शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

सर्व परीक्षांचे निकाल २५ दिवसांत लागणार

By admin | Updated: July 6, 2017 05:10 IST

जून महिना संपल्यावरही उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली नसल्याने मुंबई विद्यापीठाने एकही निकाल जाहीर केलेला नाही.ं राज्यपाल विद्यासागर राव यांनी या

 लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जून महिना संपल्यावरही उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली नसल्याने मुंबई विद्यापीठाने एकही निकाल जाहीर केलेला नाही.ं राज्यपाल विद्यासागर राव यांनी या प्रकरणाची दखल घेत कुलगुरूंची कानउघाडणी केल्यानंतर पुढच्या २५ दिवसांत सर्व निकाल जाहीर करणार असल्याचे बुधवारी मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले. निकाल जाहीर करण्यासाठी सर्व यंत्रणा जोरदार कामाला लागली असून, आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीने वेग घेतला आहे. स्वत: कुलगुरू कलिना कॅम्पसमध्ये उपस्थित असून, जातीने लक्ष घालत आहेत. यंदा सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतला होता. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली. पण, आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी कंपन्यांचा अत्यल्प प्रतिसाद आल्याने दोनदा ही प्रक्रिया राबवावी लागली. त्यामुळे आॅनलाइन पेपर तपासणी प्रक्रिया उशिरा सुरू झाली. त्यातच प्राध्यापकांना आॅनलाइन तपासणी नवीन असल्याने अडचणी येत होत्या. या सर्व समस्या सोडवताना उत्तरपत्रिकांची तपासणी २० टक्केच पूर्ण झाली आहे. परिणामी, निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करून निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावेत, असे आदेश मुंबई विद्यापीठाला मंगळवारी दिले होते. त्यानुसार विद्यापीठात आता निकालांचा धडाका सुरू होणार आहे. दरम्यान, निकालात होणारे अवैध प्रकार रोखण्यासाठी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत अंमलात आणली आहे. याआधी अभियांत्रिकीसाठी ही पद्धत वापरली जात होती. पण, यंदापासून सर्व अभ्यासक्रमांना लागू केली आहे. त्यामुळे नक्कीच अवैध प्रकारांना आळा बसेल, असा विश्वास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केला.नियंत्रण कक्ष स्थापनराज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार, आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षातून कोणत्या विषयाच्या किती उत्तरपत्रिका तपासून झाल्या, उत्तरपत्रिका तपासणीचे काम कसे सुरू आहे, याविषयी सर्व माहिती संकलित केली जात आहे. त्याचबरोबरीने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत येत असणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि अन्य अडचणी या नियंत्रण कक्षातून सोडवल्या जातात. उत्तरपत्रिका तपासणीची सर्व माहिती संकलित केली जात आहे. सर्व यंत्रणा कार्यरत असून, सर्व निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बन्सोड यांनी दिली.