शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

अभियांत्रिकेचा चुकीच्या पद्धतीचा निकाल

By admin | Updated: July 21, 2016 00:36 IST

परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांचे निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर केल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांचे निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ही चूक लक्षात आल्यानंतर, आता परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना निकालात दुरुस्ती करून सुधारित गुणपत्रिका महाविद्यालयाकडे पाठविल्या आहेत; परंतु परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा निकाल नियोजित वेळेपूर्वी जाहीर करण्यात आला; मात्र निकाल जाहीर करताना विद्यापीठाने काही नियमांचे पालन न केल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केल्या होत्या. त्यामुळे संबंधित निकाल जाहीर करताना सर्व नियमांचे पालन झाले आहे का? याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, अभियांत्रिकी विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे व सध्याचे अभियांत्रिकी विद्याशाखेचे समन्वयक योगेश नेरकर यांची समिती स्थापन करण्यात आली होती.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने बेस्ट आॅफ परफॉर्मन्स, तसेच केवळ एकाच विषयात नापास असणाऱ्या विद्यार्थ्याला जर तो उत्तीर्ण होत असेल, तर एकूण गुणांच्या १ टक्का गुणवाढ द्यावी, असा निर्णय घेतला आहे. त्याला ओ फोर नावाने ओळखले जाते. परंतु, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांना या नियमाचा लाभ देण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाले होते. विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीने ही बाब परीक्षा विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांच्या निकालात दुरुस्ती केली.बेस्ट आॅफ फरफॉर्मन्स अंतर्गत विद्यार्थ्यांना थेअरी परीक्षेत २१ गुण मिळाले असतील, तर त्यांना ७+3 असे १० गुण देण्याचा नियम आहे. परंतु, परीक्षा विभागाकडून तृतीय व अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करताना, या नियमाचा विचार केला नव्हता. विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार परीक्षा विभागाने निकाल दुरुस्त करून सुधारित गुणपत्रिका मंगळवारीच सर्व महाविद्यालयांकडे पाठविल्या आहेत.- डॉ. गजानन खराटे, माजी अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ