शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा बचत मोहिमेला प्रतिसाद

By admin | Updated: January 6, 2015 01:01 IST

लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक विजेचा वापर टाळावा. ऊर्जा बचत करून पाण्याची व कोळशाची बचत करावी. यातून पर्यावरण संवर्धन व आर्थिक बचत व्हावी, या हेतूने महापालिकेतर्फे दर

२७४७ युनिटची बचत : शहरातील दिवे एक तास बंदनागपूर : लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक विजेचा वापर टाळावा. ऊर्जा बचत करून पाण्याची व कोळशाची बचत करावी. यातून पर्यावरण संवर्धन व आर्थिक बचत व्हावी, या हेतूने महापालिकेतर्फे दर पौर्णिमेला रात्री ८ ते ९ दरम्यान एक तास दिवे बंद ठेवण्याची मोहीम राबविली जाते. त्यानुसार सोमवारी रात्री शहरातील दिवे बंद ठेवण्यात आले.पौर्णिमेच्या रात्री झाशी राणी चौक ते अंबाझरी मार्ग, एलएडी कॉलेज रोड, गांधीनगर मार्ग, वर्धा मार्ग, कामठी रोड, विजय टॉकीज, अलंकार टॉकीज यासह शहरातील विविध मार्गावरील पथदिवे बंद ठेवण्यात आले. शहरातील लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक वीज वापर टाळल्यास पर्यावरण संवर्धनासोबतच आर्थिक बचत होत आहे. यापुढे ही मोहीम सुरू ठेवावी, असे आवाहन आमदार अनिल सोले यांनी केले. ऊर्जा बचतनिमित्त झाशी राणी चौक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.एक युनिट वीजनिर्मितीसाठी ५०० ग्रॅम कोळसा व ७.५ लिटर पाणी लागते. यातून मोठ्या प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईड निर्माण होतो. ऊर्जा बचत करून पर्यावरण संवर्धन करा, असे आवाहन त्यांनी केले. धंतोली झोनच्या सभापती सुमित्रा जाधव, नगरसेविका लता यादव, ग्रीन व्हिजिल फाऊं डेशनचे कौस्तुब चटर्जी, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, सहायक आयुक्त सुभाष जयदेव आदी उपस्थित होते. मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच चटर्जी यांच्या सहकाऱ्यांनी नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधून ऊर्जा बचत करण्याचे आवाहन केले. यावेळी सहायक अभियंता सलीम इकबाल, ए.एस.मानकर, पी.के. रुद्रकार, दक्षा बोरकर, सुरभी जैस्वाल, संदेश साखरे, हेमंत अमेसार, शीतल चौधरी, बी.डी.यादव, विश्वजित पाईकराव आदी उपस्थित होते. शहरातील सर्व भागात ही मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)