शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

वारकऱ्यांसाठी विसावा

By admin | Updated: June 9, 2016 02:09 IST

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असणाऱ्या आषाढी वारीचा सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे

पिंपरी : महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असणाऱ्या आषाढी वारीचा सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या देहू- आळंदी रस्त्यावर वारकऱ्यांसाठी विसावा तयार केला आहे. त्यास तुळशी वृंदावन असे नाव देण्यात आले आहे. भागवत धर्मातील वारकरी संप्रदायाचा आषाढी वारीचा सोहळा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनू लागला आहे. विश्वकल्याणाचे दान मागणाऱ्या या सोहळ्याची लौकिकता वाढतच आहे. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वरमहाराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज या संतांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात. तर दर महिन्याला वारीसाठी देहू-आळंदीत मोठ्या प्रमाणावर वारकरी येत असतात. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात. वारकरी देहूतील संतश्रेष्ठ तुकोबाराय आणि आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन घरी परतत असतात. अशा वारकऱ्यांना विसाव्यासाठी आजवर कोणतीही सोय नव्हती. म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने सीएसआरमधून बीआरटी मार्गावर तुळशी वृदांवन विसावा निर्माण करण्याचे ठरले. ही संकल्पना तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांची होती. (प्रतिनिधी)... असा आहे विसावाविसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आसन व्यवस्था किमान पंचवीस लोक एकाच वेळी बसू शकतात. या ठिकाणी वारकऱ्यांना भजन करण्यासाठी जागा तयार केली आहे. छोटी छोटी झाडे, तसेच हिरवळीने वृंदावनाचा परिसर सुशोभित केला आहे. चार बाय ग्रेनाइटवर संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज यांची वचने आणि छायाचित्रे असणार आहेत. ‘दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो...’ अशी संतवचने या ठिकाणी लावण्यात आली आहेत. या ठिकाणी विजेची बचत व्हावी म्हणून एलईडी दिवे बसविलेले आहेत. पाच ठिकाणी उभारणार वृंदावनदेहू-आळंदी रस्त्यावर पाच ठिकाणी तुळशी वृदांवन विसावे उभारले जाणार आहेत. डुडुळगाव येथे राजमाता जिजाऊ फार्मसी महाविद्यालयासमोर, मोशी चौक, हवालदारवस्ती मोशी, राजकमल विहार सोसायटी, बोराटेवस्ती असे विसावे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी बोराटेवस्ती येथील विसाव्याचे काम पूर्ण झाले आहे.देहू-आळंदी रस्त्यावर वारकऱ्यांना विसाव्यासाठी सोय नव्हती. आषाढी वारी किंवा महिन्याची वारी करण्यासाठी वारकरी या रस्त्याने जात असतात. काही छोट्या दिंड्याही या मार्गावरून जात असतात. वारकऱ्यांना विसाव्याची सोय नव्हती. या मार्गावर विसावा निर्माण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी महापालिकेचा कोणताही निधी खर्च केला जाणार नाही. यासाठी गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास ठिकठिकाणी विसावे उभारता येणार आहेत.-विजय भोजणे अभियंता, बीआरटीएस