शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

जिल्ह्याचा निकाल ९३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 23:49 IST

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत नगर जिल्ह्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला.

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत नगर जिल्ह्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला. यात पुणे विभागात नगर दुसऱ्या स्थानावर असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दोन टक्क््यांनी निकाल घसरला. सोमवारी दुपारी दहावीचा निकाल आॅनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षेसाठी जिल्ह्यातून ४० हजार ४८३ मुले, तर ३० हजार ७७२ मुली असे एकूण ७१ हजार २५५ विद्यार्थी बसले होते. त्यातील ३७ हजार १३९ मुले, तर २९ हजार ७ मुली असे एकूण ६६ हजार १४६ विद्यार्थी (९२.८३) उत्तीर्ण झाले. मागील वर्षी हाच निकाल ९५.४३ टक्के होता. म्हणजे त्या तुलनेत यंदा दोन टक्क्यांनी निकाल घसरला आहे. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. यंदा मुलांचा निकाल ९१.७४, तर मुलींचा निकाल ९४.२६ टक्के लागला. जिल्ह्यातील १९ हजार ९५८ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय २७ हजार ५०४ विद्यार्थ्यांना प्रथम, तर १६ हजार ५६७ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली. २ हजार ११७ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले.अकरावी प्रवेशासाठी १३ ला प्राचार्यांची बैठकअहमदनगर : दहावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन पध्दतीने जाहीर झाला आहे. या निकालात जिल्ह्यातील १८० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक पोले यांनी दिली आहे. जिल्ह्यातील दहावीचा निकालाचा टक्का यंदा २ टक्क्यांनी घसरला आहे. त्याच सोबत शंभर टक्के निकाल असणाऱ्या शाळांची आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत २१९ वरून १८० पर्यंत खाली आली आहे. १५ जूनला विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात त्यांच्या शाळेत मूळ गुणपत्रिका आणि कल चाचणीचा निकाल देण्यात येणार आहे. जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता ६३ हजार ५२० असून प्रत्यक्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६६ हजार १४६ आहे. दहावीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजची वाढलेली संख्या, आयटीआयसह अन्य प्रवेशाकडे कल वाढलेला आहे. यामुळे दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कला, शास्त्र आणि वाणिज्य शाखामध्ये प्रवेशासाठी अडचण निर्माण होणार नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.वाणिज्य आणि शास्त्र शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याने या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, जिल्ह्यात वाणिज्य विभागाच्या ७ हजार ९६० जागा यासह १ हजार ३६० स्वयं अर्थसहाय्यितच्या जागा असून शास्त्र विभागाच्या २४ हजार ३६० जागा असून ३ हजार ७०७ स्वयं अर्थ सहाय्यितच्या जागा आहेत. यामुळे अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ नये, यासाठी १३ जूनला माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक फिरोदिया शाळेत होणार असल्याचे पोले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तालुकानिकालाचा टक्काशेवगाव ९५.१०जामखेड ९४.५९नगर तालुका ९४.२२कर्जत ९३.७४राहुरी ९३.३७राहाता ९३.२३श्रीगोंदा ९३.२०नेवासा ९३.१८संगमनेर ९३.१८पाथर्डी ९२.२८अकोले ९१.७६पारनेर ९१.५१कोपरगाव ९०.११श्रीरामपूर ८९.२४मुलींनी परंपरा राखलीबारावीपाठोपाठ यंदा दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. मागील वर्षीपेक्षा जिल्ह्याचा एकूण निकाल घसरला असला तरी मुलांपेक्षा (९१.७४ टक्के) मुलीच (९४.२६ टक्के) सरस ठरल्या आहेत. पुणे विभागात मुलींचे स्थान दुसरे आहे. जिल्ह्यातील ९६३ विद्यालयांमधून ७१ हजार २५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यंदा जिल्ह्यात शेवगावचा सर्वाधिक ९५.१० टक्के निकाल लागला असून, श्रीरामपूर मागील वर्षीप्रमाणे यंदाही निचांकी (८९.२४) स्थानावर आहे. मागील वर्षी ९५ टक्केच्या पुढे १२ तालुके होते. यंदा मात्र शेवगाव वगळता सर्व तालुक्यांचा निकाल ९० ते ९५च्या दरम्यान आहे. ४मागील दोन वर्षांच्या तुलनेत मुलांप्रमाणेच मुलींचा निकालही घसरला आहे. परंतु तो मुलांपेक्षा अधिक आहे. यंदा मुलींचा निकाल ९४.२६, तर मुलांचा ९१.७४ टक्के लागला.