शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

चुकीच्या पैसेवारीमुळे महसूल सचिवास नोटीस

By admin | Updated: March 12, 2016 04:11 IST

पश्चिम विदर्भावर पैसेवारी मूल्यांकनात शासनाने अन्याय केल्यावरून शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचे

नागपूर : पश्चिम विदर्भावर पैसेवारी मूल्यांकनात शासनाने अन्याय केल्यावरून शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने प्रतिवादी महसूल विभागाचे सचिव आणि अमरावती विभाग आयुक्तांना नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे.पैसेवारी मूल्यांकन करून शासनाने सिंचनाची सुविधा असलेल्या नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांतील गावांमध्ये दुष्काळ असल्याचे जाहीर केले. परंतु गेली अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पश्चिम विदर्भात मात्र काही मोजक्याच गावांमध्ये दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था आणि देवानंद पवार यांनी जनहित याचिका दाखल केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यातील १९६७, अकोला येथील ९९७, यवतमाळ येथील ९७०, वाशीम येथील ७९३ आणि बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी दर्शविण्यात आली. तर, नाशिक विभागात सिंचनाची सुविधा असताना ४८८८ गावांची पैसेवारी पन्नासपेक्षा कमी दर्शविण्यात आली. राज्य सरकारने यवतमाळ, अकोला, अमरावती आणि वाशीम या जिल्ह्यांवर अन्याय केला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्जाचा लाभ मिळू शकला नाही. परिणामी, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)