शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
3
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
4
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
5
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
6
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
7
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
8
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
9
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
10
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
11
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
12
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
13
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
14
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
15
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
16
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
17
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
18
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
19
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?

निर्बंध सैलावले, दिवाळी धडाक्यात; रेस्टॉरंट आणि दुकानांच्या वेळा वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 07:07 IST

मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट व दुकाने रात्री १२ पर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांतील वेळा स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात येतील.

मुंबई : दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून कोरोनाचे एक-एक निर्बंध शिथिल होत असून आता राज्यातील रेस्टॉरंट, दुकाने उघडी ठेवण्यासाठीच्या वेळा वाढवून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट व दुकाने रात्री १२ पर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांतील वेळा स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात येतील. दिवाळीपूर्वी बहुतेक सर्व निर्बंध शिथिल करण्यात येतील.हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा कधीपासून वाढविणार याची तारीख जाहीर झालेली नाही. एक-दोन दिवसांत त्याच्या मार्गदर्शक सूचना जारी होतील. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना आटोक्यात असल्याने निर्बंध आणखी शिथिल करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. मुंबईत ‘टेक होम’साठी हॉटेलांना शेवटची ऑर्डर रात्री १ पर्यंत देता येईल. राज्यात सध्या रात्री १० पर्यंत दुकाने, हॉटेल उघडे ठेवण्याची अनुमती आहे.ॲम्युझमेंट पार्क शुक्रवारपासून खुलेराज्यातील सर्व ॲम्युझमेंट पार्क शुक्रवार, २२ ऑक्टोबरपासून खुले करण्यात येतील. मात्र, त्यातील वॉटर स्पोर्ट्स बंदच राहतील. पाण्याव्यतिरिक्त असलेल्या राईड्सचा आनंद घेता येणार आहे. दिवाळीनंतर १५ दिवसांनी पुन्हा आढावादिवाळीनंतर १५ दिवसांनी त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा टास्क फोर्स घेईल आणि निर्बंध नेहमीसाठी हटवायचे का, यावर पुन्हा एकदा विचारविनिमय करण्यात येईल.धार्मिक स्थळे आणि आठवी ते बारावीचे वर्ग सुरूराज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू होणारचित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे २२ ऑक्टोबरपासून खुली होणारधार्मिक स्थळे ६ ऑक्टोबरला खुली करण्यात आली आहेत.ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू झाले.एकपडदा चित्रपटगृहांना सवलती लवकरचएकपडदा चित्रपटगृहांच्या भवितव्यावरील प्रश्नचिन्ह कायम असतानाच, त्यांना काही सवलती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तिसऱ्या लाटेची शक्यता कमीच दुसऱ्या लाटेनंतर कोरोना उत्परिवर्तित झालेला नसून नवा व्हेरिएंटही आलेला नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असे जाणकारांचे मत आहे. २२१ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १३,५९६ नवे रुग्ण आढळले. गेल्या २२१ दिवसांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे. देशात आता एकूण ३ कोटी ४० लाख कोरोनारुग्ण आहेत. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धुणे खूप आवश्यक आहे. नागरिकांनी बेसावध राहू नये. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या