शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

चुकीच्या पैसेवारीमुळे महसूल सचिवास नोटीस

By admin | Updated: March 12, 2016 04:11 IST

पश्चिम विदर्भावर पैसेवारी मूल्यांकनात शासनाने अन्याय केल्यावरून शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचे

नागपूर : पश्चिम विदर्भावर पैसेवारी मूल्यांकनात शासनाने अन्याय केल्यावरून शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने प्रतिवादी महसूल विभागाचे सचिव आणि अमरावती विभाग आयुक्तांना नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे.पैसेवारी मूल्यांकन करून शासनाने सिंचनाची सुविधा असलेल्या नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांतील गावांमध्ये दुष्काळ असल्याचे जाहीर केले. परंतु गेली अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पश्चिम विदर्भात मात्र काही मोजक्याच गावांमध्ये दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था आणि देवानंद पवार यांनी जनहित याचिका दाखल केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यातील १९६७, अकोला येथील ९९७, यवतमाळ येथील ९७०, वाशीम येथील ७९३ आणि बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी दर्शविण्यात आली. तर, नाशिक विभागात सिंचनाची सुविधा असताना ४८८८ गावांची पैसेवारी पन्नासपेक्षा कमी दर्शविण्यात आली. राज्य सरकारने यवतमाळ, अकोला, अमरावती आणि वाशीम या जिल्ह्यांवर अन्याय केला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्जाचा लाभ मिळू शकला नाही. परिणामी, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)