शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांसाठी विसावा

By admin | Updated: June 9, 2016 02:09 IST

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असणाऱ्या आषाढी वारीचा सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे

पिंपरी : महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असणाऱ्या आषाढी वारीचा सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या देहू- आळंदी रस्त्यावर वारकऱ्यांसाठी विसावा तयार केला आहे. त्यास तुळशी वृंदावन असे नाव देण्यात आले आहे. भागवत धर्मातील वारकरी संप्रदायाचा आषाढी वारीचा सोहळा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनू लागला आहे. विश्वकल्याणाचे दान मागणाऱ्या या सोहळ्याची लौकिकता वाढतच आहे. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वरमहाराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज या संतांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात. तर दर महिन्याला वारीसाठी देहू-आळंदीत मोठ्या प्रमाणावर वारकरी येत असतात. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात. वारकरी देहूतील संतश्रेष्ठ तुकोबाराय आणि आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन घरी परतत असतात. अशा वारकऱ्यांना विसाव्यासाठी आजवर कोणतीही सोय नव्हती. म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने सीएसआरमधून बीआरटी मार्गावर तुळशी वृदांवन विसावा निर्माण करण्याचे ठरले. ही संकल्पना तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांची होती. (प्रतिनिधी)... असा आहे विसावाविसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आसन व्यवस्था किमान पंचवीस लोक एकाच वेळी बसू शकतात. या ठिकाणी वारकऱ्यांना भजन करण्यासाठी जागा तयार केली आहे. छोटी छोटी झाडे, तसेच हिरवळीने वृंदावनाचा परिसर सुशोभित केला आहे. चार बाय ग्रेनाइटवर संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज यांची वचने आणि छायाचित्रे असणार आहेत. ‘दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो...’ अशी संतवचने या ठिकाणी लावण्यात आली आहेत. या ठिकाणी विजेची बचत व्हावी म्हणून एलईडी दिवे बसविलेले आहेत. पाच ठिकाणी उभारणार वृंदावनदेहू-आळंदी रस्त्यावर पाच ठिकाणी तुळशी वृदांवन विसावे उभारले जाणार आहेत. डुडुळगाव येथे राजमाता जिजाऊ फार्मसी महाविद्यालयासमोर, मोशी चौक, हवालदारवस्ती मोशी, राजकमल विहार सोसायटी, बोराटेवस्ती असे विसावे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी बोराटेवस्ती येथील विसाव्याचे काम पूर्ण झाले आहे.देहू-आळंदी रस्त्यावर वारकऱ्यांना विसाव्यासाठी सोय नव्हती. आषाढी वारी किंवा महिन्याची वारी करण्यासाठी वारकरी या रस्त्याने जात असतात. काही छोट्या दिंड्याही या मार्गावरून जात असतात. वारकऱ्यांना विसाव्याची सोय नव्हती. या मार्गावर विसावा निर्माण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी महापालिकेचा कोणताही निधी खर्च केला जाणार नाही. यासाठी गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास ठिकठिकाणी विसावे उभारता येणार आहेत.-विजय भोजणे अभियंता, बीआरटीएस