शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

'महसूल हवा की पाणी' ? तुम्हीच ठरवा, आयपीएलवरुन बीसीसीआयचा राज्य सरकारला टोला

By admin | Updated: April 9, 2016 21:53 IST

आयपीएल क्रिकेटचे सामने राज्यात खेळवण्यावरुन सुरु असलेल्या वादावर क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राज्य सरकारला 'महसूल हवा की पाणी' ? हे तुम्हीच ठरवा असं सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ९ - आयपीएल क्रिकेटचे सामने राज्यात खेळवण्यावरुन सुरु असलेल्या वादावर क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)  राज्य सरकारला 'महसूल हवा की पाणी' ? हे तुम्हीच ठरवा असं सांगितलं आहे. आयपीएल मॅच दुसरीकडे खेळवण्याचं ठरवल्यास महाराष्ट्र सरकारला तब्ब्ल 100 कोटींचं नुकसान होईल अशी माहिती बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. 
 
महाराष्ट्र सरकारला आयपीएल मॅचमधून 100 करोड रुपये मिळणार आहेत. जर मॅचेस दुसरीकडे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर सरकारसाठी हे खुप मोठं नुकसान असेल असं अनुराग ठाकूर बोलले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएल क्रिकेटचे सामने राज्याबाहेर गेले तरी चालेल आम्हाला काही फरक पडत नसल्याचं म्हंटलं होत. आयपीएलला पिण्यायोग्य पाणी पुरवणार नसल्याचंही ते बोलले होते यावर उत्तर देताना अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. 
आयपीएलमधून मिळणारा पैसा दुष्काळाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतो असंही अनुराग ठाकूर यांनी सुचवलं आहे. बीसीसीआय काही दुष्काळग्रस्त गावेदेखील दत्तक घेण्याचा विचार करत आहे. तसंच मैदानावर पिण्यायोग्य पाणी वापरणार नसल्याचं आश्वासनही अनुराग ठाकूर दिलं आहे. महाराष्ट्रात आयपीएलच्या 20 मॅचेस होणार आहेत ज्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांचा समावेश आहे. 
 
गेल्या आठवड्यात मुंबईत उच्च न्यायालयाने राज्यातील दुष्काळ परिस्थिती पाहता आयपीएल राज्याबाहेर खेळवण्यात यावे असं सुचवलं होतं. न्यायालयाने वानखेडेवर होणा-या सलामीच्या सामन्याला परवानगी दिली असली तरी उर्वरित सामने खेळवायचे की नाही यावर 12 एप्रिलला सुनावणी होणार आहे.