शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चलन नसल्याने मजुरी म्हणून देतात धान्य

By admin | Updated: November 19, 2016 03:21 IST

सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांची चलनबंदी केल्याने ऐन कापणीच्या मोसमात मजुरी कशी देणार.

सुनील घरत,

पारोळ- सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांची चलनबंदी केल्याने ऐन कापणीच्या मोसमात मजुरी कशी देणार. त्यातच बॅँकांच्या व एटीएमच्या बाहेर लांबचलाब रांगा असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, यावर पारंपरिक वस्तू विनिमय पद्धतीच्या आधारे तोडगा काढून मजुरांना मजुरी म्हणून धान्य देण्याचा तोडगा बळीराजाने काढला आहे.पूर्ण हंगाम घामाने व काबाडकष्टाने राबून कापणीनंतर हाती लागलेल्या पिकाची झोडणी करून घरात लवकर आणण्यासाठी वसईतील बळीराजाची लगबग सुरु आहे. वसई पूर्व ग्रामीण भागात जिकडे तिकडे आपापल्या शेतात बनवलेल्या खळ्यामध्ये पहाटेपासून झोडणीची व वाढवणीची कामे सर्वत्र सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, मजूर टंचाईमुळे प्राप्त मजुरांच्या शोधात बळीराजा हैराण झाला आहे. त्यातही मिळणाऱ्या मजुरांना मजुरी देण्यासाठी सुट्टे चलन नाही. यावर तोडगा म्हणून मजुरीच्या बदल्यात धान्य अथवा उधारीने मजूर काम करत आहेत. चलन अडचणीच्या काळामध्ये झोडणीची घाई का करता, असे विचारले असता शेतकरी सांगत आहेत की, पुढे सुरु होणाऱ्या रब्बी हंगामात ही कामे शिल्लक राहिली आणि यांना वेळ दिला तर शेतातील ओल निघून जाईल व द्विदल पिके उशिरा पेरल्याने पिके पाहिजे तशी होणार नाहीत म्हणून आम्ही घाई करत आहोत. असे सांगितले.>व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूटवसईत भातखरेदी केंद्र होणार, ही घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात वसईत भातखरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीचा भात पिकाला खाजगी व्यापारी कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. सरकारी दर, उच्च प्रतीच्या भात, पिकाला प्रतिक्विंटल १५१० रुपयांचा दर असून व्यापारी मात्र ११०० ते १२०० च्या घरात खरेदी करतात.