शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचा ‘पीएमओ’कडून आढावा

By admin | Updated: July 13, 2017 04:44 IST

विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या प्रगतीचा बुधवारी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) आढावा घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या प्रगतीचा बुधवारी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) आढावा घेतला. २०१९पर्यंत यवतमाळमध्ये रेल्वे ट्रॅकवर आणण्याचे नियोजन असल्याचे यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी ‘पीएमओ’ला सांगितले.वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचा आधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) आढावा घेतला जात होता. परंतु आता या प्रकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रगती पोर्टल’मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पावर आता थेट पंतप्रधान कार्यालयाचा ‘वॉच’ राहणार आहे. याच अनुषंगाने बुधवारी पंतप्रधान कार्यालयाने वर्धा-यवतमाळ-नांदेडसह महाराष्ट्रातील अन्य प्रमुख रेल्वेमार्गांच्या कामातील प्रगतीचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक, रेल्वे प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाला दिली. त्यानुसार, वर्धा जिल्ह्यातील भूसंपादन पूर्ण झाले असून यवतमाळ व कळंब तालुक्यातील भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. येथे २५ गावांमधील ११०० शेतकऱ्यांची ३२५ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. त्यावर ५४ किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक बांधला जाणार आहे. या शेतकऱ्यांना १८१ कोटी रुपये दिले जाणार आहे. ४० किलोमीटर कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. नांदेड, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यातील भूसंपादनावरही जोर दिला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत २०१९ पर्यंत यवतमाळात रेल्वे ट्रॅकवर आणण्याचा, त्याचे टेस्टींग पूर्ण करण्याचा मानस असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाला सांगितले आहे. >विजय दर्डा यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावाजिल्ह्याच्या विकासाचा मानबिंदू ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी मंजुरीपासून ते या प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा मिळवून देण्यापर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. केंद्र आणि राज्य शासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागला आहे.विजय दर्डा यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला फेब्रुवारी २००८मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर ११ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर या प्रकल्पाला निधी मिळावा म्हणून विजय दर्डा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रकल्पातील अडथळे दूर करण्याची मागणी केली. तर, २४ सप्टेंबर २०१५ रोजी केंद्र शासनाने अधिसूचना जारी करून या प्रकल्पाला विशेष प्रकल्प म्हणून घोषित केले.पंतप्रधान कार्यालयाने वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. दोन तालुक्यातील भूसंपादन जवळपास पूर्ण झाले असून अन्य तालुक्यांनीही वेग पकडला आहे. - विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रस्ते प्रकल्प, यवतमाळ