शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
2
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
3
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
4
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
5
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
6
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
7
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
8
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
9
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
10
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
11
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
12
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
13
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
14
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
15
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
16
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
18
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
19
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
20
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

रिलायन्स, टाटाला महसूलचा दणका

By admin | Updated: March 4, 2017 03:25 IST

सीआरझेड एकमधील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा केल्याने रिलायन्स व टाटा या कंपन्यांना महसूल विभागाने दणका दिला

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमधील सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे; कांदळवन, पाणथळ व सीआरझेड एकमधील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा केल्याने रिलायन्स व टाटा या कंपन्यांना महसूल विभागाने दणका दिला आहे. सरकारी जमीन व प्रतिबंधित क्षेत्रात वीजपुरवठा करु नये, सध्या केलेला वीजपुरवठा बंद करा; अन्यथा पर्यावरणाचा ऱ्हास आणि सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याबद्दल कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. मीरा-भार्इंदरमधील सरकारी जमिनींवर अतिक्रमण होऊ नये म्हणून महसुल विभागासह महापालिकेचीही स्थानिक प्राधिकरण म्हणून जबाबदारी आहे. महसूल विभागाकडे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने त्यांना पालिकेवर अवलंबून रहावे लागते. पालिका सरकारी जमीन असल्याचे तुणतुणे वाजवते, पण अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांना; तसेच माफियांना एकप्रकारे पाठीशीच घालते. सरकारी जागेतील अतिक्रमणांना पाणी, फुटपाथ, दिवाबत्ती आदी सुविधा नगरसेवकांच्या आग्रहाखातर पुरवल्या जातात. कर आकारणीही लगोलग केली जाते. सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांना शासनाची कुठलीही परवानगी न घेता रिलायन्स, टाटा आदी कंपन्या वीज पुरवतात. अशा झोपड्या-खोल्यांची माफियांकडून सर्रास विक्री केली जाते. असाच प्रकार सीआरझेड एक, कांदळवन व पाणथळ या प्रतिबंधित क्षेत्रातही केला जातो. उच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणासाठी वेळोवेळी अनेक आदेश दिले आहेत. त्यात या क्षेत्रात भराव, बांधकामे करण्यास सक्त मनाई करूनही आदेशांचे सर्रास उल्लंघन केले जाते. वीजपुरवठा सहज असल्याने सरकारी जमिनीवर अतिक्रमणाला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे महसुल विभागाने रिलायन्स एनर्जीविरोधात भार्इंदरला पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)>खरमरीत पत्र आणि तंबीमीरा रोडच्या पश्चिमेस नाझरेथ आगर येथे कांदळवन, सीआरझेड एक, पाणथळ क्षेत्रबाधित सरकारी जमिनीत तिवरांची झाडे तोडून भराव करुन झालेल्या बांधकामांना रिलायन्सने केबल टाकून मीटर लावत वीजपुरवठा केल्याचे उघड झाले. त्यानंतर मीरा-भार्इंदरचे मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी रिलायन्स व टाटा या कंपन्यांना खरमरीत पत्र पाठवले आहे. त्यात उच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्या ऐवजी प्रतिबंधित क्षेत्रात विजेची केबल टाकणे, मीटर लावणे आदी कामांमुळे आदेशांचा अवमान व उल्लंघन होत असल्याचे कळवले आहे. सरकारी जमिनीवर, तसेच न्यायालयाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नव्याने केबल व मीटर टाकू नये, असे बजावले आहे.