शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘परिवहन’ला १00 कोटींचा महसूल

By admin | Updated: April 3, 2017 05:45 IST

बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी घातली.

मुंबई : बीएस या मानकात वेळोवेळी सुधारणा होत असते. त्यानुसार, बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी घातली. मात्र, ३१ मार्चपर्यंत वाहन कंपन्यांनी या मानकातील वाहने सवलत देऊन विक्रीला काढल्याने त्याचा फायदा राज्याच्या परिवहन विभागाला झाला आहे. ३0 व ३१ मार्च या दोन दिवशी झालेल्या अन्य वाहनांबरोबरच बीएस-३ वाहन नोंदणीमुळे तब्बल १00 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. वाहन कंपन्यांकडून ३0 व ३१ मार्च रोजी बीएस-३ वाहनांवर २0 ते ३0 टक्के सवलत देऊन वाहन विक्री केली. ३१ मार्च रोजी तर या मानकातील वाहन विक्रीसाठी शोरूम रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाहन नोंदणी व्यवस्थित पार पडावी, यासाठी आरटीओ कार्यालयेही रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली. राज्यभरात दररोज ८ ते ९ हजार वाहनांची नोंदणी होते. मात्र, बीएस-३ वाहनांमुळे ही नोंदणी तीन पटीने वाढली. २0१५-१६ रोजी २३ लाख ३ हजार ७८३ नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. मात्र, २0१६-१७ या आर्थिक वर्षातील मार्च महिन्याच्या शेवटच्या २ दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहन नोंदणी झाली. या संदर्भात राज्य परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांना विचारले असता, ३0 आणि ३१ मार्च रोजी बीएस-३ मानकातील वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याने दररोज मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली. वाहन नोंदणीतून रोज २0 ते २५ कोटी रुपये महसूल मिळतो. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत हा महसूल अंदाजे १00 कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे सांगितले. ३१ मार्चपर्यंत विक्री झालेल्या बीएस-३ इंजिन वाहनांची नोंदणी १ एप्रिलनंतरही आरटीओत होऊ शकते. त्यामुळे वाहन चालकांना हा दिलासाच असणार आहे. (प्रतिनिधी)>सवलत देऊन विक्रीवाहन कंपन्यांकडून ३0 व ३१ मार्च रोजी बीएस-३ वाहनांवर २0 ते ३0 टक्के सवलत देऊन वाहन विक्री केली. ३१ मार्च रोजी तर या मानकातील वाहन विक्रीसाठी शोरूम रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाहन खरेदीसाठी तर मुंबईसह राज्यातील अन्य शहरांतील शोरूममध्ये झुंबडच उडाली होती.