शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

'महसूल हवा की पाणी' ? तुम्हीच ठरवा, आयपीएलवरुन बीसीसीआयचा राज्य सरकारला टोला

By admin | Updated: April 9, 2016 21:53 IST

आयपीएल क्रिकेटचे सामने राज्यात खेळवण्यावरुन सुरु असलेल्या वादावर क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राज्य सरकारला 'महसूल हवा की पाणी' ? हे तुम्हीच ठरवा असं सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ९ - आयपीएल क्रिकेटचे सामने राज्यात खेळवण्यावरुन सुरु असलेल्या वादावर क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)  राज्य सरकारला 'महसूल हवा की पाणी' ? हे तुम्हीच ठरवा असं सांगितलं आहे. आयपीएल मॅच दुसरीकडे खेळवण्याचं ठरवल्यास महाराष्ट्र सरकारला तब्ब्ल 100 कोटींचं नुकसान होईल अशी माहिती बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. 
 
महाराष्ट्र सरकारला आयपीएल मॅचमधून 100 करोड रुपये मिळणार आहेत. जर मॅचेस दुसरीकडे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर सरकारसाठी हे खुप मोठं नुकसान असेल असं अनुराग ठाकूर बोलले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएल क्रिकेटचे सामने राज्याबाहेर गेले तरी चालेल आम्हाला काही फरक पडत नसल्याचं म्हंटलं होत. आयपीएलला पिण्यायोग्य पाणी पुरवणार नसल्याचंही ते बोलले होते यावर उत्तर देताना अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. 
आयपीएलमधून मिळणारा पैसा दुष्काळाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतो असंही अनुराग ठाकूर यांनी सुचवलं आहे. बीसीसीआय काही दुष्काळग्रस्त गावेदेखील दत्तक घेण्याचा विचार करत आहे. तसंच मैदानावर पिण्यायोग्य पाणी वापरणार नसल्याचं आश्वासनही अनुराग ठाकूर दिलं आहे. महाराष्ट्रात आयपीएलच्या 20 मॅचेस होणार आहेत ज्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांचा समावेश आहे. 
 
गेल्या आठवड्यात मुंबईत उच्च न्यायालयाने राज्यातील दुष्काळ परिस्थिती पाहता आयपीएल राज्याबाहेर खेळवण्यात यावे असं सुचवलं होतं. न्यायालयाने वानखेडेवर होणा-या सलामीच्या सामन्याला परवानगी दिली असली तरी उर्वरित सामने खेळवायचे की नाही यावर 12 एप्रिलला सुनावणी होणार आहे.