शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

'उर्वरित महाराष्ट्रालाही मुंबईप्रमाणे वीज मिळाली पाहिजे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:47 IST

आपल्याकडे अतिरिक्त वीज असली तरीसुद्धा शेवटच्या माणसाला ती वीज मिळत नाही.

आपल्याकडे अतिरिक्त वीज असली तरीसुद्धा शेवटच्या माणसाला ती वीज मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे वीज प्रणाली अशक्त आहे. त्यामुळे एकीकडेच अतिरिक्त वीज आहे. अतिरिक्त वीज असल्यामुळे त्याचे फिक्स चार्जेस म्हणजे स्थिर आकार आहेत. हे स्थिर आकार भरले जात आहेत. तरीसुद्धा तेथील माणसाला वीज मिळत नाही. परिणामी महाराष्ट्र भारनियमनमुक्त आहे, असे म्हटले जाते. मात्र वीज उपलब्ध होत नाही. माझ्या घरात का वीज नाही? हा प्रश्न सुटत नाही. एका अर्थाने वीज प्रणाली सुधारत नाही तोवर हे प्रश्न येतच राहणार. भविष्यात माणसाला २४ तास मुंबईसारखी वीज मिळाली पाहिजे. मुंबईला वीज नाही हा प्रकार मुंबईत नाहीच. उर्वरित महाराष्ट्राने मुंबईच्या दिशेने प्रवास केला पाहिजे.आपल्या आजूबाजूच्या राज्यात कारखान्यांना दिली जाणारी वीज ही स्वस्त आहे. ही वीज जवळजवळ २० ते २५ टक्क्यांनी स्वस्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वीज खरेदीची किंमत अधिक आहे. वीज वितरणाची किंमत अधिक आहे. आपली वीज खरेदीची किंमत ४ रुपये, वितरणाची किंमत २ रुपये; अशी ६ रुपये आहे. बाकीच्यांची ही किंमत साडेचार रुपये आहे. कारण त्यांच्याकडे वीज विकत घेण्याची किंमत साडेतीनपर्यंत आहे. दोन रुपयांची वीज दीड रुपयाच्या आसपास आहे. त्यामुळे त्यांची सरासरी वीज किंमत कमी आहे. वीज किंमत कमी असल्याने साहजिकच बाकीचे दर, किमती खाली येतात. या दिशेने आपण प्रवास केला पाहिजे.दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी राहिली आहे. यास कारण ग्राहक नाहीत तर येथे असलेले राजकारण आहे. एकापाठोपाठ सवलत दिली जाते. मात्र यामुळे होणारा जो तोटा किंवा नुकसान, फरक हा सरकारने भरून काढला पाहिजे. कृषीपंपाचे जे मोजमाप आहे याबाबत खूप वाद आहेत. त्यातून मुक्तता झाली पाहिजे. भविष्यात सुधारणा घडल्या पाहिजेत; त्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही. उद्योगधद्यांना जास्त दराने वीज मिळते. त्यांना स्पर्धेत टिकाव धरता येत नाही. एमआयडीसीमध्ये त्यांना त्रास सोसावा लागतो. हे आॅनलाइन केले पाहिजे. उद्योगांची वाढ व्हायची असेल तर गैरप्रकारांना आळा घातला पाहिजे. कारण छोट्या उद्योगधंद्यांना याचा मोठा त्रास होतो. स्थानिक राजकारणाचाही फटका बसतो. तो बसता कामा नये. सरकारने उद्योगांच्या पाठी उभे राहिले पाहिजे.अशोक पेंडसे (लेखक वीज क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :electricityवीज