शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकेचा चुकीच्या पद्धतीचा निकाल

By admin | Updated: July 21, 2016 00:36 IST

परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांचे निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर केल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांचे निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ही चूक लक्षात आल्यानंतर, आता परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना निकालात दुरुस्ती करून सुधारित गुणपत्रिका महाविद्यालयाकडे पाठविल्या आहेत; परंतु परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा निकाल नियोजित वेळेपूर्वी जाहीर करण्यात आला; मात्र निकाल जाहीर करताना विद्यापीठाने काही नियमांचे पालन न केल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केल्या होत्या. त्यामुळे संबंधित निकाल जाहीर करताना सर्व नियमांचे पालन झाले आहे का? याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, अभियांत्रिकी विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे व सध्याचे अभियांत्रिकी विद्याशाखेचे समन्वयक योगेश नेरकर यांची समिती स्थापन करण्यात आली होती.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने बेस्ट आॅफ परफॉर्मन्स, तसेच केवळ एकाच विषयात नापास असणाऱ्या विद्यार्थ्याला जर तो उत्तीर्ण होत असेल, तर एकूण गुणांच्या १ टक्का गुणवाढ द्यावी, असा निर्णय घेतला आहे. त्याला ओ फोर नावाने ओळखले जाते. परंतु, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांना या नियमाचा लाभ देण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाले होते. विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीने ही बाब परीक्षा विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांच्या निकालात दुरुस्ती केली.बेस्ट आॅफ फरफॉर्मन्स अंतर्गत विद्यार्थ्यांना थेअरी परीक्षेत २१ गुण मिळाले असतील, तर त्यांना ७+3 असे १० गुण देण्याचा नियम आहे. परंतु, परीक्षा विभागाकडून तृतीय व अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करताना, या नियमाचा विचार केला नव्हता. विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार परीक्षा विभागाने निकाल दुरुस्त करून सुधारित गुणपत्रिका मंगळवारीच सर्व महाविद्यालयांकडे पाठविल्या आहेत.- डॉ. गजानन खराटे, माजी अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ