शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

वारकऱ्यांसाठी विसावा

By admin | Updated: June 9, 2016 02:09 IST

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असणाऱ्या आषाढी वारीचा सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे

पिंपरी : महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असणाऱ्या आषाढी वारीचा सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या देहू- आळंदी रस्त्यावर वारकऱ्यांसाठी विसावा तयार केला आहे. त्यास तुळशी वृंदावन असे नाव देण्यात आले आहे. भागवत धर्मातील वारकरी संप्रदायाचा आषाढी वारीचा सोहळा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनू लागला आहे. विश्वकल्याणाचे दान मागणाऱ्या या सोहळ्याची लौकिकता वाढतच आहे. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वरमहाराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज या संतांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात. तर दर महिन्याला वारीसाठी देहू-आळंदीत मोठ्या प्रमाणावर वारकरी येत असतात. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात. वारकरी देहूतील संतश्रेष्ठ तुकोबाराय आणि आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन घरी परतत असतात. अशा वारकऱ्यांना विसाव्यासाठी आजवर कोणतीही सोय नव्हती. म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने सीएसआरमधून बीआरटी मार्गावर तुळशी वृदांवन विसावा निर्माण करण्याचे ठरले. ही संकल्पना तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांची होती. (प्रतिनिधी)... असा आहे विसावाविसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आसन व्यवस्था किमान पंचवीस लोक एकाच वेळी बसू शकतात. या ठिकाणी वारकऱ्यांना भजन करण्यासाठी जागा तयार केली आहे. छोटी छोटी झाडे, तसेच हिरवळीने वृंदावनाचा परिसर सुशोभित केला आहे. चार बाय ग्रेनाइटवर संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज यांची वचने आणि छायाचित्रे असणार आहेत. ‘दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो...’ अशी संतवचने या ठिकाणी लावण्यात आली आहेत. या ठिकाणी विजेची बचत व्हावी म्हणून एलईडी दिवे बसविलेले आहेत. पाच ठिकाणी उभारणार वृंदावनदेहू-आळंदी रस्त्यावर पाच ठिकाणी तुळशी वृदांवन विसावे उभारले जाणार आहेत. डुडुळगाव येथे राजमाता जिजाऊ फार्मसी महाविद्यालयासमोर, मोशी चौक, हवालदारवस्ती मोशी, राजकमल विहार सोसायटी, बोराटेवस्ती असे विसावे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी बोराटेवस्ती येथील विसाव्याचे काम पूर्ण झाले आहे.देहू-आळंदी रस्त्यावर वारकऱ्यांना विसाव्यासाठी सोय नव्हती. आषाढी वारी किंवा महिन्याची वारी करण्यासाठी वारकरी या रस्त्याने जात असतात. काही छोट्या दिंड्याही या मार्गावरून जात असतात. वारकऱ्यांना विसाव्याची सोय नव्हती. या मार्गावर विसावा निर्माण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी महापालिकेचा कोणताही निधी खर्च केला जाणार नाही. यासाठी गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास ठिकठिकाणी विसावे उभारता येणार आहेत.-विजय भोजणे अभियंता, बीआरटीएस