शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

जंगल संरक्षणाची जबाबदारी नि:शस्त्र वनरक्षक, वनपालांवर!

By admin | Updated: December 30, 2015 01:52 IST

प्रत्यक्ष जंगलांचे संरक्षण करणाऱ्या वनपाल, वनरक्षकांना कुठल्याही प्रकारचे शस्त्र देण्यात आलेले नसल्याने, विस्तीर्ण जंगल आणि वन्यपशुंचे संरक्षण नि:शस्त्र कर्मचारी कसे करणार?

-  गणेश वासनिक,  अमरावतीप्रत्यक्ष जंगलांचे संरक्षण करणाऱ्या वनपाल, वनरक्षकांना कुठल्याही प्रकारचे शस्त्र देण्यात आलेले नसल्याने, विस्तीर्ण जंगल आणि वन्यपशुंचे संरक्षण नि:शस्त्र कर्मचारी कसे करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तस्करांनी वेढलेल्या जंगलात वनकर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने, या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे.वनपालपदाला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला, परंतु त्यांना कोणतीही शस्त्रे देण्यात आलेली नाहीत. वनरक्षक, वनपालांना शस्त्रे देण्याची राज्य वनपाल, वनरक्षक संघटनेची फार जुनी मागणी आहे. मात्र, वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही, असा संघटनेचा आरोप आहे. अतिसंवेदनशीलक्षेत्रात कार्यरत वनपालांची संख्या १२०० च्या घरात असून, त्यांनाशस्त्र मिळाल्यास ते त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडू शकतात.राज्यातील ४० वनविभागांमध्ये २० पेक्षा अधिक वनपरिक्षेत्रांत अवैध सागवान तस्कर, अतिक्रमण आणि वाघ, बिबट्यांच्या शिकारी टोळींनी धुमाकूळ घातला आहे. वनपाल, वनरक्षकांची शस्त्रे पुरविण्याची मागणी वनविभागाने प्रलंबित ठेवल्याचे दिसते. दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर व मेळघाटात वाघांची शिकार करणारी सशस्त्र टोळी वनपाल, वनरक्षकांनीच पकडली होती.गेल्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीपरिसरात सागवान तस्करांना रोखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या वनरक्षक, वनपालांवर तस्करांनी सशस्त्र हल्ला चढविला. याहल्ल्यात चार वनकर्मचारी गंभीर जखमी झाले. वातानुकूलित कक्षात बसून, जंगलाच्या संरक्षणाचे नियोजन करणाऱ्या अनेक वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या रिव्हॉल्व्हर कपाटात बंद आहेत. मुख्य वनसंरक्षक, सहायक मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्राधिकारी या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना शासनाने जंगल संरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर दिल्या आहेत. मात्र, हे वनाधिकारी जंगलात फिरत नसल्याचे चित्र आहे.वनपाल, वनरक्षकांना रिव्हॉल्व्हर देण्याविषयीची मागणी असेल, तर या संदर्भात नक्कीच शासन सकारात्मक तोडगा काढेल. वनकर्मचाऱ्यांवर तस्करांकडून हल्ला होणे ही बाब चिंतनीय आहे. वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत लवकरच आवश्यक उपाययोजना केल्या जातील.- सुधीर मुनगंटीवार, वने व अर्थमंत्री