शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

‘परिवहन’ला १00 कोटींचा महसूल

By admin | Updated: April 3, 2017 05:45 IST

बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी घातली.

मुंबई : बीएस या मानकात वेळोवेळी सुधारणा होत असते. त्यानुसार, बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी घातली. मात्र, ३१ मार्चपर्यंत वाहन कंपन्यांनी या मानकातील वाहने सवलत देऊन विक्रीला काढल्याने त्याचा फायदा राज्याच्या परिवहन विभागाला झाला आहे. ३0 व ३१ मार्च या दोन दिवशी झालेल्या अन्य वाहनांबरोबरच बीएस-३ वाहन नोंदणीमुळे तब्बल १00 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. वाहन कंपन्यांकडून ३0 व ३१ मार्च रोजी बीएस-३ वाहनांवर २0 ते ३0 टक्के सवलत देऊन वाहन विक्री केली. ३१ मार्च रोजी तर या मानकातील वाहन विक्रीसाठी शोरूम रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाहन नोंदणी व्यवस्थित पार पडावी, यासाठी आरटीओ कार्यालयेही रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली. राज्यभरात दररोज ८ ते ९ हजार वाहनांची नोंदणी होते. मात्र, बीएस-३ वाहनांमुळे ही नोंदणी तीन पटीने वाढली. २0१५-१६ रोजी २३ लाख ३ हजार ७८३ नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. मात्र, २0१६-१७ या आर्थिक वर्षातील मार्च महिन्याच्या शेवटच्या २ दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहन नोंदणी झाली. या संदर्भात राज्य परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांना विचारले असता, ३0 आणि ३१ मार्च रोजी बीएस-३ मानकातील वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याने दररोज मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली. वाहन नोंदणीतून रोज २0 ते २५ कोटी रुपये महसूल मिळतो. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत हा महसूल अंदाजे १00 कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे सांगितले. ३१ मार्चपर्यंत विक्री झालेल्या बीएस-३ इंजिन वाहनांची नोंदणी १ एप्रिलनंतरही आरटीओत होऊ शकते. त्यामुळे वाहन चालकांना हा दिलासाच असणार आहे. (प्रतिनिधी)>सवलत देऊन विक्रीवाहन कंपन्यांकडून ३0 व ३१ मार्च रोजी बीएस-३ वाहनांवर २0 ते ३0 टक्के सवलत देऊन वाहन विक्री केली. ३१ मार्च रोजी तर या मानकातील वाहन विक्रीसाठी शोरूम रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाहन खरेदीसाठी तर मुंबईसह राज्यातील अन्य शहरांतील शोरूममध्ये झुंबडच उडाली होती.