार आहे. बंदर जोडणीचा प्रकल्पही फास्ट ट्रॅकवर आणण्याचा विचार आहे. महाराष्ट्र सरकारने त्याबाबत केंद्र सरकारशी संपर्क साधला होता, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.सुमारे १९८५ कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा सहा पदरी पुणे- सातारा टोल रोड रखडला आहे. हा प्रकल्प एकूण १४० किमीचा असून, केवळ नऊ किमी मार्गासाठी वनविभागाची मंजुरी मिळाली नसल्याने, अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कळविले आहे.असे आहेत थंडबस्त्यातील प्रकल्प....इंदापूर- झारप (चार पदरी) खर्च- ४५० कोटी, सोलापूर - येडशी मार्ग- ९७२ कोटी, पिंपळगाव- नाशिक- गोंदे मार्ग-९४० कोटी, तळेगाव- अमरावती मार्ग- ५६७ कोटी. याखेरीज जेएनपीटी मार्गजोडणीतील तीन हजार कोटींच्या प्रकल्पांचे काम थांबलेले आहे. ऊर्जा आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचेही अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. एमआयडीसी, एमएमबी आणि ऊर्जा विभागाशी संबंधित कायदेशीर गुंतागुंत, तसेच भूसंपादन आणि पाणीहक्क यासारख्या कारणांमुळे प्रकल्पांना विलंब होत आहे. भूसंपादनामुळे मल्लावरम- बिलवाडा- भोपाळ- वाजीपूर पाइपलाइनचा ७२५५ कोटींचा प्रकल्प रखडला आहे. पाण्याच्या पाइपलाइनमुळे एनटीपीसीचा सोलापूर येथील मोठा प्रकल्प प्रलंबित आहे. ऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्पही एक किंवा दोन कारणांनी जागीच थांबले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.