शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगडचे गतवैभव परत आणणार

By admin | Updated: April 12, 2017 01:38 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरू होते. पारदर्शक कारभार कसा असावा हे छत्रपतींनी सुराज्य करून दाखवून दिले. छत्रपती शिवरायांची राजधानी

महाड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरू होते. पारदर्शक कारभार कसा असावा हे छत्रपतींनी सुराज्य करून दाखवून दिले. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पुनर्निर्माणाचे शल्य आजवर तमाम शिवभक्तांना सतत बोचत होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने रायगड किल्ल्याचे काम मार्गी लावले आहे. या रायगडाच्या पुनर्निर्माणाचे शिवधनुष्य हे केवळ शासनाने पेलायचे नसून, हे तुम्हा आम्हा सर्वांच्या सहकार्यातून करायचे आहे. या शिवपुण्यतिथीनिमित्ताने किल्ले रायगडचे गतवैभव पुन्हा आणण्याचा संकल्प करू या, असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समितीतर्फे रायगडावर ३३७ वी शिवपुण्यतिथी मंगळवारी साजरी करण्यात आली. त्यावेळी राजदरबार सभागृहात संपन्न झालेल्या अभिवादन सभेत चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमाला अभिनेते राहुल सोलापूरकर, आ. भरत गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, वीरबाजी पासलकर यांचे वंशज लक्ष्मणराव पासलकर, राजिप अध्यक्षा अदिती तटकरे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक , कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.दिल्लीच्या जोखडातून रायगड किल्ला मुक्त करून राज्य शासनाच्या ताब्यात आणण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याने या गडाच्या विकासाचे व सुशोभीकरणाचे दार आता खुले झाल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना यंदाचा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. (वार्ताहर)- कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान व स्फूर्तिस्थान असलेल्या या रायगड किल्ल्याच्या विकासासाठी ५६५ कोटींचा विकास आराखडा केंद्र व राज्य शासनाने मंजूर केला असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. जगदीश कदम यांनी स्मारक मंडळातर्फे गेली १२२ वर्षे रायगडावर शिवपुण्यतिथी सोहळा साजरा केला जात असल्याचे सांगितले.