शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणार

By admin | Updated: June 10, 2014 23:47 IST

ग्रामीण पाणी पुरवठा समित्यांची पुनर्रचना करून या समित्यांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाचा समावेश केला जाईल.

ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणारमुंबई - ग्रामीण पाणी पुरवठा समित्यांची पुनर्रचना करून या समित्यांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाचा समावेश केला जाईल. तसेच जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांकडून कामाची तपासणी करण्यात येईल, अशी घोषणा पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी आज विधानसभेत केली. ग्राम पाणी पुरवठ्या समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्यामुळे पाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात आहेत, असे मत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी आज व्यक्त केले.बोरोळ, ता.देवणी येथील पाणीपुरवठा योजनेबाबतचा मूळ प्रश्न ज्येष्ठ सदस्य डॉ.शिवाजीराव पाटील यांनी विचारला होता. या गावात विहिरीसाठी १५ मीटर खोदकाम होऊनही पाणी न लागल्याने दुसरा उद्भव घ्यावा लागला, त्यासाठी ६१ लाख रुपये खर्च झाले, असे सोपल यांनी सांगितले. पाणी पुरवठा योजना रखडण्याचे कारण म्हणजे ग्राम पाणीपुरठा समित्यांवर जबाबदारी निि›त नाही. त्यामुळेच गैरव्यवहार वाढत असल्याचे सर्वपक्षीय आमदारांनी सांगितले. अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली. ग्राम पाणीपुरवठा समित्यांमध्ये तज्ज्ञ नसतात. त्यामुळे मनमानी निर्णय होतात, अशी भावनाही व्यक्त झाली. तेव्हा या समित्यांची पुनर्रचना केली जाईल, असे सोपल म्हणाले. जलस्त्रोताचे काम झाल्याखेरीज इतर खर्च करु नये असा स्पष्ट सूचना देण्यात येईल, असेही मंत्री सोपल यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)