शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दहावी-बारावीचा निकाल वेळेतच

By admin | Updated: May 21, 2015 00:06 IST

चर्चेला पूर्णविराम : कोकण बोर्डाने स्पष्ट केली भूमिका

सागर पाटील - टेंभ्ये -राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे निकालाबाबतच्या अफवांवर पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव कृष्णकांत पाटील यांनी केले आहे. दहावी, बारावीचा निकाल न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेतच जाहीर होईल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.सोशल मीडियावरून सध्या दहावी व बारावीच्या निकालाबाबत अनेक पोस्ट वाचायला मिळत आहेत. मात्र राज्य मंडळाकडून निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे दोनही परीक्षांचे निकाल १० जूनपूर्वी जाहीर करणे राज्य मंडळाला बंधनकारक आहे. त्यादृष्टीने निकालाची तयारी सुरु असल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले. यापूर्वी निकाल जाहीर होण्याच्या तारखा लक्षात घेतल्यास इयत्ता बारावीचा आॅनलाईन निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर दहावीचा आॅनलाईन निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आॅनलाईन निकालाची तारीख आगामी पाच ते सहा दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.कोकण विभागीय मंडळांतर्गत इयत्ता बारावीच्या परीक्षेला ३२ हजार ८० विद्यार्थी, तर इयत्ता दहावीच्या परीक्षेला ४१,५५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. यामध्ये संख्यात्मकदृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी आहे. दोन्ही परीक्षांना प्रविष्ठ झालेले विद्यार्थी व पालकवर्गाला निकालाची उत्सुकता लागली आहे. गतवर्षी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरीच्या चिन्मयी मटांगे या विद्यार्थिनीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. यावर्षी ही परंपरा कायम राहाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.यावर्षीच्या दहावी व बारावीच्या निकालामध्ये कोकण विभागीय शिक्षण मंडळ राज्यामध्ये अव्वल असेल. कोकण मंडळाच्या स्थापनेपासूनची परंपरा यावर्षीदेखील कायम राहील. विद्यार्थी, शिक्षक व पालक हा शैक्षणिक त्रिकोण कोकणात अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यान्वित असल्याने उज्ज्वल यश मिळविणे कोकण मंडळासाठी कठीण नाही.- आर. बी. गिरी, सचिव, कोकण शिक्षण मंडळ.