शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

निर्बंध सैलावले, दिवाळी धडाक्यात; रेस्टॉरंट आणि दुकानांच्या वेळा वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 07:07 IST

मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट व दुकाने रात्री १२ पर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांतील वेळा स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात येतील.

मुंबई : दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून कोरोनाचे एक-एक निर्बंध शिथिल होत असून आता राज्यातील रेस्टॉरंट, दुकाने उघडी ठेवण्यासाठीच्या वेळा वाढवून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट व दुकाने रात्री १२ पर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांतील वेळा स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात येतील. दिवाळीपूर्वी बहुतेक सर्व निर्बंध शिथिल करण्यात येतील.हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा कधीपासून वाढविणार याची तारीख जाहीर झालेली नाही. एक-दोन दिवसांत त्याच्या मार्गदर्शक सूचना जारी होतील. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना आटोक्यात असल्याने निर्बंध आणखी शिथिल करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. मुंबईत ‘टेक होम’साठी हॉटेलांना शेवटची ऑर्डर रात्री १ पर्यंत देता येईल. राज्यात सध्या रात्री १० पर्यंत दुकाने, हॉटेल उघडे ठेवण्याची अनुमती आहे.ॲम्युझमेंट पार्क शुक्रवारपासून खुलेराज्यातील सर्व ॲम्युझमेंट पार्क शुक्रवार, २२ ऑक्टोबरपासून खुले करण्यात येतील. मात्र, त्यातील वॉटर स्पोर्ट्स बंदच राहतील. पाण्याव्यतिरिक्त असलेल्या राईड्सचा आनंद घेता येणार आहे. दिवाळीनंतर १५ दिवसांनी पुन्हा आढावादिवाळीनंतर १५ दिवसांनी त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा टास्क फोर्स घेईल आणि निर्बंध नेहमीसाठी हटवायचे का, यावर पुन्हा एकदा विचारविनिमय करण्यात येईल.धार्मिक स्थळे आणि आठवी ते बारावीचे वर्ग सुरूराज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू होणारचित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे २२ ऑक्टोबरपासून खुली होणारधार्मिक स्थळे ६ ऑक्टोबरला खुली करण्यात आली आहेत.ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू झाले.एकपडदा चित्रपटगृहांना सवलती लवकरचएकपडदा चित्रपटगृहांच्या भवितव्यावरील प्रश्नचिन्ह कायम असतानाच, त्यांना काही सवलती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तिसऱ्या लाटेची शक्यता कमीच दुसऱ्या लाटेनंतर कोरोना उत्परिवर्तित झालेला नसून नवा व्हेरिएंटही आलेला नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असे जाणकारांचे मत आहे. २२१ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १३,५९६ नवे रुग्ण आढळले. गेल्या २२१ दिवसांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे. देशात आता एकूण ३ कोटी ४० लाख कोरोनारुग्ण आहेत. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धुणे खूप आवश्यक आहे. नागरिकांनी बेसावध राहू नये. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या