शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

निर्बंध सैलावले, दिवाळी धडाक्यात; रेस्टॉरंट आणि दुकानांच्या वेळा वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 07:07 IST

मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट व दुकाने रात्री १२ पर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांतील वेळा स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात येतील.

मुंबई : दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून कोरोनाचे एक-एक निर्बंध शिथिल होत असून आता राज्यातील रेस्टॉरंट, दुकाने उघडी ठेवण्यासाठीच्या वेळा वाढवून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट व दुकाने रात्री १२ पर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांतील वेळा स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात येतील. दिवाळीपूर्वी बहुतेक सर्व निर्बंध शिथिल करण्यात येतील.हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा कधीपासून वाढविणार याची तारीख जाहीर झालेली नाही. एक-दोन दिवसांत त्याच्या मार्गदर्शक सूचना जारी होतील. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना आटोक्यात असल्याने निर्बंध आणखी शिथिल करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. मुंबईत ‘टेक होम’साठी हॉटेलांना शेवटची ऑर्डर रात्री १ पर्यंत देता येईल. राज्यात सध्या रात्री १० पर्यंत दुकाने, हॉटेल उघडे ठेवण्याची अनुमती आहे.ॲम्युझमेंट पार्क शुक्रवारपासून खुलेराज्यातील सर्व ॲम्युझमेंट पार्क शुक्रवार, २२ ऑक्टोबरपासून खुले करण्यात येतील. मात्र, त्यातील वॉटर स्पोर्ट्स बंदच राहतील. पाण्याव्यतिरिक्त असलेल्या राईड्सचा आनंद घेता येणार आहे. दिवाळीनंतर १५ दिवसांनी पुन्हा आढावादिवाळीनंतर १५ दिवसांनी त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा टास्क फोर्स घेईल आणि निर्बंध नेहमीसाठी हटवायचे का, यावर पुन्हा एकदा विचारविनिमय करण्यात येईल.धार्मिक स्थळे आणि आठवी ते बारावीचे वर्ग सुरूराज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू होणारचित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे २२ ऑक्टोबरपासून खुली होणारधार्मिक स्थळे ६ ऑक्टोबरला खुली करण्यात आली आहेत.ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू झाले.एकपडदा चित्रपटगृहांना सवलती लवकरचएकपडदा चित्रपटगृहांच्या भवितव्यावरील प्रश्नचिन्ह कायम असतानाच, त्यांना काही सवलती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तिसऱ्या लाटेची शक्यता कमीच दुसऱ्या लाटेनंतर कोरोना उत्परिवर्तित झालेला नसून नवा व्हेरिएंटही आलेला नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असे जाणकारांचे मत आहे. २२१ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १३,५९६ नवे रुग्ण आढळले. गेल्या २२१ दिवसांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे. देशात आता एकूण ३ कोटी ४० लाख कोरोनारुग्ण आहेत. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धुणे खूप आवश्यक आहे. नागरिकांनी बेसावध राहू नये. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या