शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

सरकारी खर्चाला आजपासून निर्बंध

By admin | Updated: January 18, 2017 06:21 IST

पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रकमेच्या सरकारी खर्चावर राज्य सरकारने १७ जानेवारीपासून बंधने आणली आहेत

मुंबई : पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रकमेच्या सरकारी खर्चावर राज्य सरकारने १७ जानेवारीपासून बंधने आणली आहेत. ही बंधने ३१ मार्चपर्यंत लागू राहतील. याबाबतचा शासन आदेश आज जारी करण्यात आला आहे. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या शेवटच्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनावश्यक किंवा प्राधान्यक्रम नसणाऱ्या गोष्टींची खरेदी मोठ्या प्रमाणावर शेवटच्या तीन महिन्यांत होत होती. यावर उपाय म्हणून, दरवर्षी १५ फेब्रुवारीपासून ३१ मार्चपर्यंत अशा खरेदीवर बंधने आणली जात होती. तरीही फारसा फरक पडत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे निर्बंध आणखी एक महिना आधीपासूनच म्हणजे १७ जानेवारीपासून लागू केले आहेत. या निर्णयामुळे १७ जानेवारीनंतर म्हणजेच आजपासून फर्निचरची दुरुस्ती, झेरॉक्स मशिन उपकरणे, संगणक अथवा त्यांचे सुटे भाग यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव नैमित्तीक कार्यशाळा, सेमिनार, भाड्याने कार्यालये घेण्याचे प्रस्ताव इत्यादींना मंजुरी देऊ नये, असे आदेशात म्हटले आहे. हे निर्बंध ५० हजार किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या खरेदीच्या प्रस्तावांना लागू नाहीत. तसेच केंद्र व राज्याच्या संयुक्त प्रकल्पांना जर १०० टक्के निधी वितरीत केला असेल, तर त्या प्रस्तावांनाही ही निर्बंध लागू होणार नाहीत. या निर्णयामुळे वर्षाच्या निधी शिल्लक आहे म्हणून वाटेलतशी खरेदी करण्याच्या प्रकाराला आळा बसेल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (विशेष प्रतिनिधी)