शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्मल वारी’च्या तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2016 00:51 IST

‘निर्मल वारी’ ही संकल्पना या वर्षी प्रथमच आषाढी वारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात राबविण्यात येत आहे.

देहूगाव : ‘निर्मल वारी’ ही संकल्पना या वर्षी प्रथमच आषाढी वारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची तयारी आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडून करण्यात येणाऱ्या प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी श्रीक्षेत्र देहूगावला भेट देऊन पाहणी केली.पालखी मुक्कामाच्या ठिकाणी होत असलेली घाण, पसरणारी दुर्गंधी आणि यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे मूळ असलेल्या शौचालयाच्या समस्येवर गतवर्षापासून उपाययोजनेला सुरुवात केली होती. गतवर्षी ती प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती. ही संकल्पना यशस्वी झाल्यानंतर या वर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून निर्मल वारी संकल्पना यशस्वी करण्याचा चंग प्रशासन व काही समाजसेवी संघटनांनी बांधला आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी शासनाने दोन कोटी चार लाख रुपयांची तरतूद करून निर्मल वारी संकल्पना जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीक्षेत्र देहूगाव येथे पहिल्या टप्प्यात ६०० तात्पुरती शौचालये उभारण्यात येणार आहेत. ही शौचालये घडी करता येण्यासारखी असतात. त्यामुळे ती सहज व कमी वेळेत लावून उपयोगात आणता येतात. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी तात्पुरती शौचालये लावण्यात येणार असून, त्यासाठी पाण्याची व मैला काढून घेण्याची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे. या शौचालयांच्या गरजेनुसार सहा पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.प्रत्येक ठिकाणी किमान १० शौचालये उभारण्यात येणार असून, त्यासाठी दोन हजार लिटरची पाण्याची टाकी ठेवण्यात येणार आहे. ही शौचालये भरल्यानंतर त्यातील मैला काढून तो पिंपरी-चिंचवडच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सोडण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जागांचे नियोजन केलेले असून, या जागांवर २४ ते २७ जूनदरम्यान शौचालये लावण्यात येणार आहेत. या जागांच्या पाहणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई आले होते. त्यांनी मुख्य मंदिराचा परिसर, पालखीचा पहिल्या मुक्काम होत असलेल्या मंदिराशेजारील इनामदारवाड्याची पाहणी केली.उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे, सरपंच हेमा मोरे, जीवन प्राधिकरणाचे कनिष्ठ अभियंता धनंजय जगधने, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बाळासाहेब मखरे, ग्रामपंचायत सदस्य राणी मुसुडगे, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर आदी उपस्थित होते.(वार्ताहर)